शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

दुसऱ्या लाटेत काही दिवसातच रुग्णसंख्या पाचशे पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 4:29 AM

कळंब : पहिल्या लाटेत नऊ महिन्यात कोरोना रूग्णांची संख्या दोन हजारापार गेली होती. आता दुसऱ्या लाटेत अवघ्या काही दिवसातच ...

कळंब : पहिल्या लाटेत नऊ महिन्यात कोरोना रूग्णांची संख्या दोन हजारापार गेली होती. आता दुसऱ्या लाटेत अवघ्या काही दिवसातच आकडा पाचशे पार झाल्याने गंभीर वृद्धी नोंदली गेली आहे. या स्थितीत गावगाड्यात मात्र मागच्या सारखी यंत्रणा ‘अ‍ॅक्टिव्ह’ दिसत नसून मास्क, डिस्टन्स, ट्रेसिंग यावर दुर्लक्ष दिसत असतानाच घोळक्यांना, टोळक्यांना अन् यामधील टाेळक्यांना नेमका ‘आवर’ घालायचा कोणी असा चिंतेत भर घालणारा प्रश्न पडत आहे.

गतवर्षी मार्च महिन्यात ‘लॉकडाऊन’ झाले होते. यानंतर पोलीस प्रशासन, महसूल यंत्रणा व स्थानिक लोकांच्या मदतीने या लॉकडाऊनचा काटेकोर अंमल झाला होता. जिल्हाबंदी झाल्याने हॉटस्पॉट ठरलेल्या शहरातून गावगाड्यात येणाऱ्या लोकांवर मर्यादा आल्या होत्या. गावागावात कोरोना कक्ष कार्यान्वित झाले होते. अंगणवाडी सेविका ते आशाताई ‘डोअर टू डोअर’ शोध घेत होत्या तर गावागावात गुरूजींनी ही तितकीच महत्त्वाची भूमिका बजावली होती. पोलीस अन् पोलीस पाटील तसेच कोतवालांच्या हातातील काठीचा लोकांत धाक होता. एकूणच कोरोनाच्या पहिल्या लाटेत गावगाड्यात प्रशासन सातत्याने ‘अ‍ॅक्टिव्ह’ मोडवर होते. गटविकास अधिकारी ते तहसीलदार यांच्या ‘व्हिजिट’ ते ‘कंटेन्टमेंट’ करण्यासाठी ग्रामसेवक, तलाठी यांची धावपळ असायची. एवढ्या तगड्या ‘नाकाबंदी’चा सामना करतही कोरोनाने तालुक्यातील सत्तरेक गावाची वेस ओलांडली होती.

एप्रिल ते डिसेंबर या काळात जवळपास १ हजार ३०० बाधित रूग्णांची गावगाड्यात नोंद झाली होती. शहरातील ८०० रूग्णांच्या तुलनेत हा आकडा तसा दखलपात्रच होता. यात ग्रामीण भागातील ३५ व्यक्तींचा मृत्यू झाला होता. शिराढोण, डिकसळ, येरमाळा, मस्सा आदी गावात वाढत्या रूग्णसंख्येमुळे भीतीचे वातावरण झाले होते. एकूणच पहिल्या लाटेतही कोरोनाने तालुक्यातील प्रशासन व जनतेला ‘गांभीर्याने घ्या’ असा संदेश दिला होता. तद्नंतर अनलॉकच्या पर्वात रूग्णांची संख्या कमी होत असल्याने अनेकांनी सुस्कारा टाकला असतानाच हळूहळू दुसऱ्या लाटेचा प्रकोप अधिक वेगाने आपली व्याप्ती वाढवत असल्याचे दिसून येत आहे. मागच्या सव्वा महिन्यात हा आकडा पाचशेच्या घरात पोहचला आहे. यामुळे पहिल्या लाटेचे दोन हजार अन् दुसऱ्या लाटेतील अवघ्या काही दिवसातील पाचशेचा आकडा निश्चितच धास्ती वाढवणारा असा आहे.

चौकट...

घोळक्यांचा अन् टोळक्यांचा बंदोबस्त कोण करणार

दुसऱ्या लाटेत कोरोना अधिक गंभीर बनत चालला आहे. आकडा वाढत आहे. स्थिती बिघडत चालली आहे. असे असले तरी मास्क, हायजीन आणि फिजिकल डिस्टन्स हे वैयक्तिक पातळीवरील ‘सुरक्षा कवच’ अनेकांच्या लेखी गौण दिसून येत आहे. गावोगावच्या पारावर, कट्‌ट्यावर, चौकात, बसथांब्यावर अकारण थांबणाऱ्या, चर्चेचं गुऱ्हाळ चालणाऱ्या टोळक्यांचा वावर दिसून येत आहे. गांभीर्यांचा अभाव असणाऱ्या या टोळक्यांतील ‘टाेळक्यांना’ कोण आवर घालणार? असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.

त्यांना पुन्हा ‘सतर्क’ करावे लागेल

वैयक्तिक पातळीवर बेलगाम वागत असलेल्या लोकांना आवर घालण्यासाठी गावपातळीवरच्या प्रशासनाला अ‍ॅक्टिव्ह करावे लागणार आहे. स्थानिक ग्रा. पं., कोरोना योद्धे, ग्रामरक्षा दल, पोलीस पाटील, कोतवाल यांनी संयुक्तरीत्या मोहीम हाती घ्यावी लागणार आहे. ग्रामस्तरावरील ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, शिक्षक यासह सर्व कर्मचाऱ्यांवर जबाबदारी देणे गरजेच आहे. हॉटस्पॉटवरून आलेले लोक, होम आयसोलेशन, हाय व लो रिस्क कॉन्टॅक्ट, कंटेन्टमेंट यावर ‘फोकस’ करणे गरजेचं आहे. तरच येणाऱ्या काळात वाढत्या आलेख उतरता होण्याची शक्यता आहे.