शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
4
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
5
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
7
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
8
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
9
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
10
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
11
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
12
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
13
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
14
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
15
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
16
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
17
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
18
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
19
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
20
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

'सरकारला सुबुद्धी मिळावी'; आंदोलकांचे कासवपूजन करून तुळजाभवानीला साकडे

By चेतनकुमार धनुरे | Updated: September 18, 2023 14:32 IST

शेतकऱ्यांकडे लक्ष द्या, तुळजापुरात शेतकरी संघटनेचे आंदोलन

तुळजापूर (जि.धाराशिव) : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याची सुबुद्धी महाराष्ट्र सरकारला मिळावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि पुजारी मंडळाच्यावतीने सोमवारी दुपारी तुळजाभवानीला साकडे घालण्यात आले. महाद्वारासमोरील कासवाचे पूजन करुन यावेळी देवीला महाआरती करण्यात आली.

छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत सरकारने घोषणांचा पाऊस पाडला. परंतु, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव, ज्वारी, तूर, सोयाबीनचा प्रश्न, पशुधनाचा प्रश्न, दुधाला दरवाढ, पिण्याचे पाणी अशा अनेक समस्या आहेत. पावसाने ओढ दिल्यामुळे पिके वाया गेली आहेत. याकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. राज्य सरकार हे मोसमाप्रमाणे बदलत आहे. म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवून त्यांना दिलासा देण्याची सदबुद्धी सरकारला द्यावी, यासाठी श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी साकडे घातल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी आंदोलनावेळी सांगितले.

यावेळी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनीही सरकारच्या धोरणावर कडाडून टिका केली. आंदोलनात स्वाभिमानीचे राजाभाऊ हाके, कल्याण भोसले, जिल्हा उपाध्यक्ष धनाजी पेंदे, गुरु भोजने, किशोर गंगणे, अर्जुनअप्पा साळुंके, विजय सिरसट, संजय भोसले, मोहन भोसले, चंद्रकांत नरूळे, अण्णासाहेब साळुंके, विजय भोसले, अण्णा इंगळे, शंतनु जटाळ यांच्यासह पुजारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीState Governmentराज्य सरकार