शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

उस्मानाबाद जिल्ह्यातील ५ मंडळात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 11:32 AM

पहिल्याच पावसात मांजरा नदीपात्र वाहते झाल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.

उस्मानाबाद - जिल्हयात बुधवारी रात्री सर्वदूर पाऊस झाला. ५ मंडळात अतिवृष्टी नोंदविली गेली. सर्वाधिक ९९ मिलिमीटर पाऊस भूम तालुक्यातील ईट मंडळात झाला आहे. पहिल्याच पावसात मांजरा नदीपात्र वाहते झाल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.

 बुधवारी सकाळपासूनच वातावरणात उकाडा निर्माण झाला असतानाच सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास उमरगा तालुक्यातील येनेगूरसह काही भागात पावसाला सुरवात झाली. साधारणपणे सायंकाळी साडेसहा वाजता तर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरू झाला. वादळी वाऱ्यामुळे  वाशी तालुक्यतील इंदापूर येथील शेतकऱ्यांच्या कांदा चाळीचे मोठे नुकसान झाले आहे. शिवारातील असंख्य झाडेही उन्मळून पडली आहेत. जिल्ह्याच्या अनेक भागात रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. जिल्हयात सर्वाधिक ९९ मिमी पावसाची नोंद भूम तालुक्यातही ईट सर्कलमध्ये झाली आहे. भूम सर्कलमध्येही तब्बल ७१ मिमी पाऊस कोसळला. 

यासोबतच उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी, पाडोळी मंडळात प्रत्येकी ६२ मिमी तर जगजीत ६३ मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, चार मांडळे अशी आहेत, जी अतिवृष्टीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली. यात तुळजापूर तालुक्यतील सावरगाव मंडळात ६१ मिमी, गिविंदपूर ५९ मिमी, वाशी ५७ मिमी आणि परगावमध्ये ५३ मिलिमीटर पाऊस पडला. या पावसामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.

टॅग्स :RainपाऊसOsmanabadउस्मानाबादagricultureशेती