शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

उसाच्या बिलासाठी शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 19:15 IST

जयलक्ष्मी शुगर कारखान्यास  २०१४-१५  मध्ये ४ हजार मेट्रीक टन ऊस गाळपासाठी दिला त्याचे बिल अद्याप मिळाले नाही

उस्मानाबाद : तालुक्यातील नितळी येथील जयलक्ष्मी शुगर कारखान्यास सन २०१४-१५ मध्ये तुळजापूर तालुक्यातील चिकुंद्रा येथील शेतकऱ्यांनी गाळपासाठी ऊस दिला होता़ मात्र, या उसाचे बिल अद्याप मिळाले नसून, हे बील मिळावे, या मागणीसाठी चिकुंद्रा येथील शेतकऱ्यांनी गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले़ 

तुळजापूर तालुक्यातील चिकुंद्रा गावातील ७२ ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी नितळी येथील जयलक्ष्मी शुगर कारखान्यास  २०१४-१५  मध्ये ४ हजार मेट्रीक टन ऊस गाळपासाठी दिला आहे़ मात्र, उसाचे बील कारखान्याकडे थकीत आहे़ बिलासाठी मागील तीन वर्षापासून कारखान्यावर, कारखाना कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत़ परंतु अद्यापही उसाचे बिल मिळाले नसल्याने आम्ही उपोषण करीत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले़ 

उपोषणकर्त्यांनी ‘कोण म्हणत देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही’, ‘शेतकरी एकजूटीचा विजय’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता़ यावेळी दत्तात्रय गरड, मोहन मोटे, पांडूरंग गरड, कैलास जाधवर, विश्वनाथ मोटे, कमलाकर मोटे, लक्ष्मण गरड, लक्ष्मण मोटे, दिगंबर मोटे, जनक गायकवाड, किसन गायकवाड, भैरवनाथ गायकवाड, महादेव गंजे, कल्याण गरड, बळी गायकवाड, भिमराव गायकवाड, घैनिनाथ कानडे, सुभाष सोनवणे, हणमंत घुगे, तानाजी मोहिते यांच्यासह चिकुंद्रा येथील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते़

जिल्हाधिकारी कार्यालयातही ठिय्याउपोषणकर्त्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले़ कार्यालयातील पोर्चमध्ये ठाण मांडून जिल्हाधिकाऱ्यांनी आमचे म्हणणे ऐकून घ्यावे, त्यांनी स्वत: निवेदन स्विकारावे अशी मागणी करीत केली होती़ त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता़ त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी खंदारे यांनी आंदोलकांची भेट घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :agitationआंदोलनFarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखाने