शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

बांधकाम कामगारांचे अनेक प्रश्न रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:37 IST

उस्मानाबाद : इमारत बांधकाम कामगारांच्या नोंदणी, नूतनीकरणाची प्रकरणे व विविध योजनांचे अर्ज येथील सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात २०१८ पासून ...

उस्मानाबाद : इमारत बांधकाम कामगारांच्या नोंदणी, नूतनीकरणाची प्रकरणे व विविध योजनांचे अर्ज येथील सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात २०१८ पासून प्रलंबित आहेत. ही प्रकरणे तातडीने मार्गी लावावीत, अशी मागणी स्वतंत्र मजूर जनरल बांधकाम कामगार संघटनेने सरकारी कामगार अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, येथील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कार्यालयाकडे जानेवारी २०२१ पासून नोंदणी व नूतनीकरण अर्ज व २०१८ पासून विविध योजनांचे अर्ज प्रलंबित आहेत. या संदर्भात संघटनेमार्फत वारंवार चर्चा व निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. परंतु, संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत असल्यामुळे ती प्रकरणे धूळखात पडली आहेत. विशेष म्हणजे, एक त्रुटी पूर्ण केली की लगेच दुसरी नवीन त्रुटी टाकली जाते. त्यामुळे कामगारांचा वेळ आणि पैसा वाया जातो. तसेच सहाय्यक आवश्यक असलेली कागदपत्रे स्पष्ट असताना सुद्धा अस्पष्ट असा शेरा दिला जातो. ज्या कागदपत्रांची आवश्यकताच नाही अशी कागदपत्रे मागितली जातात.

नोंदणी नूतनीकरणाचे अर्ज निकाली काढताना येथील अधिकाऱ्यांचे एकमत होत नसल्यामुळे कामगारांची कामे खोळंबली असल्याचा आरोप निवेदनात केला आहे.

सुरक्षा संच व अत्यावश्यक संच आणि आरोग्य तपासणी होऊन एक वर्ष होऊनही कामगारांना अद्यापपर्यंत संच देखील वाटप करण्यात आलेले नाहीत. कामगारांचे प्रश्न येत्या १५ दिवसांमध्ये न सोडविल्यास या कार्यालयासमोर संघटनेच्यावतीने हलगीनाद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद भालेराव, दादा गवळी, एजाज सय्यद व परमेश्वर वाघमारे यांच्या सह्या आहेत.