शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

पिके जगवायची कशी? सरकार, महावितरणविराेधात शिवसेनेचा हल्लाबाेल

By सूरज पाचपिंडे  | Updated: September 4, 2023 18:59 IST

आंदोलनकर्त्यांनी शासन व महावितरणच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

धाराशिव : पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी उपलब्ध पाण्यावर खरीप पिके जगविण्यासाठी धडपड करीत आहेत. मात्र, शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने व विनाखंड वीजपुरवठा हाेत नाही. त्यामुळे पाणी असूनही पिके करपून चालली आहेत. राज्य सरकार आणि महावितरणच्या विराेधात सोमवारी शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयासमाेर धरणे आंदाेलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी शासन व महावितरणच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

पाण्याविना पिके करपून लागली आहेत. थोडेफार उपलब्ध असलेल्या पाण्यावर पिके जगविण्यासाठी शेतकरी कसरत करीत आहेत. परंतु त्यांना महावितरण साथ देत नाही. कृषीपंपांना उच्च दाबाने वीज मिळत नाही. काही भागात तर एक दिवसाआड आठ तास वीज दिली जाते. त्यातही लपंडाव आलाच. असे असतानाही राज्य सरकार या प्रश्नावर बाेलायला तयार नाही. परिणामी, शेतकरी हताश झाले आहेत. सरकार आणि महावितरणच्या विराेधात शिवसेनेच्या वतीने येथील वीज कंपनीच्या कार्यालयासमाेर हल्लाबाेल आंदाेलन करण्यात आले. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी शासन व महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात जोरदार टिका केली.

जिल्ह्यात कुठंच आठ तास लाईट मिळत नाही. पिके वाळून चालली आहेत. शेतकरी लाईनमनला फोन करतात, मात्र ते फोन उचलल नाहीत. एक वर्ष झाली तरी नवीन सबस्टेशनचे टेंडर मंजूर झाले नाहीत. ऑईल अभावी डीपी बसविला जात नाही. त्यामुळे पीके करपू लागली आहेत. महावितरणने त्वरीत टेंडर काढून नवीन सबस्टेशन सुरु करावीत, तसेच शेतकऱ्यांना आठ तास वीजपुरठा करावा, यापुढे शांततेत नाही तर रुमणे घेऊन आंदोलन करु असा, इशारा खासदार राजेनिंबाळकर यांनी महावितरणला दिला. यावेळी आमदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, साेमनाथ गुरव यांच्यासह शिवसैनिक, शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनानंतर शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

टॅग्स :FarmerशेतकरीOsmanabadउस्मानाबाद