शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
4
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
5
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
6
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
7
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
8
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
9
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
10
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
11
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
12
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
13
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
14
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
15
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
16
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
17
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
18
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
19
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
20
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?

Dharashiv: कर्ज, अतिवृष्टीच्या दुहेरी संकटाने खचलेल्या शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 19:34 IST

तरुण शेतकऱ्याच्या या टोकाच्या निर्णयामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे

तामलवाडी (जि. धाराशिव) : बँकेचे कर्ज आणि निसर्गाचा क्रूर लहरीपणा या दुहेरी संकटाने पिचलेल्या एका २५ वर्षीय तरुण शेतकऱ्याने तुळजापूर तालुक्यातील दहिवडी शिवारात लिंबाच्या झाडाला गळफास लावून आपले जीवन संपवले. अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना बुधवारी दुपारी १२ वाजता उघडकीस आली.

सोमनाथ दिलीप काटमोरे (वय २५) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. सोमनाथ यांच्याकडे कुटुंबाची १२ एकर जमीन होती आणि त्यांनी शेतीसाठी बँकेचे कर्जही घेतले होते. यंदाच्या खरीप हंगामात मोठ्या आशेने त्यांनी सोयाबीनची पेरणी केली. सुरुवातीला पीक जोमदार आले; पण ऐनवेळी झालेल्या अतिवृष्टीने सर्व होत्याचे नव्हते केले. शेतात पीक कमी आणि गवतच जास्त उगवल्याने मोठी नापिकी होणार, हे स्पष्ट झाले होते. कर्ज फेडायचे कसे आणि कुटुंबाचे पोट कसे भरायचे, या विवंचनेत सोमनाथ पूर्णपणे खचले होते. 

बुधवारी याच पिकाची काढणी करून मळणी करायची होती आणि मोठा भाऊ मळणी यंत्राची तयारी करीत असतानाच, नैराश्यातून सोमनाथ यांनी लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. सोमनाथ यांच्या पश्चात त्यांची आई, भाऊ आणि भावजय असा परिवार आहे. तरुण शेतकऱ्याच्या या टोकाच्या निर्णयामुळे शेतकरी कुटुंबातील एका आधाराचा खांब कोसळला आहे. या घटनेची नोंद तामलवाडी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत. या घटनेने शेतकरी आत्महत्येचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Dharashiv: Farmer Ends Life Due to Debt and Heavy Rain

Web Summary : Burdened by debt and crop loss from excessive rain, a 25-year-old farmer in Dharashiv committed suicide. Somnath Katmore, with 12 acres and a bank loan, faced ruin after his soybean crop failed. He leaves behind his mother and brother.
टॅग्स :dharashivधाराशिवfarmer suicideशेतकरी आत्महत्या