शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

शरद पवारांनी जागवल्या आठवणी, माजी आमदार आलुरे गुरुजींना वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 20:46 IST

तुळजापूर तालुका व मराठवाड्यात शेती, सहकार, शिक्षण या क्षेत्रांमध्ये सेवा आणि सचोटीचा आदर्श निर्माण करत भरीव कार्य करणारे सिद्रमप्पा आलुरे गुरूजी यांच्या निधनाने एक कर्तृत्वनिष्ठ नेतृत्व आपण गमावले आहे.

ठळक मुद्देतुळजापूर तालुका व मराठवाड्यात शेती, सहकार, शिक्षण या क्षेत्रांमध्ये सेवा आणि सचोटीचा आदर्श निर्माण करत भरीव कार्य करणारे सिद्रमप्पा आलुरे गुरूजी यांच्या निधनाने एक कर्तृत्वनिष्ठ नेतृत्व आपण गमावले आहे.

अणदूर (जि. उस्मानाबाद) : तुळजापूर तालुक्याचे माजी आमदार, शिक्षण प्रसारक मंडळ अणदूरचे संस्थापक सचिव सि.ना.आलुरे गुरूजी यांचे सोमवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास सोलापूर येथील एका रुगणालयात उपचार सुरू असताना निधन झाले. आज दुपारी तीन नंतर त्यांच्या पार्थिवावर अणदूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ट्विटरवरुन गुरुजींच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

तुळजापूर तालुका व मराठवाड्यात शेती, सहकार, शिक्षण या क्षेत्रांमध्ये सेवा आणि सचोटीचा आदर्श निर्माण करत भरीव कार्य करणारे सिद्रमप्पा आलुरे गुरूजी यांच्या निधनाने एक कर्तृत्वनिष्ठ नेतृत्व आपण गमावले आहे. आयुष्यभर ज्ञानाची उपासना करणार्‍या आलुरे गुरुजींना भावपूर्ण श्रद्धांजली!, असे ट्विट शरद पवार यांनी केले आहे.  सिद्रामप्पा आलुरे हे १९८० मध्ये काँग्रेस पक्षाकडून सर्वप्रथम आमदार झाले होते. त्यांनी शेकापचे तत्कालीन विद्यमान आमदार माणिकराव खपले यांचा १४ हजार ५७९ मतांनी पराभव करून विजय संपादन केला होता. या निवडणुकीत आलुरे गुरुजी यांना ३४ हजार १२१ तर खपले यांना १९  हजार ५४२ मते पडली होती. १९८५ ला मात्र शेकापचे माणिकराव खपले पुन्हा एकदा निवडून आले होते. त्यांनी आलुरे गुरुजी यांचा जवळपास ११ हजार २३० मतांनी पराभव केला. तेव्हा खपले यांना ४२ हजार ५५३ तर काँग्रेसचे आलुरे गुरुजी यांना ३१ हजार ३२३ मते मिळाली होती. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेसMLAआमदार