शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

Shivsena: शिंदे गटातून मुंबईत पळून आलेल्या शिवसेना आमदाराला उद्धव ठाकरेंचं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 18:06 IST

आमदार कैलास पाटील यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरुन उद्धव ठाकरेंचं पत्र मिळाल्याचं सांगत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत

उस्मानाबाद/मुंबई - शिवसेनेच्या गटात मोठी बंडखोरी झाल्यानंतर 40 आमदार आणि 10 अपक्ष आमदारांनी शिंदे गटासोबत राहणं पसंत केलं. त्यामुळे, भाजपसोबत हातमिळवणी करत राज्यात सत्तांतर झाले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर, देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान, शिवसेनेच्या 2 आमदारांनी शिंदे गटातून पळ काढत घरवापसी केली. त्यापैक एक होते उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील. आता, याच कैलास पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी 6 जुलै रोजी पत्र पाठवून त्यांच्या एकनिष्ठेचं कौतुक केलं आहे. 

आमदार कैलास पाटील यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरुन उद्धव ठाकरेंचं पत्र मिळाल्याचं सांगत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ''शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे पत्र आज प्राप्त झाले आणि एका अर्थाने कृतार्थ झालो. राजकारणात तत्व, निष्ठा ही मूल्ये पाळायचे बाळकडू हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी लाखो शिवसैनिकांना पाजले आहे. सच्चा शिवसैनिक ही मूल्ये आजही प्रामाणिकपणे, तळमळीने पाळतो, हे मागच्या काही दिवसांत संपूर्ण देशाने पाहिले आहे'', असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्या पत्राबद्दल आमदारा कैलास पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. 

राजकारणात सत्ता येते जाते, पदे मिळतात आणि जातातही. पण, सच्च्या शिवसैनिकांच्या तत्वात काडीचाही अंतर कधी येत नसते. ८० टक्के समाजकारण व केवळ २० टक्के राजकारण हे ब्रीद घेऊन संघर्षाला उतरलेल्या मावळ्यांना सत्ता-पदाची नक्कीच फिकीर नाही. शिवसेना आणि शिवसैनिक येणाऱ्या आव्हानांना निधड्या छातीने समोर जातात, हेही वेळोवेळी सिद्ध झाले आहे.  कित्येक आले आणि गेलेही, पण शिवसेना मजबुतपणे उभी आहे, ती कट्टर शिवसैनिक मावळ्यांच्या जीवावर. उद्धव ठाकरेंनी माझ्यासारख्या शिवसैनिकावर दर्शविलेला विश्वास सार्थ ठरवून दाखविणे, हेच आता ध्येय आहे. संघर्षाची वीण घट्ट गुंफून, चला पुन्हा उठुया पेटून... चला पुन्हा लढूया पेटून... असे म्हणत कैलास पाटील यांनी पक्षप्रमुखांच्या पत्रावर आपली प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.  

कैलास पाटील यांचा थरारक अनुभव

विधान परिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारसमोर मोठे संकट उभं राहिलं होतं, जे पुढे सत्तांतरात बदललं. शिंदेगटाने आमदारांचे अपहरण करून त्यांना सूरतला नेण्याचा प्रयत्न केला असा गंभीर आरोप झाला. उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांनी माध्यमांसमोर थरारक अनुभव सांगितला होता. सोमवारी विधानपरिषदेसाठी मतदान पूर्ण झाल्यानंतर शिवसेनेतीलच काही नेत्यांनी डिनरसाठी ठाण्याला जायचे आहे असे आमदारांना सांगितले. यानंतर सायंकाळी वेगवेगळ्या वाहनांमध्ये बसवून बस ठाण्याच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आली. मात्र, ठाणे ओलांडून पुढे गेल्यानंतरही वाहने थांबत नव्हती. काही तासाचा प्रवास झाल्यानंतर चलबिचल सुरु झाल्याने पुढे शिंदे साहेब थांबले आहेत, त्यांना भेटू, असे सांगून वाहने तशीच पुढे नेण्यात आली. ही वाहने महाराष्ट्र-गुजरात सीमेवर थांबविण्यात आली होती.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेKailas Patilकैलास पाटीलMLAआमदार