चोरीच्या घटना वाढल्याने शेतकऱ्यांत चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:29 IST2021-04-26T04:29:30+5:302021-04-26T04:29:30+5:30
(फोटो : संतोष मगर २४) तामलवाडी : तुळजापर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या सांगवी-मiळुब्रा साठवण तलावात रस्त्यालगत पाण्याचा उपसा करण्यासाठी बसविण्यात ...

चोरीच्या घटना वाढल्याने शेतकऱ्यांत चिंता
(फोटो : संतोष मगर २४)
तामलवाडी : तुळजापर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या सांगवी-मiळुब्रा साठवण तलावात रस्त्यालगत पाण्याचा उपसा करण्यासाठी बसविण्यात आलेला एक पानबुडी विद्युत पंप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.
सांगवी तलावात मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने, उन्हाळी पिकांना पाणी देण्यासाठी लगतच्या शेतकऱ्यांनी मोटारी बसविल्या आहेत. दरम्यान, शनिवारी रात्री वीजपुरवठा बंद असताना, या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी पाण्यात ठेवलेली वडणे या शेतकऱ्याची मोटार पाइप व वायर कापून चोरून नेली, तसेच विश्वास मधुकर मगर यांचे केबल वायर तोडून नुकसान केले. मागील आठवड्यात सुरतगाव शिवारातून अरुण मगर यांचा शेततळ्यावर बसविलेला विद्युत पंप चोरीस गेला होता, तसेच सांगवी गावातील प्रदीप मगर नागनाथ मगर, अरुण शेळके यांचे विद्युत पंप विहिरीवरून चोरीस गेले असून, लक्ष्मण पाटील, संतोष मगर यांच्या विद्युत पंपाचे केबल वायर तोडून चोरून नेले. त्याचा तपास अद्याप लागला नाही.
दरम्यान, रविवारी तलावावरील विद्युत पंप चोरीस गेल्याचे कळताच, इतर शेतकऱ्यांनी आपआपल्या मोटारी जाग्यावर आहेत की नाहीत, याची खातरजमा करण्यासाठी गर्दी केली होती. मोटार चोरणारी टोळी गेल्या सहा महिन्यांपासून सक्रिय असून, याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यातून होत आहे.