शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

कळंब येथे रोहित्राच्या मागणीसाठी शेतकरी चढले झाडावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 18:27 IST

तक्रार करूनही महावितरण दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत तालुक्यातील रांजणीच्या शेतकऱ्यांनी आज शोलेस्टाईल आंदोलन केले़

कळंब (उस्मानाबाद) : वारंवार बिघडणाऱ्या रोहित्राच्या दुरुस्तीकडे तक्रार करूनही महावितरण दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत तालुक्यातील रांजणीच्या शेतकऱ्यांनी आज शोलेस्टाईल आंदोलन केले़ महावितरणच्या कार्यालयातीलच एका झाडावर चढून शेतकऱ्यांनी वरून उड्या टाकण्याची धमकी अधिकाऱ्यांना दिली़

रांजणी येथे महावितरण कंपनीने शेतीपंपास सुरळीत वीजपुरवठा व्हावा, यासाठी १०० केव्हीए क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित केलेले आहे. यात वारंवार बिघाड होत असल्याने सिंचनात बाधा येत आहे़ ही बाब या भागातील शेतकऱ्यांनी महावितरणच्या वेळोवेळी लक्षात आणून देत याठिकाणी २०० केव्हीए क्षमतेचे रोहित्र बसविण्याची मागणी केलेली आहे. याकडे दुर्लक्ष होत असल्याने २९ आॅगस्ट रोजी पुन्हा गणेश श्रीरंग गाडे, मोहिनुद्दीन सय्यद, अच्युत भालेकर, मच्छिंद्र काळे, गोरख काळे, जगन्नाथ चोपणे आदी शेतकऱ्यांनी निवेदन देऊन आत्मदहन करण्याचा इशारा दिला़ तरीही रोहित्राकडे दुर्लक्ष केले गेल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी दुपारी कळंब येथील महावितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले.

दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास रांजणी येथील समस्याग्रस्त शेतकरी गणेश श्रीरंग गाडे, सुशील आत्माराम राऊत, बाबा सय्यद आदी शेतकरी महावितरणच्या कळंब येथील उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर एकत्र आले. याठिकाणी त्यांनी आपले आंदोलन सुरू केले. दरम्यान, जमलेल्यापैकी तीन शेतकरी कार्यालयाच्या आवारात असलेल्या उंच निलगिरीच्या झाडावर चढले. त्यांनी आमची मागणी मान्य केल्याशिवाय खाली उतरणार नाहीत अशी आग्रही भूमिका घेतली होती. या शोलेस्टाईल आंदोलनामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे...कळंब येथे नव्याने रूजू झालेले महावितरणचे उपकार्यकारी अभियंता ए. एन. शेख यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून लवकरात-लवकर रांजणी येथील रोहित्राचा प्रश्न मार्गी लावू, असे लेखी आश्वासन दिले. यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र