शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

कळंब येथे रोहित्राच्या मागणीसाठी शेतकरी चढले झाडावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 18:27 IST

तक्रार करूनही महावितरण दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत तालुक्यातील रांजणीच्या शेतकऱ्यांनी आज शोलेस्टाईल आंदोलन केले़

कळंब (उस्मानाबाद) : वारंवार बिघडणाऱ्या रोहित्राच्या दुरुस्तीकडे तक्रार करूनही महावितरण दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत तालुक्यातील रांजणीच्या शेतकऱ्यांनी आज शोलेस्टाईल आंदोलन केले़ महावितरणच्या कार्यालयातीलच एका झाडावर चढून शेतकऱ्यांनी वरून उड्या टाकण्याची धमकी अधिकाऱ्यांना दिली़

रांजणी येथे महावितरण कंपनीने शेतीपंपास सुरळीत वीजपुरवठा व्हावा, यासाठी १०० केव्हीए क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित केलेले आहे. यात वारंवार बिघाड होत असल्याने सिंचनात बाधा येत आहे़ ही बाब या भागातील शेतकऱ्यांनी महावितरणच्या वेळोवेळी लक्षात आणून देत याठिकाणी २०० केव्हीए क्षमतेचे रोहित्र बसविण्याची मागणी केलेली आहे. याकडे दुर्लक्ष होत असल्याने २९ आॅगस्ट रोजी पुन्हा गणेश श्रीरंग गाडे, मोहिनुद्दीन सय्यद, अच्युत भालेकर, मच्छिंद्र काळे, गोरख काळे, जगन्नाथ चोपणे आदी शेतकऱ्यांनी निवेदन देऊन आत्मदहन करण्याचा इशारा दिला़ तरीही रोहित्राकडे दुर्लक्ष केले गेल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी दुपारी कळंब येथील महावितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले.

दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास रांजणी येथील समस्याग्रस्त शेतकरी गणेश श्रीरंग गाडे, सुशील आत्माराम राऊत, बाबा सय्यद आदी शेतकरी महावितरणच्या कळंब येथील उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर एकत्र आले. याठिकाणी त्यांनी आपले आंदोलन सुरू केले. दरम्यान, जमलेल्यापैकी तीन शेतकरी कार्यालयाच्या आवारात असलेल्या उंच निलगिरीच्या झाडावर चढले. त्यांनी आमची मागणी मान्य केल्याशिवाय खाली उतरणार नाहीत अशी आग्रही भूमिका घेतली होती. या शोलेस्टाईल आंदोलनामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे...कळंब येथे नव्याने रूजू झालेले महावितरणचे उपकार्यकारी अभियंता ए. एन. शेख यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून लवकरात-लवकर रांजणी येथील रोहित्राचा प्रश्न मार्गी लावू, असे लेखी आश्वासन दिले. यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र