शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

उस्मानाबाद जिल्ह्यात ‘जलयुक्त’ला निधी तुटवड्याचे ग्रहण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 8:31 PM

११८ कोटी ५१ लाख रूपये एवढ्या निधीची गरज असताना आजअखेर केवळ ३२ कोटी रूपये शासनाने उपलब्ध करून दिले

ठळक मुद्दे११८ कोटी रूपयांची गरज प्रत्यक्षात दोन वर्षात मिळाले अवघे ३२ कोटी

उस्मानाबाद : मोठा गाजावाजा करीत राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले. सुरूवातीचे काही वर्ष मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येत होता. परंतु, मागील दोन वर्षांपासून या अभियानाला निधी तुटवड्याचे ग्रहण लागले आहे. २०१७-२०१९ या कालावधीत सुमारे ११८ कोटी ५१ लाख रूपये एवढ्या निधीची गरज असताना आजअखेर केवळ ३२ कोटी रूपये शासनाने उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे ‘जलयुक्त’अंतर्गतच्या कामांचा वेग मंदावल्याचे चित्र पहावयास मिळते.

एक -दोन वर्षाआड उद्भवणारी दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन विद्यमान राज्यसरकारने जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले. या अभियानाअंतर्गत सन २०१७-१८ कंपार्टमेंट बंडींग, खोल सलग समतल चर, शेततळे, तुषार सिंचन, रिर्जा शाफ्ट, वृक्ष लागवड, जलशोषक पाणी खंदक, पाझर तलाव दुरूस्ती, कोल्हापुरी बंधारे दुरूस्ती आदी ३८ प्रकारची सुमारे ५ हजार ५५३ कामांना मंजुरी देण्यात आली होती. प्रशासकीय मंजुरीनंतर उपरोक्त कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले. शासनाने घालून दिलेल्या मुदतीमध्ये ५ हजार ५०३ कामे पूर्ण करण्यात आली. तर अठरा कामे प्रगतीपथावर असून ३२ कामे शिल्लक आहे.

कार्यारंभ आदेश दिलेल्या सर्व कामांसाठी मिळून तब्बल ९१ कोटी ६९ लाख रूपये एवढ्या निधीची आवश्यकता होती. परंतु, दोन वर्षांचा कालावधी सरत आला असतानाही मंजूर रक्कम उपलब्ध झाली नाही. शासनाने आजवर केवळ ३४ कोटी २४ लाख रूपयांवरच बोळवण केली आहे. आजही सुमारे ५७ कोटी ४७ लाख रूपये एवढा निधी शासनाकडून उपलब्ध होणे बाकी आहे.

दरम्यान, असे असतानाच चालू आर्थिक वर्षात म्हणजेच २०१८-१९ मध्ये १ हजार ९१९ कामांना मंजुरी देण्यात आली. या सर्वच कामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर १ हजार १५८ कामांना सुरूवात करण्याचे आदेश देण्यात आले. ही सर्व कामे पूर्ण करण्यासाठी सुमारे २६ कोटी ८२ लाख रूपयांची गरज आहे. परंतु, आर्थिक वर्ष सरण्यास केवळ अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी उरलेला असताना शासनस्तरावरून छदामही उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे कामांची गतीही मंदावली आहे. कार्यारंभ आदेश दिलेल्यांपैकी केवळ ७३२ कामांना सुरूवात करण्यात आली आहे.

आजघडीला यापैकी अवघी ४११ कामे पूर्ण झाली आहेत. तर ३२१ कामे प्रगतीपथावर आहेत. या सर्व कामांवर मिळून ८ कोटी ४० लाखांचा खर्च झाला आहे. हाही निधी अन्य ‘हेड’चा असल्याचे कृषी विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले. म्हणजेच चालू आर्थिक वर्षात शासनाने जलयुक्तसाठी छदामही उपलब्ध करून दिलेला नाही. २०१७-१९ या दोन वर्षातील पूर्ण झालेली कामे आणि उपलब्ध निधीवर नजर टाकली असता, ११८ कोटी ५१ लाखापैकी केवळ ३२ कोटी रूपये एवढा अल्प निधी मिळाला आहे. निधी उपलब्धतेची गती अशीच राहिल्यास कामे पूर्ण होणार कधी? असा सवाल उपस्थित होत आहे.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारOsmanabadउस्मानाबादfundsनिधी