शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
2
“भारतात राहणाऱ्या विरोधी पक्षनेत्याची देशाला गरज”; राहुल गांधींचे परदेश दौरे अन् भाजपाची टीका
3
‘तुम्हाला स्वप्नात पाहिलंय, कॉल करा ना?’, महिला DSP चं मधाळ चॅट आणि करोडपती झाला कंगाल
4
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये कधी मिळणार?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा
5
गोवा क्लब अग्निकांड: थायलंडमधून प्रत्यार्पण टाळण्यासाठी लूथरा बंधूंची कोर्टात धाव; वकिलांचा अजब युक्तिवाद
6
बाजार सलग तिसऱ्या दिवशी कोसळला! फेड रिझर्व्हच्या धास्तीने १.०९ लाख कोटींचे नुकसान; काय आहे कारण?
7
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
8
रोहित शर्मा नवा 'सिक्सर किंग'! पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी म्हणतो, "जो विक्रम झालाय तो..."
9
'असा पती कुणालाच भेटू नाही', परागचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध, व्हाट्सॲप स्टेट्‍स ठेवून सरिताने...   
10
‘चल धरणावर जाऊया’, तरुणाने तरुणीला व्हॉट्सॲपवर पाठवला मेसेज, त्यानंतर घडलं भयंकर
11
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
12
मोबाईल रिचार्जपेक्षा कमी किमतीत गुगलने लॉन्च केला सर्वात स्वस्त 'AI Plus Plan'! ChatGPT चे मार्केट खाणार?
13
सोशल मीडियाचा नाद लय बेक्कार! मुलांवर घातक परिणाम, अतिरेकी वापर म्हणजे धोक्याची घंटा
14
मज्जा! 'या' गावातल्या बायकांना स्वयंपाकाचं टेंशनच नाही, वाचून म्हणाल 'मलाही तिथे राहायचंय!'
15
तुम्ही हे होऊच का दिले? इंडिगो संकटावर हायकोर्टाने सरकारला फटकारले; प्रवाशांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश
16
जुने बँक खाते बंद करताय? थांबा! 'या' ५ चुका केल्यास तुमच्या खिशातून कापले जातील एक्स्ट्रा चार्ज
17
Nagpur Crime: अधिवेशन सुरू असताना नागपुरात रक्ताचा सडा, तरुणाची सपासप वार करत हत्या
18
“८ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी करा”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश
19
Car Offers: निसान मॅग्नाइट, होंडा एलिव्हेटसह 'या' लोकप्रिय मॉडेल्सवर ३.२५ लाखांपर्यंत सूट!
20
अविवाहित मुलीच्या संपत्तीचा खरा वारसदार कोण? कायद्यानुसार कोणाचे असतात प्रथम अधिकार?
Daily Top 2Weekly Top 5

कोणीही मरायचं नाय, सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेऊ: मनाेज जरांगे

By बाबुराव चव्हाण | Updated: October 5, 2023 14:44 IST

संयम साेडू नका, उग्र आंदाेलन तर मुळीच नको, मनोज जरांगे यांचे आवाहन

धाराशिव : मराठा समाजाच्या पाेरांना शिक्षण आणि नाेकरीत आरक्षण मिळावं, म्हणून हा लढा सुरू केला आहे. आणि आपणच जर आत्महत्येसारखे टाेकाचे पाऊल उचलून जीवन संपविणार असाल तर हे आरक्षण काेणासाठी मिळवायचं? त्यामुळं यापुढं काेणीही मरायचं नाही अन् संयमही साेडायचा नाही. उग्र आंदाेलन तर मुळीच नकाे. शांततेच्या मार्गाने सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेऊ, असा शब्द मनाेज जरांगे पाटील यांनी दिला.

धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चाैकात संवाद यात्रेदरम्यान गुरूवारी झालेल्या सभेत ते बाेलत हाेते. जरांगे पाटील म्हणाले, आपण सरकारला ४ दिवसांची मुदत दिली हाेती. चार दिवसांतही आरक्षण देता येतं. मात्र, सरकारने आपणाकडून वेळ मागितला. ३० दिवसांचा वेळ द्या, टिकणारं आरक्षण देऊ, असं त्यांनी शब्द दिला. टिकणारं आरक्षण देणार असाल तर आणखी दहा दिवस घ्या, म्हणून आपण सरकारला चाळीस दिवस दिले. ही मुदत जवळ आली आहे. आता समितीतले लाेक राेज विमानं घेऊन हैदराबा, मुंबई, छत्रपती संभाजीनगरला पळताहेत. माघारी येऊन काहीच सापडलं नाही, असं म्हणताहेत.

तिथं माेडी, फारशी भाषेत लिहिलेलं आहे. या पठ्ठ्यांना या भाषाच येत नसेल तर नाेंद कशी सापडेल. यानंतर आम्ही संशाेधकांना साेबत घेण्याचा मुद्दा मांडल्यानंतर लगेच ५ हजार नाेंदी सापडल्याचं सांगण्यात आलं. आता लगेच कशा सापडल्या नाेंदी? सरकारचं म्हणणं हाेतं, कायदा पारित करण्यासाठी आधार लागताे. आता मराठा आणि कुणबी हे एकच आहेत, असा ५ हजार पानांचा भलामाेठा आधार मिळाला आहे. या सरकारला आणखी किती माेठा आधार हवा आहे? आरक्षणासाठी काय ट्रभर आधार लागताे का, असा सवाल करीत या नाेंदीच्या आधारेच टिकणारं आरक्षण देता येतं, अशी ठाम भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

कुणी काही म्हटलं तरी आपल्यात फुट पडू द्यायची नाही. आणि काेणी मरायचंही नाही. आत्महत्येसारखं टाेकाचं आपण पाऊल उचलणार असू तर हे आरक्षण मिळवायचं काेणासाठी? साेबतच कुठल्याही परिस्थितीत तसूभरही संयम ढळू द्यायचा नाही. उग्र स्वरूपाचे आंदाेलन तर मुळीच नकाे. अशा आंदाेलनामुळं आपण सुरू केलेला हा संघर्ष, लढा, आंदाेलन बदनाम हाेईल. साेबतच आपल्या पाेरांवर कसेस पडतील. त्यांना पुढं शिक्षण आणि नाेकरीवेळी अडचण येईल. त्यामुळं या मार्गानं काेणीही जायचं नाही. शांततेच्या मार्गानंच सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेऊ, असा ठाम विश्वासही त्यांनी उपस्थित जनसमुदायास दिला. यावेळी चाैकात फाय ठेवायलाही जागा नव्हती.

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणOsmanabadउस्मानाबाद