शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

कळंब येथे रोहित्राच्या मागणीसाठी शेतकरी चढले झाडावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 18:27 IST

तक्रार करूनही महावितरण दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत तालुक्यातील रांजणीच्या शेतकऱ्यांनी आज शोलेस्टाईल आंदोलन केले़

कळंब (उस्मानाबाद) : वारंवार बिघडणाऱ्या रोहित्राच्या दुरुस्तीकडे तक्रार करूनही महावितरण दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत तालुक्यातील रांजणीच्या शेतकऱ्यांनी आज शोलेस्टाईल आंदोलन केले़ महावितरणच्या कार्यालयातीलच एका झाडावर चढून शेतकऱ्यांनी वरून उड्या टाकण्याची धमकी अधिकाऱ्यांना दिली़

रांजणी येथे महावितरण कंपनीने शेतीपंपास सुरळीत वीजपुरवठा व्हावा, यासाठी १०० केव्हीए क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित केलेले आहे. यात वारंवार बिघाड होत असल्याने सिंचनात बाधा येत आहे़ ही बाब या भागातील शेतकऱ्यांनी महावितरणच्या वेळोवेळी लक्षात आणून देत याठिकाणी २०० केव्हीए क्षमतेचे रोहित्र बसविण्याची मागणी केलेली आहे. याकडे दुर्लक्ष होत असल्याने २९ आॅगस्ट रोजी पुन्हा गणेश श्रीरंग गाडे, मोहिनुद्दीन सय्यद, अच्युत भालेकर, मच्छिंद्र काळे, गोरख काळे, जगन्नाथ चोपणे आदी शेतकऱ्यांनी निवेदन देऊन आत्मदहन करण्याचा इशारा दिला़ तरीही रोहित्राकडे दुर्लक्ष केले गेल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी दुपारी कळंब येथील महावितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले.

दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास रांजणी येथील समस्याग्रस्त शेतकरी गणेश श्रीरंग गाडे, सुशील आत्माराम राऊत, बाबा सय्यद आदी शेतकरी महावितरणच्या कळंब येथील उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर एकत्र आले. याठिकाणी त्यांनी आपले आंदोलन सुरू केले. दरम्यान, जमलेल्यापैकी तीन शेतकरी कार्यालयाच्या आवारात असलेल्या उंच निलगिरीच्या झाडावर चढले. त्यांनी आमची मागणी मान्य केल्याशिवाय खाली उतरणार नाहीत अशी आग्रही भूमिका घेतली होती. या शोलेस्टाईल आंदोलनामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे...कळंब येथे नव्याने रूजू झालेले महावितरणचे उपकार्यकारी अभियंता ए. एन. शेख यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून लवकरात-लवकर रांजणी येथील रोहित्राचा प्रश्न मार्गी लावू, असे लेखी आश्वासन दिले. यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र