शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

नामांतराआधी शहरांचा विकास महत्वाचा; राजेश टोपे यांचे संजय राऊत यांना प्रत्युत्तर

By मोरेश्वर येरम | Updated: January 17, 2021 13:48 IST

"औरंगाबादला संभाजीनगर म्हणा किंवा उस्मानाबादला धाराशिव म्हणा पण विकास करा", असं राजेश टोपे म्हणाले. 

ठळक मुद्देनामांतराच्या मुद्द्यावर राजेश टोपे यांचं महत्वाचं विधानराजेश टोपे यांनी दिलं संजय राऊत यांना प्रत्युत्तरनामांतरापेक्षा शहराचा विकास महत्वाचा असल्याचं केलं वक्तव्य

राज्यात सध्या शहरांच्या नामांतरणाच्या मुद्द्यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. औरंगाबाद शहराचं संभाजीनगर असं नामकरण करण्यास काँग्रेसने विरोध केला आहे. याच मुद्द्यावरुन आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसच्या सेक्युलरवादावर जोरदार टीका केली. आता नामांतरणाच्या मुद्द्यावरुन राज्याचे आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे यांना विचारण्यात आलं असता त्यांनी नामांतरापेक्षा त्या शहराचा विकास होणं महत्वाचं असल्याचं टोपे म्हणाले. 

राजेश टोपे आज उस्मानाबादमध्ये एका रुग्णालयाच्या उदघाटनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. "औरंगाबादला संभाजीनगर म्हणा किंवा उस्मानाबादला धाराशिव म्हणा पण विकास करा", असं राजेश टोपे म्हणाले. 

जनतेची इच्छा समजून घेऊ मग निर्णयशहराच्या नामांतराच्या मुद्द्यावर राजेश टोपे यांनी तेथील जनतेची इच्छा समजून घेणं महत्वाचं असल्याचं म्हटलं. महाविकास आघाडी ही किमान समान कार्यक्रमावर एकत्र आली आहे. तिन्ही पक्षाच्या समन्वय समितीनं याबाबतचा निर्णय घेतला तर कोणतीही अडचण येणार नाही. मुळात नामांतराआधी त्या शहरातील जनतेची इच्छा समजून घेतली पाहिजे, असं राजेश टोपे म्हणाले. 

दरम्यान, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'त आज संजय राऊत यांच्या 'रोखठोक' या सदरातून काँग्रेसच्या सेक्यूलरवादावर जोरदार टीका करण्यात आली आहे. "औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून दंडवत! हे वागणं सेक्यूलर नव्हे!", अशा शब्दांत 'रोखठोक'मधून काँग्रेसवर निशाणा साधण्यात आला आहे.'रोखठोक'मधील या टीकेबाबत राजेश टोपे यांना विचारण्यात आलं असता वृत्तपत्रे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. त्यांना लिहिण्याचा अधिकार आहे. त्यांना लिहू द्या, काही अडचण नाही, असं उत्तर टोपे यांनी दिलं.

नामांतराच्या वादावरुन सरकारमध्ये ठिणगीऔरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं चित्र सध्या दिसत आहे. शिवसेनेकडून वारंवार औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख केला जात असून महाविकास आघाडी सरकार याबाबतचा लवकरच प्रस्ताव आणणार असल्याचंही सांगितलं जात आहे. दुसरीकडे काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादच्या नामांतराला स्पष्ट विरोध केला आहे. शहरांच्या नामांतराचा मुद्दा किमान समान कार्यक्रमात नाही. शहरांच्या नामांतराने तेथील तरुणांना नोकऱ्या मिळणार आहेत का? शहराचा विकास होणार आहे का? असा सवाल उपस्थित करत थोरात यांनी याआधीच शिवसेनेच्या भूमिकेला विरोध केला आहे.  

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेSanjay Rautसंजय राऊतNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादUsmanabad z pउस्मानाबाद जिल्हा परिषद