शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Killari Earthquake : एकटा असायचो तेव्हा मी रडायचो - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 14:59 IST

लातूर-उस्मानाबादला भूकंप झाला तेव्हा या भागातील बाधितांना मदतीसोबतच धीर देत फिरत होतो.

उस्मानाबाद - लातूर-उस्मानाबादला भूकंप झाला तेव्हा या भागातील बाधितांना मदतीसोबतच धीर देत फिरत होतो. त्यांच्यात आत्मविश्वास जागविण्याचे काम करीत होतो. पण जेव्हा एकांतात जायचो, तेव्हा मन सुन्न करणारी स्थिती डोळ्यासमोर तरळायची अन् पाणी आपसूकच गळायचे, असे भावोद्गार शरद पवार यांनी बलसुर (जि. उस्मानाबाद) येथे काढले.

भूकंपाला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त बलसुर ग्रामस्थांनी त्यावेळी मदतीसाठी आधी धावून आलेल्या तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांचा कृतज्ञता सोहळा रविवारी आयोजित केला होता. यावेळी पवारांनी त्यावेळच्या परिस्थितीला, आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, त्या दिवशी राज्यातील विसर्जन मिरवणुकीचा आढावा घेत कार्यालयात बसलो होतो. अडीच वाजेपर्यंत बहुतेक जिल्ह्यातील मिरवणूक पार पडल्या होत्या. परभणीत थोडी गडबड सुरू होती. ती मिटल्याचा निरोप मिळाल्यानंतर 3.30 वाजण्याच्या सुमारास झोपण्यासाठी निघालो तोच खिडक्या जोरात वाजल्या. भूकंपाची जाणीव झाली. तेव्हा कोयनेवर भूकंप मापन यंत्रणा होती. तेथे फोन केल्यावर कळले केंद्र किल्लारीचे होते. तेव्हा तातडीने विमान तयार ठेवण्यास सांगून निघण्याची तयारी सुरू केली. सकाळी 6 ला लातूरला पोहोचलो. तेथून भूकंपग्रस्त भाग गाठला. पाहतो तर सर्वत्र हाहाकार उडाला होता. 

प्रेताचे खच दिसत होते. सुन्न करणारे चित्र नजरेसमोर होते. अशावेळी वाचलेल्या लोकांना धीर देण्यास सुरुवात केली. जखमींना उपचारासाठी शेजारच्या जिल्ह्यातून वैद्यकीय सेवा मागविली. पाठोपाठ अन्न-पाण्याची सोय अन् मग तात्पुरते निवारे उभारण्याचे काम सुरू केले. पुढे चांगल्या पद्धतीने गावांचे पुनर्वसन करण्यात आले. यात केंद्र, राज्य सरकार, संस्था, नागरिकांनी मोलाची कामगिरी केली. आज इथली माणसे सन्मानाने उभी राहिली, याचा आनंद वाटतो, असे उद्गारही पवार यांनी काढले. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मंत्री डॉ. पदमसिंह पाटील यांचाही मानपत्र देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली, तर दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे मानपत्र त्यांचे पुत्र आमदार अमित देशमुख यांनी स्वीकारले.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारKillari Earthquakeकिल्लारी भूकंपNCPराष्ट्रवादी काँग्रेस