शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
3
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
4
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
5
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
6
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
7
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
8
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
9
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
10
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
11
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
12
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
13
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
14
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
15
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
16
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
17
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
18
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
19
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
20
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले

Dharashiv: जीव वाचला पण जगायचे कसे? भूममध्ये शेतकरी संकटात, ७०२ हेक्टर जमीन उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 17:45 IST

भूममधील शेतकऱ्यांवर मोठे संकट; नदी काठच्या शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त 

- संतोष वीरभूम (धाराशिव) : तालुक्यात २१ सप्टेंबर रोजी  झालेल्या पाचही मंडळांतील अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे हाल झाले आहेत. नदीकाठची हजारो हेक्टर शेती पुराच्या पाण्यात उद्ध्वस्त झाली. ७०२ हेक्टर शेती तर खरडून वाहून गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट उभे राहिले आहे. नदी काठच्या शेतकऱ्यांना जीव वाचवण्यात यश आले तरी “आता पुढे जगायचे कसे?” हा प्रश्न त्यांच्या डोळ्यांत अश्रू घेऊन सतत चिंतेच्या विचाराने उभा राहत आहे.

दिनाक २२ रोजी रामगंगा व बाणगंगा नद्यांनी रात्रभर धोक्याची पातळी ओलांडल्याने चिंचपूरजवळील तब्बल ५०० मीटर रस्ता पुराच्या पाण्यात वाहून गेला. त्याच परिसरात शेतात राहत असलेले भारत रामभाऊ मोरे यांच्या घरातही पुराचे पाणी घुसले. यामुळे रात्रीच्या अंधारात कुटुंबातील सात सदस्य थरथरत होते. जीव वाचवण्यासाठी मोरे यांचा मुलगा गणेश यांनी पोटच्या दोन लहान मुलांना तासभर खांद्यावर घेऊन उभे राहिले. घरात पाणी प्रवाहाने शिरू नये म्हणून गणेश मोरे यांनी दरवाजा लावला होता. यामुळे दरवाज्याला पाणी थापून घरात काही प्रमाणात पाणी कमी येत होते. परंतु गावकऱ्यांनी मोरे यांना पाण्याचा प्रवाह वाढत आल्याने बाहेर निघा असे सांगितल्याने. मोरे यांनी घरा समोर वाहत आलेल्या लिंबाच्या झाडांचा आधार घेत वाट काढली. धाडसाने त्यांनी घरातील ७ सदस्यांना पाण्याच्या प्रवाहातून बाहेर काढले. यामुळे थोडक्यात दुर्घटना टळली. मात्र, मोरे परिवार हे शेतीवर आधारित असल्याने त्यांचे पुढचे आयुष्य पूर्णतः थांबले आहे.  मोरे यांची ३ एकर २० गुंटे शेती पुराच्या पाण्यात खरडून गेली. यामध्ये तब्बल २ एकर द्राक्षबाग पूर्णपणे वाहून गेली, तर उर्वरित जमिनीवरील खरीप पिकेही पूर्णतः नष्ट झाली. आयुष्यभराचा घाम आणि परिश्रम क्षणात वाहून गेल्याने मोरे हतबल झाले आहेत.

“जीव वाचला खरी, पण आता शेती नाही, बाग नाही, कमाई नाही. बँकेचे कर्ज कसे फेडायचे? कुटुंब कसे चालवायचे?” अशा प्रश्नांनी मोरे यांचे मनोबल खचले असून त्यांनी डोक्याला हात लावून वाहून गेलेल्या शेती कडे पाहत टाहो फोडला आहे. या आपत्तीने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भविष्यावर काळे ढग दाटून आले आहेत. शासनाने तातडीने नुकसानग्रस्तांना मदत केली नाही तर भूम तालुक्यातील शेतकरी पुनर्वसनाऐवजी उद्ध्वस्तच होतील, अशी भीती शेतकरी वर्गातून  व्यक्त केली जात  आहे.

१४५ जनावरे दगावली, हजारो हेक्टर शेतीचे नुकसानतालुक्यात झालेली अतिवृष्टीने नदीकाठी राहत असलेल्या नागरी वस्ती व जनावरांच्या गोठ्यात पाणी शिरल्याने २ दिवसात १४५ जनावरे दगावली आहेत. यामध्ये काही वाहून गेली तर काही जाग्यावरच दगावली आहेत. ३०७ घरांची परझड झाली आहे. तर तब्बल ७०२ हेक्टर शेती खरडून वाहून गेली असून हजारो एकर शेतीचे नुकसान झाले आहे. अशी माहिती तहसील आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने देण्यात आली. एका रात्रीत होत्याचे नव्हते झाले आहे. ज्या शेतीवर पूर्ण परिवार अवलंबून आहे. ती शेतीच खरडून वाहून गेल्याने ती पुन्हा कशी तयार करायची व कसायची या चिंतेने मी हातबल झालो आहे भारत मोरे चिंचपूर येथील शेतकरी

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीRainपाऊसfloodपूर