शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

आगीपासून पीव्हीसी पाईप्स वाचविण्याच्या प्रयत्नात वृध्द शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 18:20 IST

अशक्तपणामुळे त्यांना लवकर उठता न आल्याने त्यांचा होरपळून जागीच मृत्यू झाला.

उस्मानाबाद : तालुक्यातील बेंबळी येथील वृध्द शेतकऱ्याचा पेटविलेल्या उसाच्या पाचटातील पाईप काढताना पाय अडकून पडल्याने आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. आप्पाराव साधू डावकरे असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

आप्पाराव साधू डावकरे यांच्या शेताचे शेजारील शेतकरी कालिदास नागनाथ डावकरे यांनी ओढ्यातील काटेरी झुडपे, वाळलेल्या गवताची अडचण दूर करण्यासाठी ओढा पेटविला होता. वाऱ्यामुळे पसरलेल्या आगीने त्यांच्याच उसाच्या फडातील पाचटाने पेट घेतला होता. या पाचटात ठेवलेल्या पीव्हीसी पाईपचे जळून नुकसान होऊ नये यासाठी आप्पाराव डावकरे यांनी पेटलेले पाचट विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केले होते. जीव वाचविण्यासाठी त्यांनी तेथून निघण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा पाय अडकून ते खाली पडले. अशक्तपणामुळे त्यांना लवकर उठता न आल्याने त्यांचा होरपळून जागीच मृत्यू झाला.

याबाबत कालीदास डावकरे व परिसरातील शेतकऱ्यांनी आग विझवून आगीने गंभीररित्या भाजलेले आप्पाराव डावकरे यांना वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र, तोवर उशीर झाला. या घटनेची माहिती त्यांनी तलाठी व पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. या घटनेची बेंबळी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत शेतकरी आप्पाराव डावकरे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :fireआगFarmerशेतकरीDeathमृत्यू