शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

इंदापूर येथे पाण्यासाठी रोखला राष्ट्रीय महामार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 5:00 PM

वाशी तालुक्यातील इंदापूर येथील अनेक महिलांसह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी आज सकाळी औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले़

इंदापूर (उस्मानाबाद ) : पाणीटंचाईमुळे संतापलेल्या झालेल्या वाशी तालुक्यातील इंदापूर येथील अनेक महिलांसह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी आज सकाळी औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले़ गावाला कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना राबवावी, अशी आक्रमक मागणी यावेळी महिलांसह ग्रामस्थांनी लावून धरली होती़

सहा हजार लोकसंख्येच्या इंदापूर गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ ग्रामपंचायतीच्या १० पैकी केवळ २ हातपंपांना पाणी येते़ अपुऱ्या पावसामुळे ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़ गावातील तीव्र पाणीटंचाई पाहता मनसेच्या वतीने यापूर्वी इंदापुरातील पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता़ प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांसमवेत गुरूवारी सकाळी औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बोरीपाी जवळ रास्तारोको आंदोलन केले़

यावेळी घागरी हातात घेऊन अनेक महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या़ यावेळी मनसे महिला आघाडीच्या प्रमुख वैशाली गायकवाड, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गपाट, सरपंच लक्ष्मी शिंदे, स्वाती गपाट, दत्ता बोंदर, बळीराज चेडे आदींनी मनोगत व्यक्त करीत शासन, प्रशासनाच्या कारभारावर टीका केली़ इंदापूर गावासाठी नांदगाव साठवण तलावातून कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना मंजूर करावी, अशी मागणी सर्वांनी लावून धरली होती़ तासभराच्या आंदोलनानंतर वाशी ठाण्याचे पोनि सतीश चव्हाण यांनी आंदोलकांना निवेदन देऊन आंदोलन थांबविण्याबात सूचित केले़

मात्र, निवेदन स्विकारण्यासाठी मंडळ अधिकारी आल्याचे पाहून महिलांनी आक्रमक पवित्रा घेत अधिकाऱ्यांना धारेवर धरले़ जोपर्यंत तहसीलदार येणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला़ त्यानंतर नायब तहसीलदार यादव यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलकांचे म्हणणे जाणून घेत निवेदन स्विकारले़ तसेच टंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्याचे व ग्रामस्थांच्या मागण्या वरिष्ठांपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले़ यावेळी मनसेचे सुरेश पाटील, दत्ता बोंदर, संतोष बारकूल, रोहिदास मारकड, वसंत बारकूल यांच्यासह ग्रामस्थ, विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला उपस्थित होत्या़

इंदापूर-गेलेगाव योजना बंदशासनाने सन १९९५-९६ मध्ये घोडकी तलावातून इंदापूर, गोलेगाव संयुक्त पाणीपुरवठा योजना राबविली होती़ साधारणत: नऊ कोटी पाच लाख रूपये खर्च करून राबविलेली ही योजना बंद  पडली आहे़ ही योजना बंद पडल्याने गावातील पाणीप्रश्न अधिकच बिकट होत आहे़

टॅग्स :agitationआंदोलनWaterपाणीOsmanabadउस्मानाबाद