शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

कळंबमधील ‘तो’ फेर बेकायदेशीर : उपविभागीय अधिकाऱ्यांना अहवाल सादर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 6:10 PM

शहरातील जवळपास दिडशे भुखंडधारकांची झोप उडवणारा तो फेर बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कळंब (उस्मानाबाद) : शहरातील जवळपास दिडशे भुखंडधारकांची झोप उडवणारा तो फेर बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या खुलाशावरून कळंबच्या तहसीलदांरानी उपविभागीय अधिकारी यांना आपला अहवाल पाठवला असून यात फेर बेकायदेशीर असल्याचे व संबंधीत कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे नमूद केले आहे.

कळंब शहरातील सावरगाव भागातील सर्व्हे क्र. १०१ च्या सातबारावरील मालकी हक्कात काही नवीन लोकांची नावे समाविष्ट करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. कळंब येथील तलाठी कायार्लायने नोंद घेतलेल्या व तत्कालीन मंडळ अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेल्या फेर क्रमांक ५४९१ नुसार मालकीहक्कात हा बदल झाला होता. यामुळे मूळ मालकाकडून खरेदी घेण्यात आलेल्या शंभर ते दीडशेवर भूखंडधारकांची झोप उडाली होती. 

या प्रकरणाच्या सर्व नक्कला काढल्यानंतर कळंब तलाठी कार्यालयात चुकीच्या कागदपत्राच्या आधारे ही बेकायदेशीर नोंद घेतल्याचा आरोप करत ३ डिसेंबर रोजी संतप्त झालेल्या भुखंडधारकांनी सात दिवसांच्या आत यात दुरूस्ती करावी, अन्यथा आत्मदहन करू असा इशारा दिला होता. यानंतरही काहीच कार्यवाही न झाल्याने ७ डिसेंबरला भूखंडधारकांनी तहसील व तलाठी कार्यालयात ठिय्या मांडला होता. दरम्यान,कळंबच्या उपविभागीय अधिकारी यांनी ६ डिसेंबर रोजी तहसीलदार यांना याविषयी कचरू टकले व इतरांच्या प्राप्त झालेल्या तक्रारीवरून अहवाल मागितला होता.  

कळंबचे तलाठी एस. एस. बिक्कड व मंडळ अधिकारी टी. डी. मटके यांनी मुद्देनिहाय व स्वयंस्पष्ट अहवाल तहसील कार्यालयात सोमवारी सादर केला. त्यानुसार  मंडळ अधिकारी व तलाठी यांनी फेर क्रमांक ५४१९ नजरचुकीने नोंदवला व प्रमाणित करण्यात आल्याचे कबूल केले आहे. याशिवाय संबंधीत सहधारकांना व जमीन मालकांना नोटीस देणे गरजेचे असतांना देण्यात आलेल्या नसल्याने, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील तरतूदीनुसार तो फेर झाला नसल्याचे नमूद केले आहे. यामुळे तलाठी एस. एस. बीक्कड व मंडळ अधिकारी आर. जी. देवकर यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ अन्वये कारवाई करण्याची शिफारस केली आहे. हा अहवाल उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.

टॅग्स :TahasildarतहसीलदारOsmanabadउस्मानाबाद