शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकी वसुलीसाठी महावितरण अधिकाऱ्यांची दारोदार भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:36 IST

वाशी : ५ कोटी २० लाख रुपयांच्या थकीत वीजबिल वसुलीसाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांसह कर्मचारीही आता दररोज ग्राहकांच्या दारात जात असून, ...

वाशी : ५ कोटी २० लाख रुपयांच्या थकीत वीजबिल वसुलीसाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांसह कर्मचारीही आता दररोज ग्राहकांच्या दारात जात असून, चालू महिन्यात ४० लाखांची वसुली करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय अभियंत्यांनी दिली़ दरम्यान, तालुक्यात ग्राहकांच्या सेवेसाठी वीज कंपनीचे दोन विभाग असून, तिसऱ्या विभागाचीही निर्मिती करावी, अशी मागणी ग्राहकांमधून होत आहे़

वाशी तालुक्यातील पारगाव व वाशी असे दोन विभाग असून, या दोन्ही विभागाअंतर्गत औद्योगिकच्या १३३ ग्राहकांकडे ५३ लाख ५७ हजार, निवासी ७ हजार ९६७ ग्राहकांकडे ४ कोटी ३३ लाख तर वाणिज्यच्या ४४४ ग्राहकांकडे ४७ लाख ९७ हजार अशी थकबाकी आहे. त्यामुळे वीज कंपनीचे उपविभागीय अभियंता रमेश शेंद्रे हे सहकाऱ्यांसह वीजबिलाच्या वसुलीसाठी दारोदार फिरताना दिसून येत आहेत़ चालू महिनाभरात चाळीस लाखांची वसुली झाली असून, ती नगण्य असल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार वसुलीची तगादा विद्युत ग्राहकांना लावला जात आहे़ उपरोक्त थकबाकीशिवाय तालुक्यात पाणीपुरवठ्याचे ८३ ग्राहक आहेत. त्यांच्याकडे ७ कोटी १० लाख, दिवाबत्तीच्या ७९ ग्राहकांकडे १९ कोटी तर शेतीपंपाच्या ९ हजार ८०९ ग्राहकांकडे ९५ कोटी ७७ लाख रूपये थकबाकी अडकली आहे़ शासनाच्या वतीने विविध विद्युतबिलाच्या थकबाकीसाठी योजना जाहीर केल्या तरी विद्युतग्राहक वीज कंपनीच्या याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नाइलाजास्तव वीजबिलाची वसुली न दिल्यास विद्युतपुरवठा खंडित करावा लागत असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, तालुक्याची निर्मिती झाल्यानंतर भूम व कळंब तालुक्यांतील ५४ गावांचा तालुका झाला़ लोकसंख्या, विद्युत ग्राहक यांच्या तुलनेनुसार तीन विभाग असणे गरजेचे आहे़ सध्या पारगाव व वाशी असे दोन विभाग असून, तालुक्यातील वाढलेल्या ग्राहकांची संख्या लक्षात घेता तालुक्यातील विद्युत ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी तेरखेडा येथे तिसऱ्या विभागाच्या निर्मितीची गरज ग्राहकांमधून व्यक्त केली जात आहे.

अडचणी सुटेनात...

सहा महिन्यांपूर्वी तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी वीज कंपनीच्या योजनेमध्ये सहभागी होत बिलाचा भरणा करून वीजबिल ‘झिरो’ केले होते. मात्र, यानंतर शेतीपंपाचा वापर चालू नसतानाही अनेक शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा वीजबिले देण्यात आली आहेत. याची चौकशी करण्यासाठी काही शेतकरी वीज कंपनीच्या दारात गेले असता कर्मचाऱ्यांकडून त्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे त्यांची वीजबिलाची अडचण अजूनही कायम असून, असे प्रश्न तत्काळ मार्गी लावावेत, अशी मागणी काही शेतकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.