शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
5
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
6
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
9
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
10
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
17
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
18
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
19
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
20
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या ‘जलसंधारण’मध्ये अभियंत्यांचाही दुष्काळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:38 IST

दुष्काळी जिल्हा म्हणून उस्मानाबादची ओळख. एक-दाेन वर्षाआड उस्मानाबादकरांना दुष्काळी परिस्थितीला सामाेरे जावे लागते. अशा काळात नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा साेसण्याची ...

दुष्काळी जिल्हा म्हणून उस्मानाबादची ओळख. एक-दाेन वर्षाआड उस्मानाबादकरांना दुष्काळी परिस्थितीला सामाेरे जावे लागते. अशा काळात नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा साेसण्याची वेळ येऊन नये, यासाठी जाे काही पाऊस पडेल, ते पाणी शिवारातच अडविले जावे, म्हणून लहान-माेठे तलाव, बंधारे उभारण्यावर भर दिला जात आहे. यासाठी जिल्हा नियाेजन समितीसह वेगवेगळ्या हेडद्वारे निधी उपलब्ध हाेता. मात्र, हा निधी पूर्ण क्षमतेने खर्च करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळाची कमतरता आहे. लघुपाटबंधारेच्या जिल्हाभरातील कार्यालयांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या मुख्य कार्यालयाचे कार्यकारी अभियंता हे पद मागील दीड ते दाेन वर्षांपासून रिक्त आहे. सुरुवातीच्या काळात उपअभियंता जगताप यांना चार्ज देण्यात आला हाेता. यानंतर त्यांच्याकडून चार्ज काढून जाेशी यांना देण्यात आला आहे. दरम्यान, तालुकास्तरीय कार्यालयांसाठी कनिष्ट व शाखा अभियंत्यांची २९ पदे मंजूर आहेत. आजघडीला यापैकी ५० टक्के जागा रिक्त आहेत. म्हणजेच केवळ १४ अभियंत्यांवर संपूर्ण जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांची मदार आहे. एकेका कार्यालयासाठी पाच जागा मंजूर आहेत. आजघडीला प्रत्येकी ३ जागा रिक्त असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. अशीच अवस्था उपअभियंत्यांच्या जागेबाबत आहे. जिल्ह्यासाठी पाच जागा मंजूर आहेत. यापैकी तुळजापूर व उस्मानाबाद येथील जागा रिक्त आहेत. उर्वरित तीनपैकी दाेन जागा पुढील आठवड्यात रिक्त हाेत आहेत. त्यामुळे पाच पैकी एकच उपअभियंता कार्यरत असेल. एवढ्या माेठ्या प्रमाणात जागा रिक्त असल्याने याचा थेट परिणाम जलसंधारणाच्या कामांच्या गतीवर हाेत आहे. त्यामुळे लाेकप्रतिनिधी सरकारदरबारी भांडणार कधी, असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जाऊ लागला आहे.

चाैकट....

अधिकार राज्य सरकारला...

अभियंत्यांच्या रिक्त जागा भरण्याचा अधिकार राज्य सरकारचा आहे. त्यामुळे जिल्हास्तरावरून रिक्त जागांचा अहवाल पाठविण्यापलीकडे जिल्हा परिषदेच्या हाती दुसरा पर्याय नाही. कंत्राटी तत्वावर अभियंते घ्यायचे म्हटले तर त्यासाठी लागणारी आर्थिक तरतूदही नाही. त्यामुळे याबाबत आता सरकारनेच पुढाकार घेत, रिक्त जागा भरणे गरजेचे आहे.

पाॅइंट...

राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे जिल्ह्याचे पालकत्व आहे. त्यांच्याच अखत्यारितील जलसंधारण विभागाअंतर्गत अभियंत्यांच्या ५० टक्के जागा रिक्त आहेत. त्यामुळे जलसंधारणाच्या कामाला सरकारने कितीही निधी दिला तरी ताे वेळेत खर्च करण्यास मर्यादा येत आहेत. उपराेक्त प्रश्न लक्षात घेता, विशेष बाब म्हणून भाळी दुष्काळी शिक्का असलेल्या उस्मानाबाद जि.प.च्या सलसंधारण विभागातील अभियंत्यांच्या रिक्त जागा भरण्याच्या अनुषंगाने ठाेस उपायाेजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

चाैकट....

काही दिवसांपूर्वीच जिल्हा परिषदेने विशेष सर्वसाधारण सभा घेतली हाेती. या सभेत विविध विभागातील रिक्त जागेचा एकमेव मुद्दा चर्चेसाठी ठेवण्यात आला हाेता. तसा ठरावही घेण्यात आला आहे. अभियंत्यांची वानवा लक्षात घेऊन, आता राज्य सरकारनेच काही तरी ठाेस उपाययाेजना करणे गरजेचे आहे.

- अस्मिता कांबळे, अध्यक्षा, जिल्हा परिषद.