शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

उसाच्या बिलासाठी शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 19:15 IST

जयलक्ष्मी शुगर कारखान्यास  २०१४-१५  मध्ये ४ हजार मेट्रीक टन ऊस गाळपासाठी दिला त्याचे बिल अद्याप मिळाले नाही

उस्मानाबाद : तालुक्यातील नितळी येथील जयलक्ष्मी शुगर कारखान्यास सन २०१४-१५ मध्ये तुळजापूर तालुक्यातील चिकुंद्रा येथील शेतकऱ्यांनी गाळपासाठी ऊस दिला होता़ मात्र, या उसाचे बिल अद्याप मिळाले नसून, हे बील मिळावे, या मागणीसाठी चिकुंद्रा येथील शेतकऱ्यांनी गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले़ 

तुळजापूर तालुक्यातील चिकुंद्रा गावातील ७२ ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी नितळी येथील जयलक्ष्मी शुगर कारखान्यास  २०१४-१५  मध्ये ४ हजार मेट्रीक टन ऊस गाळपासाठी दिला आहे़ मात्र, उसाचे बील कारखान्याकडे थकीत आहे़ बिलासाठी मागील तीन वर्षापासून कारखान्यावर, कारखाना कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत़ परंतु अद्यापही उसाचे बिल मिळाले नसल्याने आम्ही उपोषण करीत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले़ 

उपोषणकर्त्यांनी ‘कोण म्हणत देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही’, ‘शेतकरी एकजूटीचा विजय’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता़ यावेळी दत्तात्रय गरड, मोहन मोटे, पांडूरंग गरड, कैलास जाधवर, विश्वनाथ मोटे, कमलाकर मोटे, लक्ष्मण गरड, लक्ष्मण मोटे, दिगंबर मोटे, जनक गायकवाड, किसन गायकवाड, भैरवनाथ गायकवाड, महादेव गंजे, कल्याण गरड, बळी गायकवाड, भिमराव गायकवाड, घैनिनाथ कानडे, सुभाष सोनवणे, हणमंत घुगे, तानाजी मोहिते यांच्यासह चिकुंद्रा येथील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते़

जिल्हाधिकारी कार्यालयातही ठिय्याउपोषणकर्त्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले़ कार्यालयातील पोर्चमध्ये ठाण मांडून जिल्हाधिकाऱ्यांनी आमचे म्हणणे ऐकून घ्यावे, त्यांनी स्वत: निवेदन स्विकारावे अशी मागणी करीत केली होती़ त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता़ त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी खंदारे यांनी आंदोलकांची भेट घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :agitationआंदोलनFarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखाने