शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
4
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
5
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
6
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
7
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
8
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
9
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
11
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
12
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
13
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
14
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
15
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
16
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
17
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
18
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
19
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
20
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर

कोणीही मरायचं नाय, सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेऊ: मनाेज जरांगे

By बाबुराव चव्हाण | Updated: October 5, 2023 14:44 IST

संयम साेडू नका, उग्र आंदाेलन तर मुळीच नको, मनोज जरांगे यांचे आवाहन

धाराशिव : मराठा समाजाच्या पाेरांना शिक्षण आणि नाेकरीत आरक्षण मिळावं, म्हणून हा लढा सुरू केला आहे. आणि आपणच जर आत्महत्येसारखे टाेकाचे पाऊल उचलून जीवन संपविणार असाल तर हे आरक्षण काेणासाठी मिळवायचं? त्यामुळं यापुढं काेणीही मरायचं नाही अन् संयमही साेडायचा नाही. उग्र आंदाेलन तर मुळीच नकाे. शांततेच्या मार्गाने सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेऊ, असा शब्द मनाेज जरांगे पाटील यांनी दिला.

धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चाैकात संवाद यात्रेदरम्यान गुरूवारी झालेल्या सभेत ते बाेलत हाेते. जरांगे पाटील म्हणाले, आपण सरकारला ४ दिवसांची मुदत दिली हाेती. चार दिवसांतही आरक्षण देता येतं. मात्र, सरकारने आपणाकडून वेळ मागितला. ३० दिवसांचा वेळ द्या, टिकणारं आरक्षण देऊ, असं त्यांनी शब्द दिला. टिकणारं आरक्षण देणार असाल तर आणखी दहा दिवस घ्या, म्हणून आपण सरकारला चाळीस दिवस दिले. ही मुदत जवळ आली आहे. आता समितीतले लाेक राेज विमानं घेऊन हैदराबा, मुंबई, छत्रपती संभाजीनगरला पळताहेत. माघारी येऊन काहीच सापडलं नाही, असं म्हणताहेत.

तिथं माेडी, फारशी भाषेत लिहिलेलं आहे. या पठ्ठ्यांना या भाषाच येत नसेल तर नाेंद कशी सापडेल. यानंतर आम्ही संशाेधकांना साेबत घेण्याचा मुद्दा मांडल्यानंतर लगेच ५ हजार नाेंदी सापडल्याचं सांगण्यात आलं. आता लगेच कशा सापडल्या नाेंदी? सरकारचं म्हणणं हाेतं, कायदा पारित करण्यासाठी आधार लागताे. आता मराठा आणि कुणबी हे एकच आहेत, असा ५ हजार पानांचा भलामाेठा आधार मिळाला आहे. या सरकारला आणखी किती माेठा आधार हवा आहे? आरक्षणासाठी काय ट्रभर आधार लागताे का, असा सवाल करीत या नाेंदीच्या आधारेच टिकणारं आरक्षण देता येतं, अशी ठाम भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

कुणी काही म्हटलं तरी आपल्यात फुट पडू द्यायची नाही. आणि काेणी मरायचंही नाही. आत्महत्येसारखं टाेकाचं आपण पाऊल उचलणार असू तर हे आरक्षण मिळवायचं काेणासाठी? साेबतच कुठल्याही परिस्थितीत तसूभरही संयम ढळू द्यायचा नाही. उग्र स्वरूपाचे आंदाेलन तर मुळीच नकाे. अशा आंदाेलनामुळं आपण सुरू केलेला हा संघर्ष, लढा, आंदाेलन बदनाम हाेईल. साेबतच आपल्या पाेरांवर कसेस पडतील. त्यांना पुढं शिक्षण आणि नाेकरीवेळी अडचण येईल. त्यामुळं या मार्गानं काेणीही जायचं नाही. शांततेच्या मार्गानंच सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेऊ, असा ठाम विश्वासही त्यांनी उपस्थित जनसमुदायास दिला. यावेळी चाैकात फाय ठेवायलाही जागा नव्हती.

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणOsmanabadउस्मानाबाद