शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Dharashiv: साठवण तलाव फुटून पिकांसह माती वाहून गेली; १५० एकरवर शेतीचे मोठे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 16:14 IST

शेतकऱ्यांचे अश्रू, प्रशासनाची पाहणी; मदत कधी मिळणार?

- संतोष वीर

भूम (धाराशिव): भूम शहरालगत असलेल्या साबळेवाडी येथील साठवण तलाव क्रमांक १ शुक्रवारी अचानक फुटल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार जयवंत पाटील आणि जलसंपदा विभागाचे उपअभियंता माणिक देशमुख यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रयत्न सुरू आहेत.

३० एकरवरील पीक मातीसहित खरडून गेलेया दुर्घटनेत जवळपास १५० ते १७० एकर शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे. यामध्ये सुनगिरी शिवारातील सुमारे १०० एकर आणि साबळेवाडी भागातील ७० एकर शेतजमिनींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, यातील ३० ते ४० एकर क्षेत्रावरील उभे पीक पुराच्या पाण्यासोबत मातीसहित खरडून वाहून गेले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

कारणांबाबत चर्चा आणि संतापअचानक फुटलेल्या या पाझर तलावामागे नेमके काय कारण आहे, याबाबत चौकशी सुरू आहे. पाटबंधारे विभागाचे उपअभियंता माणिक देशमुख यांनी सांगितले की, “साबळेवाडी भागात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्यामुळे तलावाच्या क्षमतेपेक्षा जास्त पाणी आले. त्यामुळे सांडव्यातून पाण्याचा योग्य निचरा होऊ शकला नाही आणि तलाव फुटला.” मात्र, स्थानिक शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी तलावाच्या भिंतींच्या देखभालीतील त्रुटींमुळे ही दुर्घटना घडल्याची शंका व्यक्त केली आहे.

तात्काळ मदतीची मागणीया दुर्घटनेनंतर शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले आहेत. शेतकरी विजय साबळे म्हणाले, "पूर्ण खरीप हंगामावर गंभीर परिणाम झाला आहे. प्रशासनाने नुसती मदत जाहीर न करता, ती तात्काळ प्रत्यक्षात देणे अपेक्षित आहे."

नुकसानीचे पंचनामे सुरूतहसीलदार जयवंत पाटील यांनी नुकसानीचे पंचनामे सुरू केले असून, मदतीचा निधी मिळताच तो तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल असे आश्वासन दिले आहे. यासोबतच, शेतकऱ्यांनी प्रशासनाकडून इतर साठवण तलावांचीही तपासणी करून संभाव्य धोके टाळण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :RainपाऊसdharashivधाराशिवAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी