शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

भुयारी गटार योजनेविरुद्धची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली, कोर्टाने ओढले कडक ताशेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 10:39 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने उपनगराध्यक्ष अभय इंगळे आणि नगरसेवक उदय निंबाळकर यांची आक्षेप याचिका फेटाळू लावली.

उस्मानाबाद - उस्मानाबाद पालिकेने भुयारी गटार योजनेच्या राबविलेल्या निविदा प्रक्रियेत कुठलाही अप्रमाणिकपणा दिसून येत नाही. होऊ घातलेली कामे पुढे ढकलली तर सार्वजनिक हितास प्रभावित केल्यासारखे होईल, आशा शब्दात भाष्य करीत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने उपनगराध्यक्ष अभय इंगळे आणि नगरसेवक उदय निंबाळकर यांची आक्षेप याचिका फेटाळू लावली. सोबतच कडक शब्दात ताशेरेही ओढले. त्यामुळे आता भुयारी गटार योजना निविदा प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानंतर्गत उस्मानाबाद शहरासाठी मलनिस्सारण प्रकल्प मंजूर झाला आहे. पालिकेकडून राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेच्या अनुषंगाने औरंगाबाद उच्च न्यायालयात पाकिकेतील विद्यमान उपनगराध्यक्ष अभय इंगळे आणि नगरसेवक उदय निंबाळकर यांनी आक्षेप याचिका दाखल केली होती. टेंडर नोटीस नियम व अनिवार्य गोष्टींची अवहेलना करून प्रसिद्ध केली. बोलीपूर्वक बैठकीचा अंतर्भाव करण्यात आलेला नाही. कंत्रादारांना (बोली लावणारा बिडर्स) केवळ १५ दिवसाचा अवधी दिला गेला. जो की ४५ दिवसांचा हवा होता. टेंडरची किंमत सुमारे ३० कोटींनी वाढविण्यात आली. जी की बेकायदेशीर आहे. नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांचा कार्यकाळ २७ डिसेंबर रोजी सरत आहे. त्यामुळे गडबड, धांदल करून आवश्यक बाबींना फाटा दिला. टेक्निकल बीड आणि फायनान्शियल बीड यात अंतर असायला हवे. परंतु, टेंडर नोटिसेत हे दोन्ही बीड एकाचवेळी उघडण्यात येतील याबाबत काहीही खुलासा करून सूचित केले नाही.

शुद्धीपत्रकानुसार जोपर्यंत टेक्निकल बिडचे मूल्यांकन होत नाही तोवर फायनान्शियल बीड उघडता येत नाही. त्यामुळे निविदा रद्द करावी, अशी विनंती कोर्टाला केली होती. हे प्रकरण न्यायाधीश गंगापूरवाला व न्यायाधीश दिघे यांच्या डबल बेंचसमोर चालले असता, पालिकेच्या वतीने ऍड. एम.एस. देशमुख यांनी म्हणणे मांडले. नगराध्यक्ष यांनी हा अचानक घेतलेला निर्णय नाही. हा विषय स्थायी तसेच सर्वसाधारण सभेत मांडला व मंजूर केला होता. तसेच टेंडर प्रक्रियेची ही चौथी वेळ आहे. निविदा प्रक्रियेला लागणारा वेळ व अंदाजे मूल्य हे २०१९ प्रमाणे आहे. त्यामुळे स्थायी व सर्वसाधारण सभेत निविदा रक्कम वाढविण्याचा व प्रशासकीय मान्यता घेण्याचा निर्णय घेऊन नवीन निविदा काढण्याचे ठरले होते. जर असा निर्णय घेतला नसता तर योजनेच्या वाढीव खर्चाचा बोजा पालिकेवर पडला असता. दरम्यान, निविदा जवळपास सहा दैनिकात प्रसिद्ध केली आहे. ज्यात दोन राष्ट्रीय दैनिके आहेत. त्यामुळे याचिकाकर्त्याच्या आक्षेपात फारसे तथ्य नसल्याचे नमूद करीत सदरील याचिका फेटाळण्याची विनंती पालिकेच्या वतीने कोर्टाला केली.

दोन्ही बाजूने म्हणणे मांडून झाल्यानंतर कोर्टाने कडक शब्दात ताशेरे ओढत आक्षेप याचिका फेटाळून लावली. भुयारी गटार योजना हे सार्वजनिक कल्याणचे काम आहे. हे काम लांबून काय साध्य होणार आहे, असा सवाल केला.सार्वजनिक हिताचे काम प्रलंबित ठेवणे कोणाच्याच हिताचे नाही. आशा प्रकारची कामे प्रलंबित ठेवल्याने त्या कामाची किंमत वाढणार आहे. परिणामी सध्याच्या माजगाईच्या काळात जनतेच्या पैशाचे नुकसान आहे. याचिकाकर्त्याने केलेल्या आरोपात तथ्य आढळून येत नाही. याचिकाकर्ते हे विकासकामांत अडथळा निर्माण करीत आहेत.जे की लोकांच्या हिताविरोधात आहे.  आम्हाला यामध्ये पालिकेचा कुठलाही अप्रमाणिकपणा दिसत नाही.त्यामुळे होऊ घातलेले काम पुढे ढकलणे हे सार्वजनिक हितास प्रभावित करण्यासारखे होईल, आशा शब्दात ताशेरे ओढले. त्यामुळे भुयारी गटार योजनेच्या निविदा प्रकियेचा मार्ग मोकळा झाला आहे.

टॅग्स :Usmanabad S Pपोलीस अधीक्षक, उस्मानाबादHigh Courtउच्च न्यायालय