शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

पिके जगवायची कशी? सरकार, महावितरणविराेधात शिवसेनेचा हल्लाबाेल

By सूरज पाचपिंडे  | Updated: September 4, 2023 18:59 IST

आंदोलनकर्त्यांनी शासन व महावितरणच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

धाराशिव : पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी उपलब्ध पाण्यावर खरीप पिके जगविण्यासाठी धडपड करीत आहेत. मात्र, शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने व विनाखंड वीजपुरवठा हाेत नाही. त्यामुळे पाणी असूनही पिके करपून चालली आहेत. राज्य सरकार आणि महावितरणच्या विराेधात सोमवारी शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयासमाेर धरणे आंदाेलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी शासन व महावितरणच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

पाण्याविना पिके करपून लागली आहेत. थोडेफार उपलब्ध असलेल्या पाण्यावर पिके जगविण्यासाठी शेतकरी कसरत करीत आहेत. परंतु त्यांना महावितरण साथ देत नाही. कृषीपंपांना उच्च दाबाने वीज मिळत नाही. काही भागात तर एक दिवसाआड आठ तास वीज दिली जाते. त्यातही लपंडाव आलाच. असे असतानाही राज्य सरकार या प्रश्नावर बाेलायला तयार नाही. परिणामी, शेतकरी हताश झाले आहेत. सरकार आणि महावितरणच्या विराेधात शिवसेनेच्या वतीने येथील वीज कंपनीच्या कार्यालयासमाेर हल्लाबाेल आंदाेलन करण्यात आले. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी शासन व महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात जोरदार टिका केली.

जिल्ह्यात कुठंच आठ तास लाईट मिळत नाही. पिके वाळून चालली आहेत. शेतकरी लाईनमनला फोन करतात, मात्र ते फोन उचलल नाहीत. एक वर्ष झाली तरी नवीन सबस्टेशनचे टेंडर मंजूर झाले नाहीत. ऑईल अभावी डीपी बसविला जात नाही. त्यामुळे पीके करपू लागली आहेत. महावितरणने त्वरीत टेंडर काढून नवीन सबस्टेशन सुरु करावीत, तसेच शेतकऱ्यांना आठ तास वीजपुरठा करावा, यापुढे शांततेत नाही तर रुमणे घेऊन आंदोलन करु असा, इशारा खासदार राजेनिंबाळकर यांनी महावितरणला दिला. यावेळी आमदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, साेमनाथ गुरव यांच्यासह शिवसैनिक, शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनानंतर शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

टॅग्स :FarmerशेतकरीOsmanabadउस्मानाबाद