निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच, शिवसेना पुरस्कृत वेताळबुवा ग्रामविकास पॅनल व रा.काँ. पुरस्कृत ग्रामविकास पॅनलमध्ये सरळ लढत होणार, हे स्पष्ट झाले होते. दरम्यान, अर्ज छाननीवेळी वेताळबुबा पॅनलचे प्रशांत रोटे, रोहिणी रोटे, सुषमा थोरात व महानंदा जालन हे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यामुळे प्रत्यक्ष पाच जागेसाठी निवडणूक पार पडली. पॅनलप्रमुख बाळासाहेब खरवडे, भास्कर जालन, शाहू आहेर, रवींद्र पवार यांनी प्रचार यंत्रणा राबवत माजी उपसरपंच अजित पवार, राजेंद्र आहेर, सुरेश खैरे, लिलावती खरवडे, सुनीता साळुंके या उमेदवारांनाही विजयी केले. निकाल जाहीर होताच, सर्व विजयी उमेदवार पॅनलप्रमुख बाळासाहेब खरवडे व कार्यकर्त्यांसह गावामध्ये जंगी मिरवणूक काढली, तसेच सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन ग्रामस्थांच्या आवश्यक सर्व सोयी -सुविधा पुरवठा करण्याची ग्वाही दिली.
डोकेवाडी ग्रामपंचायतवर ‘वेताळबुवा ग्रामविकास’चा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 4:15 AM