शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार मतपेट्यांत घोटाळा करून निवडणुका फिरवायचे; राधाकृष्ण विखे-पाटील यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 12:52 IST

१९९१ साली माझ्या वडिलांच्या निवडणुकीतही शरद अपवर यांनी धांदली केली होती, असा आरोप विखे-पाटील यांनी केला.

तुळजापूर (जि. धाराशिव) : राज्यात मतपेट्यांचे काम सुरू असताना, त्यात शरद पवार यांनी त्यावेळी मोठ्या प्रमाणात घोटाळा केला. अशा पद्धतीने त्यांनी किती मतदारसंघांतील निवडणुका फिरवल्या, मला विचारा, मी सांगेन. मतदान, मोजणी प्रक्रियेत भानगडी करायच्या. त्याबदल्यात अनेक अधिकाऱ्यांना बक्षीस म्हणून चांगल्या पदावर नियुक्त्या द्यायच्या, हा त्यांचा इतिहास आहे. त्यामुळे त्यांना आता जे काही चालले आहे, ती भानगडच असल्याचे वाटते, असा दावा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सोमवारी तुळजापुरातून केला.

मंत्री विखे-पाटील हे सोमवारी कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेतील कामांची पाहणी व भूमिपूजन सोहळ्यांसाठी धाराशिव जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी तुळजापुरात माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, शरद पवारांनी ज्येष्ठता सोडली आहे. ती वयाने येत नसते. त्यांच्या काळात त्यांनी मत प्रक्रियेत अनेक भानगडी केल्या. १९९१ साली माझ्या वडिलांच्या निवडणुकीतही त्यांनी धांदली केली होती, असा आरोप विखे-पाटील यांनी केला.

राहुल गांधी यांच्यावर बोलताना ते म्हणाले, देशाला बदनाम करण्यासाठी त्यांनी विदेशात जाऊन टीका केली. लोकांनी दखल घेतली नाही. त्यामुळे आता पुन्हा देशात येऊन बदनामी करीत सुटले आहेत. खरेतर निवडणुकांमध्ये यश मिळत नसल्याने त्यांना वैफल्य आले आहे. यामुळे मतदारांचा अवमान करीत सुटले आहेत. त्यांनी मतदारांची माफी मागितली पाहिजे. लोकसभेला खोट्या प्रचाराच्या आधारावर त्यांना यश मिळाले. त्यांना यश मिळाले की घोटाळा नसतो, अपयश आल्यावरच घोटाळा दिसतो. एकीकडे देश वेगाने प्रगती करीत असताना लोकांचे लक्ष विचलित करण्याची त्यांना सवयच जडली असल्याचा दावाही विखे-पाटील यांनी केला.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलSharad Pawarशरद पवारEVM Machineईव्हीएम मशीनdharashivधाराशिवElectionनिवडणूक 2024