शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भाविकांवर काळाचा घाला; भरधाव जीपचे टायर फुटले, सिन्नरच्या तिघांचा धाराशिवमध्ये मृत्यू

By बाबुराव चव्हाण | Updated: March 21, 2023 16:02 IST

तामलवाडीनजीक भीषण अपघात, अन्य तिघे भाविक जखमी आहेत

धाराशिव/तामलवाडी : श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापूरकडे येत असताना टायर फुटून भरधाव जीव रस्त्यालगतच्या खड्डयात पडली. या भीषण अपघातात सिन्नर येथील तिघेजण जागीच ठार झाले. तर अन्य तिघे गंभीर जखमी आहेत. ही घटना मंगळवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास तुळजापूर तालुक्यातील तामलवाडीनजीक घडली.

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील चास्नकावाडी, चासगाव येथील भाविक जीपने श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येत हाेते. त्यांची जीव मंगळवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास तामलवाडीनजीक आली असता, अचानक जीपचे टायर फुटले. यानंतर ही जीव रस्त्यालगत असलेल्या खड्ड्यात काेसळली. या भीषण अपघातात निखील सानप (२४), अनिकेत भाबड (२४) आणि शाम खैरनार (२६, सर्व रा.चास्नकावाडी, ता. सिन्नर) हे तिघेजण जागीच ठार झाले. तर जीवन ढाकणे (२४), जीवन बबन बिडगर (२६), तुषार दत्तात्रय बिडगर (२७, सर्व रा. चासगाव, ता. सिन्नर) हे तिघेजण गंभीर जखमी आहेत. 

या तिघांनाही तातडीने साेलापूर जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, अपघाती घटनेची माहिती मिळताच धाराशिवच्या अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत, उप विभागीय पोलीस अधिकारी सई भोर-पाटील, सपोनि सचिन पंडित, पोलीस कर्मचारी आनंद गायकवाड, मिथुन गायकवाड, सुरज नरवडे, दिनकर तोगे, राजेंद्र चौगुले यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी पाठविले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAccidentअपघातDeathमृत्यूOsmanabadउस्मानाबाद