शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पिके जगवायची कशी? सरकार, महावितरणविराेधात शिवसेनेचा हल्लाबाेल

By सूरज पाचपिंडे  | Updated: September 4, 2023 18:59 IST

आंदोलनकर्त्यांनी शासन व महावितरणच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

धाराशिव : पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी उपलब्ध पाण्यावर खरीप पिके जगविण्यासाठी धडपड करीत आहेत. मात्र, शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने व विनाखंड वीजपुरवठा हाेत नाही. त्यामुळे पाणी असूनही पिके करपून चालली आहेत. राज्य सरकार आणि महावितरणच्या विराेधात सोमवारी शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयासमाेर धरणे आंदाेलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी शासन व महावितरणच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

पाण्याविना पिके करपून लागली आहेत. थोडेफार उपलब्ध असलेल्या पाण्यावर पिके जगविण्यासाठी शेतकरी कसरत करीत आहेत. परंतु त्यांना महावितरण साथ देत नाही. कृषीपंपांना उच्च दाबाने वीज मिळत नाही. काही भागात तर एक दिवसाआड आठ तास वीज दिली जाते. त्यातही लपंडाव आलाच. असे असतानाही राज्य सरकार या प्रश्नावर बाेलायला तयार नाही. परिणामी, शेतकरी हताश झाले आहेत. सरकार आणि महावितरणच्या विराेधात शिवसेनेच्या वतीने येथील वीज कंपनीच्या कार्यालयासमाेर हल्लाबाेल आंदाेलन करण्यात आले. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी शासन व महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात जोरदार टिका केली.

जिल्ह्यात कुठंच आठ तास लाईट मिळत नाही. पिके वाळून चालली आहेत. शेतकरी लाईनमनला फोन करतात, मात्र ते फोन उचलल नाहीत. एक वर्ष झाली तरी नवीन सबस्टेशनचे टेंडर मंजूर झाले नाहीत. ऑईल अभावी डीपी बसविला जात नाही. त्यामुळे पीके करपू लागली आहेत. महावितरणने त्वरीत टेंडर काढून नवीन सबस्टेशन सुरु करावीत, तसेच शेतकऱ्यांना आठ तास वीजपुरठा करावा, यापुढे शांततेत नाही तर रुमणे घेऊन आंदोलन करु असा, इशारा खासदार राजेनिंबाळकर यांनी महावितरणला दिला. यावेळी आमदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, साेमनाथ गुरव यांच्यासह शिवसैनिक, शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनानंतर शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

टॅग्स :FarmerशेतकरीOsmanabadउस्मानाबाद