शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

नामांतराआधी शहरांचा विकास महत्वाचा; राजेश टोपे यांचे संजय राऊत यांना प्रत्युत्तर

By मोरेश्वर येरम | Updated: January 17, 2021 13:48 IST

"औरंगाबादला संभाजीनगर म्हणा किंवा उस्मानाबादला धाराशिव म्हणा पण विकास करा", असं राजेश टोपे म्हणाले. 

ठळक मुद्देनामांतराच्या मुद्द्यावर राजेश टोपे यांचं महत्वाचं विधानराजेश टोपे यांनी दिलं संजय राऊत यांना प्रत्युत्तरनामांतरापेक्षा शहराचा विकास महत्वाचा असल्याचं केलं वक्तव्य

राज्यात सध्या शहरांच्या नामांतरणाच्या मुद्द्यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. औरंगाबाद शहराचं संभाजीनगर असं नामकरण करण्यास काँग्रेसने विरोध केला आहे. याच मुद्द्यावरुन आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसच्या सेक्युलरवादावर जोरदार टीका केली. आता नामांतरणाच्या मुद्द्यावरुन राज्याचे आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे यांना विचारण्यात आलं असता त्यांनी नामांतरापेक्षा त्या शहराचा विकास होणं महत्वाचं असल्याचं टोपे म्हणाले. 

राजेश टोपे आज उस्मानाबादमध्ये एका रुग्णालयाच्या उदघाटनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. "औरंगाबादला संभाजीनगर म्हणा किंवा उस्मानाबादला धाराशिव म्हणा पण विकास करा", असं राजेश टोपे म्हणाले. 

जनतेची इच्छा समजून घेऊ मग निर्णयशहराच्या नामांतराच्या मुद्द्यावर राजेश टोपे यांनी तेथील जनतेची इच्छा समजून घेणं महत्वाचं असल्याचं म्हटलं. महाविकास आघाडी ही किमान समान कार्यक्रमावर एकत्र आली आहे. तिन्ही पक्षाच्या समन्वय समितीनं याबाबतचा निर्णय घेतला तर कोणतीही अडचण येणार नाही. मुळात नामांतराआधी त्या शहरातील जनतेची इच्छा समजून घेतली पाहिजे, असं राजेश टोपे म्हणाले. 

दरम्यान, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'त आज संजय राऊत यांच्या 'रोखठोक' या सदरातून काँग्रेसच्या सेक्यूलरवादावर जोरदार टीका करण्यात आली आहे. "औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून दंडवत! हे वागणं सेक्यूलर नव्हे!", अशा शब्दांत 'रोखठोक'मधून काँग्रेसवर निशाणा साधण्यात आला आहे.'रोखठोक'मधील या टीकेबाबत राजेश टोपे यांना विचारण्यात आलं असता वृत्तपत्रे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. त्यांना लिहिण्याचा अधिकार आहे. त्यांना लिहू द्या, काही अडचण नाही, असं उत्तर टोपे यांनी दिलं.

नामांतराच्या वादावरुन सरकारमध्ये ठिणगीऔरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं चित्र सध्या दिसत आहे. शिवसेनेकडून वारंवार औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख केला जात असून महाविकास आघाडी सरकार याबाबतचा लवकरच प्रस्ताव आणणार असल्याचंही सांगितलं जात आहे. दुसरीकडे काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादच्या नामांतराला स्पष्ट विरोध केला आहे. शहरांच्या नामांतराचा मुद्दा किमान समान कार्यक्रमात नाही. शहरांच्या नामांतराने तेथील तरुणांना नोकऱ्या मिळणार आहेत का? शहराचा विकास होणार आहे का? असा सवाल उपस्थित करत थोरात यांनी याआधीच शिवसेनेच्या भूमिकेला विरोध केला आहे.  

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेSanjay Rautसंजय राऊतNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादUsmanabad z pउस्मानाबाद जिल्हा परिषद