शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
3
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
4
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
5
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा खोचक टोला
6
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
7
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
8
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
9
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
10
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
11
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
12
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
13
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
14
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
15
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
16
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
17
नेपाळमध्ये पंतप्रधान होताच बालेन शाह यांचा 'भारतविरोधी' अवतार! ४५ दिवसांत घेतले ४ मोठे निर्णय
18
Hardik Pandya: हार्दिक पांड्याने आधी अनफॉलो केलं, मग फॉलो केलं; गोंधळावर मुंबई इंडियन्सने दिली प्रतिक्रिया
19
Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!
Daily Top 2Weekly Top 5

गॅस दरवाढीने जेवणासाठी गृहिणींचा मोर्चा चुलीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:33 IST

उस्मानाबाद : सर्वसामान्यांना गॅस सिलिंडरचा वापर करता यावा, म्हणून पंतप्रधान उज्ज्वला योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेतंर्गत जिल्ह्यातील ९६ ...

उस्मानाबाद : सर्वसामान्यांना गॅस सिलिंडरचा वापर करता यावा, म्हणून पंतप्रधान उज्ज्वला योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेतंर्गत जिल्ह्यातील ९६ हजार ५९८ कुटूंबाना मोफत गॅस कनेक्शन जोडणी दिली आहे. गॅसच्या किंमती वाढल्याने दारिद्र्य रेषेखालील अनेक कुटुंबे चुलीकडे वळले आहेत.

धुरापासून डोळ्यांचे आजार उद्भवण्याचा अधिक धोका असतो. तसेच श्वसनाचे विकारही जडू शकतात. शिवाय, धुरामुळे प्रदूषणही वाढत असते. ही बाब लक्षात घेऊन पंतप्रधानांनी उज्ज्वला योजना कार्यान्वित केली आहे. दुसरा टप्पा सुरू झाला आहे. यात काही अटींमध्ये सवलत देण्यात आलेली आहे. कोणतीही रक्कम न भरता अल्प उत्पन्न असलेल्या कुटूंबाना गॅस जोडणी दिली जात आहे. जिल्ह्यात अद्यापपर्यंत या योजनेंतर्गत ९६ हजार ५९८ कुटूंबांना गॅस जोडणी देण्यात आली आहे. मात्र, गॅसच्या किमती वाढत असल्याने सर्वसामान्यांना गॅस परवडेनासा झाला आहे. त्यामुळे अनेक कुटूंब चुलीकडे वळले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत मिळालेले उज्ज्वला कनेक्शन

९६५९८

गॅस सिलेंडरचे दर

जानेवारी २०१९ ५५०

जानेवारी २०२० ५९५

जानेवारी २०२१ ७१०

ऑगस्ट २०२१ ८५१

सिलेंडर भरणे कसे परवडणार

शासनानाने उज्ज्वला गॅस कनेक्शन मोफत दिला आहे. मागील दोन वर्षापूर्वी सिलिंडरचे दर कमी होते. तसेच सबसिडीही मिळत होती. मात्र सध्या सबसिडी कमी मिळत आहे. त्याचबरोबर दरही वाढले आहेत. त्यामुळे आता चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे.

सुरेखा सोनवणे

गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यात गॅसचे दर वरचेवर वाढत आहेत. यामुळे महिलांचे गणित बिघडत आहे.

महानंदा राऊत

सामान्य माणसाला आता कोरोना संकटात जगणे अवघड झाले आहे. सरकारकडूनही महागाई कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत.

कामिनी देवकते