शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

पाच टन टोमॅटोचा वावरात लाल चिखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:35 IST

बालाजी अडसूळ / कळंब (जि. उस्मानाबाद) : यंदाच्या वर्षी केळी, बटाट्यांनी शेतक-यांना जेरीस आणलेच आहे. त्यापाठोपाठ आता टोमॅटो पिकानेही ...

बालाजी अडसूळ / कळंब (जि. उस्मानाबाद) : यंदाच्या वर्षी केळी, बटाट्यांनी शेतक-यांना जेरीस आणलेच आहे. त्यापाठोपाठ आता टोमॅटो पिकानेही शेतकऱ्यांची आर्थिक नाडी आवळली आहे. दर प्रचंड घसरल्याने अगदी काढणीसही न परवडणारा वाकडी शिवारातील पाच टनांच्या आसपास टोमॅटोचा वावरात पडून लाल चिखल तयार होतोय.

शेती क्षेत्रात बदल घडत आहेत. काळानुरूप पीक पद्धती कात टाकत आहे. यातील नवप्रयोगातून अनेक यशकथा समोर येत आहे. असे सुखद चित्र एकीकडे असले तरी शेती अन् यावर कायम घोंघावणाऱ्या संकटाचा काही केल्या काडीमोड होत नसल्याचे दिसून येत आहे.

केळी, बटाट्यापाठोपाठ आता अनेक गावातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचाही या हंगामात घसरलेल्या दराने मोठा भ्रमनिरास केला असल्याचे समोर आले आहे.

नफा अन् उत्पादन खर्च तर सोडा, काही तोड्यांचा काढणी खर्चही पदरी पडला नसल्याचे समोर आले आहे. वाकडी (केज) येथील परमेश्वर आण्णासाहेब कोल्हे, त्यांचे बंधू उत्रेश्वर, ज्ञानेश्वर यांनी दिवाळीत एकरभर क्षेत्रात नांगरणी, रोटर, शेणखत, बेड, भेसळढोस, मल्चिंग असे पूर्वमशागतीचे सोपस्कार पार पाडत टोमॅटोच्या अलंकार वाणाची ६ हजार रोपांची लागवड केली होती.

योग्यवेळी, योग्य ती काळजी घेत पीक जोपासले व वाढवले होते. जवळपास तिसेक हजाराचा खर्च करून बांबू, तार यांचा आधार दिला होता. मात्र, कष्टाने लगडलेल्या दर्जेदार मालास ‘मार्केट’ दाखवण्याची वेळ आली की भाव कोसळले. पंधरा-वीस रुपये किलोने जाणारा माल तीन, चार रुपयानेही जात नव्हता. यामुळे दीडेक लाख नफा राहिला बाजूला, उलट केलेला लाखभर खर्च ही वाया गेला.

पुन्हा लाल चिखलाची अनुभूती....

वाकडी गावाशेजारच्या हसेगाव येथील भूमिपूत्र असलेल्या प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशिव यांनी चार दशकांपूर्वी हतबल झालेल्या आबांने भरल्या बाजारात टोमॅटो पायदळी तुडवल्याचे विदारक चित्र आपल्या ‘लाल चिखल’ या गाजलेल्या कथेतून मांडले होते. याचीच पुनरावृत्ती लगतच्या व शिवेवरील वाकडीत पुन्हा झाली आहे. कोल्हे यांनी आपल्या रानात लगडलेल्या तोड्यातील जवळपास पाचेक हजार किलो माल शेतात काढून फेकला आहे. यामुळे सा-या वावरात लालगर्द टोमॅटोचा सडा पडला आहे.

काढणीचा खर्च ही हाती येईना...

यासंदर्भात उत्रेश्वर कोल्हे यांनी सांगितले की हंगामात आठ, दहा तोडे होत असतात. प्रारंभी माल कमी होता व भावही तसा खास नव्हता. पुढे वाढेल या आशेने खर्च सुरूच होता. मात्र, माल वाढत गेला तसा भाव कमी झाला. यामुळे शेवटी दहा-बारा मजुराकरवी काढलेला माल तोट्यात विकला चालला. यातून काढणीचा खर्च ही मिळणे कठीण झाले. यामुळे राहिलेल्या तीन, चार तोड्याचा माल पीक मोडत वावरात फेकला आहे.

लॉकडाऊनमधील कष्ट; पण मार्केट....

उत्रेश्वर कोल्हे व त्यांचा एक भाऊ इंजिनिअर आहेत. दोन्ही तरुण लॉकडाऊन काळात गावी आले अन् अडकले. यानंतर त्यांनी शेतात झोकून देत टोमॅटो पिकात लक्ष घातले. घरातील सर्वांच्या कष्टाने अपेक्षित मालही आणला. परंतु, त्यांचे हे प्रयत्न ‘मार्केट’ नावाच्या व्यवस्थेने फोल ठरवले.

080221\08osm_1_08022021_41.jpg

वाकडी (जि.उस्मानाबाद) येथील शेतकर्यांनी टोमॅटोचे दर घसरल्याने सुमारे पाच टनापेक्षाही अधिक माल असा शेतातच टाकून दिला आहे.