शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

"मुख्यमंत्री अन् आदित्य ठाकरेंनीही ऐकलं नाही", तानाजी सावंतांनी तेव्हाच मांडली होती व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 16:23 IST

सूरत येथून गुवाहाटी येथे रवाना होण्यापूर्वी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी हॉटेलमध्ये काढलेला फोटो समोर आला आहे.

उस्मानाबाद/मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान सोडून मातोश्रीत राहायचा निर्णय घेतला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंनी भावनिक आवाहन करत मी राजीनामा द्यायला आणि पक्षप्रमुखपदही सोडायला तयार असल्याचे सांगितले. त्यानंतर, राज्याच्या राजकारणात सातत्याने घडामोडी घडत आहेत. दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या गटाला जाऊन मिळणाऱ्या आमदारांची संख्या वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. शिंदे गटातील मंत्री बच्चू कडू आणि शिवसेना उपनेते तानाजी सावंत यांच्यावरही सोशल मीडियातून चर्चा होत आहे. 

सूरत येथून गुवाहाटी येथे रवाना होण्यापूर्वी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी हॉटेलमध्ये काढलेला फोटो समोर आला आहे. त्यामध्ये एकनाथ शिंदेंसोबत अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे, शंभुराज देसाई आणि बच्चू कडू हे मंत्री तर प्रताप सरनाईक, तानाजी सावंत, सुहास कांदे यांच्यासह शिवसेनेचे इतर आमदारही दिसत आहेत. शिवसेनेनं मंत्रीपद दिलेले अपक्ष आमदार बच्चू कडू या फोटोत दिसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. तर, मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असलेले आमदार तानाजी सावंत यांची उपस्थितीही लक्षणीय ठरली आहे. दरम्यान, तानाजी सावंत यांनी शिवसंपर्क अभियानातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंबद्दलची नाराजी बोलून दाखवली होती. तर, राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबतची आघाडी शिवसैनिकाला पटत नसल्याचंही ते म्हणाले होते. तेरणा सहकारी साखर कारखान्यासंदर्भात बोलताना त्यांनी हे भाष्य केलं होतं.  

मोठ्या अडचणीनंतर तेरणा कारखाना शिवसेनेचे आमदार प्रा. तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ शुगरवा भाड्याने देण्याची प्रक्रिया सूरु झाली, तिथेही मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. सहावेळा निविदा प्रसिध्द केल्यानंतर शेवटी कारखाना भैरवनाथ शुगर्सकडे भाड्याने देण्याची प्रक्रिया पुर्ण झाली. त्यावेळी स्पर्धक म्हणुन असलेल्या अमित देशमुख यांच्या ट्वेंटी वन शुगर्सने या प्रक्रियेवर शंका उपस्थित केली, त्याविरुद्ध उच्च न्यायालयात प्रकरण गेले होते. यासंदर्भात तानाजी सावंत यांनी भूम-परंडा-वाशी येथील शिवसेना संपर्क अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात बोलताना पक्षावरील आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती. 

कारखान्यासंदर्भात महाविकास आघाडीतील मंत्री अमित देशमुख यांच्याकडून आठकाठी घालण्यात आली. यासंदर्भात मी सर्वच नेत्यांच्या कानावर घातलं, मुख्यमंत्र्यांच्याही कानावर घातलं, आदित्य ठाकरेंनाही सांगितलं. पण, काय उपयोग झाला, काहीच नाही, असे म्हणत काँग्रेस-राष्ट्रवादीमधील नेत्यांच्या हस्तक्षेपावरुन नाराजी व्यक्त केली होती. तसेच, शिवसैनिकांनी घरावर तुळशीपत्र ठेऊन काँग्रेस-राष्ट्रवादीविरुद्ध लढाई लढली. मात्र, त्यांच्यासोबतच जाण्याची वेळ शिवसैनिकावर आल्याचेही ते म्हणाले होते. 4 जून रोजी त्यांनी या अभियानात भाषण केलं होतं. 

दरम्यान, तानाजी सावंत हे व्हायरल फोटोत पहिल्याच लाईनमध्ये दिसून आले. काही दिवसांपूर्वी सोलापूर दौऱ्यावर असताना तानाजी सावंत यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर जाहीरपणे टिका करत आपली नाराजी जाहीर केली होती. यावेळी, वरुण देसाई यांना आपले म्हणणे पक्षप्रमुखांच्या कानावर घालण्याचंही त्यांनी सांगितलं होतं. तर, शिवसंपर्क अभियानाच्या 2 ऱ्या टप्प्यात भूम-परंडा-वाशी मतदारसंघातील भाषणावेळीही त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती.

टॅग्स :Tanaji Sawantतानाजी सावंतUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस