शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

Dharashiv: साठवण तलाव फुटून पिकांसह माती वाहून गेली; १५० एकरवर शेतीचे मोठे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 16:14 IST

शेतकऱ्यांचे अश्रू, प्रशासनाची पाहणी; मदत कधी मिळणार?

- संतोष वीर

भूम (धाराशिव): भूम शहरालगत असलेल्या साबळेवाडी येथील साठवण तलाव क्रमांक १ शुक्रवारी अचानक फुटल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार जयवंत पाटील आणि जलसंपदा विभागाचे उपअभियंता माणिक देशमुख यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रयत्न सुरू आहेत.

३० एकरवरील पीक मातीसहित खरडून गेलेया दुर्घटनेत जवळपास १५० ते १७० एकर शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे. यामध्ये सुनगिरी शिवारातील सुमारे १०० एकर आणि साबळेवाडी भागातील ७० एकर शेतजमिनींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, यातील ३० ते ४० एकर क्षेत्रावरील उभे पीक पुराच्या पाण्यासोबत मातीसहित खरडून वाहून गेले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

कारणांबाबत चर्चा आणि संतापअचानक फुटलेल्या या पाझर तलावामागे नेमके काय कारण आहे, याबाबत चौकशी सुरू आहे. पाटबंधारे विभागाचे उपअभियंता माणिक देशमुख यांनी सांगितले की, “साबळेवाडी भागात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्यामुळे तलावाच्या क्षमतेपेक्षा जास्त पाणी आले. त्यामुळे सांडव्यातून पाण्याचा योग्य निचरा होऊ शकला नाही आणि तलाव फुटला.” मात्र, स्थानिक शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी तलावाच्या भिंतींच्या देखभालीतील त्रुटींमुळे ही दुर्घटना घडल्याची शंका व्यक्त केली आहे.

तात्काळ मदतीची मागणीया दुर्घटनेनंतर शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले आहेत. शेतकरी विजय साबळे म्हणाले, "पूर्ण खरीप हंगामावर गंभीर परिणाम झाला आहे. प्रशासनाने नुसती मदत जाहीर न करता, ती तात्काळ प्रत्यक्षात देणे अपेक्षित आहे."

नुकसानीचे पंचनामे सुरूतहसीलदार जयवंत पाटील यांनी नुकसानीचे पंचनामे सुरू केले असून, मदतीचा निधी मिळताच तो तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल असे आश्वासन दिले आहे. यासोबतच, शेतकऱ्यांनी प्रशासनाकडून इतर साठवण तलावांचीही तपासणी करून संभाव्य धोके टाळण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :RainपाऊसdharashivधाराशिवAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी