शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

जनतेला फसविणारे फडणवीस सरकार ‘क्लीन चिटर’; अशोकराव चव्हाण यांचा घणाघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 7:18 PM

पिकांवर फवारणी करताना यवतमाळमध्ये चाळीस शेतकर्‍यांचा मृत्यू झाला. सरकारने चौकशीसाठी समिती नेमली आणि सर्वांनाच ‘क्लीनचिट’ दिली. सरकारमधील मंत्र्यावर झालेल्या आरोपांच्या बाबतीतही वेळोवेळी हाच अनुभव आल्याचे सांगत जनतेला फसविणारे फडणवीस सरकार हे ‘क्लीन चिटर’ असल्याचा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी केला. 

उस्मानाबाद : पिकांवर फवारणी करताना यवतमाळमध्ये चाळीस शेतकर्‍यांचा मृत्यू झाला. सरकारने चौकशीसाठी समिती नेमली आणि सर्वांनाच ‘क्लीनचिट’ दिली. सरकारमधील मंत्र्यावर झालेल्या आरोपांच्या बाबतीतही वेळोवेळी हाच अनुभव आल्याचे सांगत जनतेला फसविणारे फडणवीस सरकार हे ‘क्लीन चिटर’ असल्याचा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी केला. 

काँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरानिमित्त सोमवारी तुळजापूर येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजीमंत्री हर्षवर्धन पाटील, मधुकरराव चव्हाण, तुकाराम रेंगे, पृथ्वीराज साठे यांची प्रमुख उपस्थिती होती. खा. चव्हाण म्हणाले की, फडणवीस सरकारच्या काळात राज्यातील सुमारे साडेतेरा हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. यापैकी २ हजार शेतकर्‍यांनी कर्जमाफीच्या घोषणेनंतर मृत्युला कवटाळले. याला कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीतील दिरंगाई कारणीभूत असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

सरकारकडे सरसकट कर्जमाफीसाठी पैसे नाहीत. मग जाहिरातींच्या माध्यमातून प्रचार-प्रसिद्धीवर खर्च करण्यासाठी कोट्यवधी रूपये आले कुठून, असा सवाल करीत शेतकर्‍यांप्रती सरकारच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले. फडणवीस सरकार जनतेच्या पैशाची अक्षरश: उधळपट्टी करीत आहेत. काल-परवाच २२५ ‘व्हीआयपी’ वाहने खरेदीचा निर्णय घेतला आहे. यामध्ये एक वाहन तर ‘बुलेटप्रुफ’ असून ज्याची किंमत ५६ लाख रूपये असल्याचे सांगत हा निर्णय देखील जनतेच्या पैशाच्या उधळपट्टीचाच भाग असल्याचे त्यांनी नमूद केले. फडणवीस सरकारच्या चार वर्षांच्या कार्यकाळात त्यांच्या मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचारासारखे गंभीर आरोप झाले. काही प्रकरणांत समिती गठित करून चौकशीचा फार्स केला. परंतु, प्रत्येकवेळी संबंधित मंत्र्यांना ‘क्लिनचिट’ देण्याचे काम झाले. यवतमाळमध्ये पिकांवर किटकनाशकांची फवारणी करताना चाळीस शेतकर्‍यांचा जीव गेला. चोहोबाजुंनी टिकेची झोड उठल्यानंतर चौकशी समिती नेमण्यात आली, आणि या समितीने सर्वांनाच ‘क्लीनचिट’ दिली. त्यामुळे फडणवीस सरकार हे जनतेला फसविणारे ‘क्लीन चिटर’ असाल्याचा घणाघात त्यांनी केला. यावेळी त्यांनी आरक्षण, मॅग्नेटिक महाराष्ट्र, बेरोजगारी, भ्रष्टाचार आदी मुद्यावरूनही भाजप सरकारला त्यांनी ‘लक्ष्य’ केले.

३१३ कोटीच्या मदतीने काय होणार?मराठवाड्यासह राज्याच्या अन्य भागात झालेल्या गारपीटीमुळे रबी पिकांसोबतच फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. विशेषत: द्राक्ष उत्पादक शेतकरी मोडून पडला आहे. अशावेळी गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना भरीव मदत देवून आधार देण्याची गरज होती. परंतु, फडणवीस सरकारने ३१३ कोटी रूपये एवढी तुटपुंजी मदत जाहीर करून गारपीटग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळल्याचा आरोपही खा. चव्हाण यांनी केला.

आघाडीचा अंतिम निर्णय राहुल गांधी घेतीलआगामी निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार का? असा प्रश्न खा. चव्हाण यांना केला असता, आघाडी करावी की करू नये, या अनुषंगाने काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते व कार्यकर्ते मतदारसंघनिहाय आढावा घेत आहेत. त्याचा अहवाल तयार करून पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पाठविला जाईल, आणि अंतिम निर्णयही तेच घेतील, अशी माहिती खा. चव्हाण यांनी दिली.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादAshok Chavanअशोक चव्हाण