शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

Lok Sabha Election 2019 : उस्मानाबादेत प्रचार सभांमधून 'कार्टून स्ट्राईक'; प्रचाराची पातळी पहिल्याच टप्प्यात घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 1:57 PM

उमेदवारांवर वैयक्तिक टीका हेच लक्ष्य

- चेतन धनुरे 

उस्मानाबाद : लोकसभा निवडणुकीचा आखाडा आता हळूहळू तापायला लागला आहे. सर्वच उमेदवार प्रचाराला लागले आहेत. दरम्यान, महाआघाडी व महायुतीच्या समर्थकांनी एकमेकांवर कार्टून स्ट्राईक करीत वैयक्तिक लक्ष्य केले आहे. पहिल्याच टप्प्यातील या हल्ल्याने प्रचाराची पातळी पुढे आणखी किती घसरू शकेल, याचा अंदाज येऊ शकेल.उस्मानाबाद मतदारसंघात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या पाटील व राजेनिंबाळकर घराण्यात लढत होत आहे. नात्याने चुलत भाऊ असले तरी मागच्या पिढीपासून चालत आलेले वैर महायुतीचे उमेदवार ओम राजेनिंबाळकर व महाआघाडीचे उमेदवार राणा पाटील यांनी पुढेही तितक्याच त्वेषाने जपले आहे. कारखाना, बँक, स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुकातून हा कट्टर विरोध जपला गेला आहे. त्यामुळेच खालीही अत्यंत चुरस लागलेली असते. इतकेच नव्हे तर मागील तीन विधानसभा निवडणुकीपासून या दोन घराण्यात आरपारची लढाई लढली जात आहे. त्यांच्या कुटुंबातील ही 'जानी दुश्मनी' स्वाभाविकच निवडणुकीत वैयक्तिक घेतली जाते. त्यामुळे विखारी टिकेने प्रचाराची सुरुवात होते अन शेवटही. अगदी या दोघांपेक्षाही त्यांचे समर्थकच जास्त 'जाळ अन धूर' काढीत असतात.

विधानसभेत दोन वेळा या दोघांत सामना झाला असला तरी, यावेळच्या लोकसभा निवडणुकीत हे दोघे पहिल्यांदाच आमनेसामने आले आहेत. दोघांचीही उमेदवारी एकाच दिवशी जाहीर झाली अन वैयक्तिक टीकेची ठिणगी पडली. काही महिन्यापूर्वीच राष्ट्रवादीच्या एका समर्थकाने ओम राजेनिंबाळकर यांच्यावरील एक कार्टून प्रसृत केले होते. तेरणा कारखान्याचे साहित्य विक्रीला काढल्याचे दर्शवून 'भंगारचोर' अशी खालच्या पातळीवरील उपाधी कार्टून मध्ये बहाल केली होती. त्यांची उमेदवारी जाहीर होताच हे कार्टून पुन्हा बाहेर पडले. सोशल मीडियावर ते जोरात फिरू लागले. या स्ट्राईकने घायाळ झालेल्या राजेनिंबाळकर समर्थकांनीही कार्टूनचेच अस्त्र बाहेर काढत राणा पाटील यांना लक्ष्य केले. पहिल्यांदा त्यांनी बँक, कारखाना व इतर काही संस्था विक्रीस काढल्याचे कार्टून बाहेर काढले. यानंतर महत्वाची पदे आपल्याकडेच ठेवून घेत कार्यकर्त्यांना सतरंज्या उचलण्याचे आदेश देतानाचे कार्टून प्रसृत केले गेले. एकूणच पहिल्या टप्प्यात सुरू झालेले हे 'कार्टून स्ट्राईक' निवडणूक कुठल्या दिशेने नेणार, याची प्रचिती देणारे ठरत आहे.

'विकास' पुन्हा हरवणार?वैयक्तिक उणीदुणी वरच भर ठेवण्याची उस्मानाबादेतील प्रचाराची परंपराच राहिली आहे. विकासाचे मॉडेल तयार करण्याचा किंबहुना तो किमान प्रचारात समजून सांगण्याचाही प्रघात नाही. नव्या दमाची पिढी ही परंपरा पुसून विकासाच्या  गप्पा मारतील, बाहेर जाणारे बेरोजगार तरुणांचे लोंढे थांबवतील, अशी आशा अजूनही आहे. मात्र, त्यांच्या हुल्लडबाज समर्थकांना आवरणार कोण? हा ही मोठाच प्रश्न आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९osmanabad-pcउस्मानाबादNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना