शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

निरक्षर सालगड्याला केले शाळेवर शिपाई, पगार उचलली मात्र दुसऱ्यांनीच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 18:41 IST

कळंब तालुक्यातील देवळाली येथील जागृती विद्यामंदिर येथे गावातीलच गुणवंत राऊत या व्यक्तीची तो निरक्षर असतानाही संस्थाचालकांनी शिपाई म्हणून नियुक्ती केली होती.

उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील देवळाली येथील एका शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्याने गावातीलच एका निरक्षर व्यक्तीस अंधारात ठेवून शिपाई म्हणून नेमणूक केली. शिवाय, मागील पाच वर्षांपासून त्याचा पगारही पदाधिकारी उचलत असल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने वेतन थांबवून चौकशी सुरु केली आहे.

कळंब तालुक्यातील देवळाली येथील जागृती विद्यामंदिर येथे गावातीलच गुणवंत राऊत या व्यक्तीची तो निरक्षर असतानाही संस्थाचालकांनी शिपाई म्हणून नियुक्ती केली होती. त्यास तत्कालीन शिक्षणाधिकारी यांच्याकडून मान्यताही घेतली होती. दरम्यान, ही शाळा २०१६ साली २० टक्क्याने अनुदानित झाली. तेव्हापासून नोव्हेंबर २०२०पर्यंत राऊत यांचे २० टक्के वेतन उचलले गेले. यानंतर नोव्हेंबर २०२०पासून शाळेला ४० टक्के अनुदान सुरु झाले. त्याप्रमाणे यापुढे राऊत यांच्या नावे वेतन उचलले गेले आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गटनेते महेंद्र धुरगुडे यांनी प्रश्न विचारल्यानंतर चौकशी समितीचे गठन करण्यात आले. या समितीने केलेल्या चौकशीत तथ्य आढळून आले आहे. गुणवंत राऊत यांना अंधारात ठेवून त्यांच्या नावे वेतन उचलले गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता कारवाईचा बडगा उचलला जात आहे. तेव्हा या शाळेवर, संस्थेवर नेमकी काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.

सुनावणीनंतर कारवाईचा निर्णय जागृती विद्यामंदिरात नियुक्ती देण्यात आलेले गुणवंत राऊत हे निरक्षर आहेत. राऊत यांना आपली नियुक्ती शाळेवर असल्याचे माहीत नव्हते व त्यांचे वेतन कोणी उचलले हेही माहीत नसल्याचे चौकशीत त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, हे पद रद्द करण्याच्या अनुषंगाने शिक्षण उपसंचालकांकडे प्रस्ताव देण्यात आला असून, २७ जानेवारीला यावर सुनावणी होणार आहे. या सुनावणीनंतरच शाळा, संस्थेवर नेमकी काय कारवाई अनुसरायची, याबाबत निर्णय घेण्यात येईल.-गजानन सुसर, शिक्षणाधिकारी

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादEducationशिक्षणSchoolशाळा