शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

तीन मंडळात पिकाचे नमुना सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:37 IST

लोहारा : तालुक्यात यंदा पावसाने खंड दिल्यामुळे खरीप हंगामाच्या सरासरी उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. या अनुषंगाने कृषी ...

लोहारा : तालुक्यात यंदा पावसाने खंड दिल्यामुळे खरीप हंगामाच्या सरासरी उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. या अनुषंगाने कृषी विभागाच्या वतीने तालुक्यातील तीन मंडळात नुकतेच पिकाचे नमुना सर्वेक्षण देखील झाले आहे. परंतु, तालुका कृषी कार्यालयाकडून अहवाल काय सादर केला आहे. यावर नुकसान भरपाईच्या २५ टक्के रक्कम शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडून आगाऊ मिळणार का नाही, हे ठरणार आहे.

प्रतिकूल हवामान घटकांमुळे निर्माण झालेल्या नुकसानी संदर्भात कृषी आयुक्तांच्या आदेशानुसार लोहारा तालुक्यातील माकणी, जेवळी व लोहारा या तीन महसूल मंडळातील लोहारा, भोसगा, एकोंडी (लो), मार्डी, वडगाव, जेवळी, कास्ती या गावांमध्ये नमुना सर्वेक्षण करण्यात आले. तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, विमा प्रतिनिधी यांच्या संयुक्त टीमने हे सर्वेक्षण करून सरासरी उत्पन्नाच्या किती टक्के नुकसान झाले, याचा अहवाल जिल्हा कृषी अधिकारी यांना दिला आहे. प्रतिकूल हवामान घटकामुळे सरासरी उत्पन्नाच्या ५० टक्के नुकसान होत असल्यास नुकसान भरपाईच्या २५ टक्के रक्कम शेतकऱ्यांना आगाऊ देण्यात यावी, अशी तरतूद आहे. त्यानुसार २८ जुलै रोजी कृषी आयुक्तांनी या सर्वेक्षणाचे आदेश दिले होते.

लोहारा तालुक्यातील ५२ हजार ४४९ शेतकऱ्यांनी सोयाबीन, उडीद, मूग, तूर, बाजरी या पिकाचा विमा भरून ३८ हजार ३६५ हेक्टरवरील पिके संरक्षित केली आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या हप्त्यापोटी विमा कंपनीकडे ३ कोटी ६ लाख रुपये विमा हप्ता भरला आहे. तसेच शासन हिस्सा ४५ कोटी ६७ लाख रुपये विमा कंपनीकडे जमा होणार आहे. म्हणजेच, तालुक्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा हप्त्यापोटी विमा कंपनीकडे एकूण ४८ कोटी ७३ लाख रुपये जमा होणार आहेत. पावसाने सलग २१ दिवस खंड दिल्यामुळे अपेक्षित उत्पन्न यावर्षी निघणार नाही. त्यात उत्पन्नात घट येणार आहे. त्यामुळे हे नमुना सर्वेक्षण करण्यात आले.

कोट......

गेल्या वर्षीच्या पीक विम्यासाठी उच्च न्यायालयात अजूनही संघर्ष सुरू आहे. आता पुन्हा प्रतिकूल हवामान घटकांमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत कृषी विभागाच्या अहवालानुसार तातडीने तालुक्यातील शेतकऱ्यांना २५ टक्के रक्कम आगाऊ देण्यात यावी अन्यथा संघर्ष अटळ आहे.

- अनिल जगताप, माजी जिल्हा उपाध्यक्ष, रायुकाँ

यावर्षी सुरुवातीला पाऊस चांगला झाला. त्यामुळे पिके जोमात आली. परंतु, प्रत्यक्षात सोयाबीनला फुले लागत असताना पाऊस गायब झाला आणि फुले गळाली. त्यामुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उत्पन्नातही ६० ते ७० टक्के घट येणार असल्याचे चित्र आहे.

- केशव पाटील, शेतकरी, खेड

तालुकास्तरीय संयुक्त समितीमार्फत पावसातील खंडामुळे झालेल्या उत्पादनामध्ये येणारी लक्षणीय घट आणि नुकसानीचे रँडम सर्वेक्षण करून अहवाल वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यात आला आहे.

- मिलिंद बिडबाग, तालुका कृषी अधिकारी