शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Shivsena: शिंदे गटातून मुंबईत पळून आलेल्या शिवसेना आमदाराला उद्धव ठाकरेंचं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 18:06 IST

आमदार कैलास पाटील यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरुन उद्धव ठाकरेंचं पत्र मिळाल्याचं सांगत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत

उस्मानाबाद/मुंबई - शिवसेनेच्या गटात मोठी बंडखोरी झाल्यानंतर 40 आमदार आणि 10 अपक्ष आमदारांनी शिंदे गटासोबत राहणं पसंत केलं. त्यामुळे, भाजपसोबत हातमिळवणी करत राज्यात सत्तांतर झाले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर, देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान, शिवसेनेच्या 2 आमदारांनी शिंदे गटातून पळ काढत घरवापसी केली. त्यापैक एक होते उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील. आता, याच कैलास पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी 6 जुलै रोजी पत्र पाठवून त्यांच्या एकनिष्ठेचं कौतुक केलं आहे. 

आमदार कैलास पाटील यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरुन उद्धव ठाकरेंचं पत्र मिळाल्याचं सांगत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ''शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे पत्र आज प्राप्त झाले आणि एका अर्थाने कृतार्थ झालो. राजकारणात तत्व, निष्ठा ही मूल्ये पाळायचे बाळकडू हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी लाखो शिवसैनिकांना पाजले आहे. सच्चा शिवसैनिक ही मूल्ये आजही प्रामाणिकपणे, तळमळीने पाळतो, हे मागच्या काही दिवसांत संपूर्ण देशाने पाहिले आहे'', असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्या पत्राबद्दल आमदारा कैलास पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. 

राजकारणात सत्ता येते जाते, पदे मिळतात आणि जातातही. पण, सच्च्या शिवसैनिकांच्या तत्वात काडीचाही अंतर कधी येत नसते. ८० टक्के समाजकारण व केवळ २० टक्के राजकारण हे ब्रीद घेऊन संघर्षाला उतरलेल्या मावळ्यांना सत्ता-पदाची नक्कीच फिकीर नाही. शिवसेना आणि शिवसैनिक येणाऱ्या आव्हानांना निधड्या छातीने समोर जातात, हेही वेळोवेळी सिद्ध झाले आहे.  कित्येक आले आणि गेलेही, पण शिवसेना मजबुतपणे उभी आहे, ती कट्टर शिवसैनिक मावळ्यांच्या जीवावर. उद्धव ठाकरेंनी माझ्यासारख्या शिवसैनिकावर दर्शविलेला विश्वास सार्थ ठरवून दाखविणे, हेच आता ध्येय आहे. संघर्षाची वीण घट्ट गुंफून, चला पुन्हा उठुया पेटून... चला पुन्हा लढूया पेटून... असे म्हणत कैलास पाटील यांनी पक्षप्रमुखांच्या पत्रावर आपली प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.  

कैलास पाटील यांचा थरारक अनुभव

विधान परिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारसमोर मोठे संकट उभं राहिलं होतं, जे पुढे सत्तांतरात बदललं. शिंदेगटाने आमदारांचे अपहरण करून त्यांना सूरतला नेण्याचा प्रयत्न केला असा गंभीर आरोप झाला. उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांनी माध्यमांसमोर थरारक अनुभव सांगितला होता. सोमवारी विधानपरिषदेसाठी मतदान पूर्ण झाल्यानंतर शिवसेनेतीलच काही नेत्यांनी डिनरसाठी ठाण्याला जायचे आहे असे आमदारांना सांगितले. यानंतर सायंकाळी वेगवेगळ्या वाहनांमध्ये बसवून बस ठाण्याच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आली. मात्र, ठाणे ओलांडून पुढे गेल्यानंतरही वाहने थांबत नव्हती. काही तासाचा प्रवास झाल्यानंतर चलबिचल सुरु झाल्याने पुढे शिंदे साहेब थांबले आहेत, त्यांना भेटू, असे सांगून वाहने तशीच पुढे नेण्यात आली. ही वाहने महाराष्ट्र-गुजरात सीमेवर थांबविण्यात आली होती.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेKailas Patilकैलास पाटीलMLAआमदार