शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे लाखोंची मालमत्ता धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:36 IST

उमरगा : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांवर मोठा विपरित परिणाम झाला आहे. उद्योग, व्यवसाय आर्थिक संकटात सापडले आहेत. सामाजिक, वैवाहिक, धार्मिक ...

उमरगा : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांवर मोठा विपरित परिणाम झाला आहे. उद्योग, व्यवसाय आर्थिक संकटात सापडले आहेत. सामाजिक, वैवाहिक, धार्मिक व राजकीय कार्यक्रमांना स्थगिती देण्यात आली आहे. याचा मोठा फटका कोट्यवधी रुपये खर्च करून शहरात उभारण्यात आलेल्या १२ मंगल कार्यालयांना देखील बसला असून, ही कार्यालये अक्षरश: धूळखात पडल्याने याचे मालक मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

लाॅकडाऊन काळात शासनाने मंगल कार्यालयावर संपूर्णतः बंदी घातली. यामुळे मागील दीड वर्षात सर्वच मंगल कार्यालय मालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. बँकेकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन कार्यालयाची उभारणी करण्यात आली आहे. मात्र, लॉकडाऊन काळात उत्पन्न नसतानाही बँकेचे व्याज मात्र चालूच असल्याने मोठी आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे. अनलॉक प्रक्रियेमध्ये सध्या हाॅलमध्ये १०० व मैदानात २०० लोकांना परवानगी देण्यात आली. परंतु, काही कार्यालय मोठे असतात व यात फक्त १०० लोक म्हटले की, लोक कार्यालयात लग्न करणे टाळतात. यामुळे या कार्यालय मालकांसोबतच बॅन्ड, डेकोरेटर्स, साऊंड सिस्टीम, मेहंदी, मंडप, केटरिंग, डीजे साऊंड, लाईट, डेकोरेशन, इव्हेंट व्यवस्थापक इत्यादी सेवा देणारे हजारो लोक देखील प्रभावित होऊन अडचणीत सापडले आहेत.

कोरोनामुळे उदभवलेली परिस्थिती हाताळण्यासाठी जे उपाय लाॅकडाऊन काळात शासनाने सुचवले त्यात मंगल कार्यालयावर संपूर्णतः बंदी घालण्यात आली. यामुळे मागील दोन वर्षे संपूर्ण लग्नसराईत एकही लग्न न करता मंगल कार्यालय मालकांना काढावी लागली. बँकेचे व्याज वाढत आहे. शासनाने मंगल कार्यालयाच्या ५० टक्के क्षमतेने लग्न करण्यास परवानगी द्यावी. तरच हा व्यवसाय थोडाफार पूर्वपदावर येईल.

- ओम माने, मंगल कार्यालय मालक, उमरगा

दीड वर्षांपासून करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मंगल कार्यालय व लॉन मालकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. शासनाने सध्या २०० लोकांच्या उपस्थितीत लग्न करायला परवानगी दिली आहे. मात्र मोठ्या मंगल कार्यालयासाठी ५० टक्के उपस्थितीला मान्यता देण्याची गरज आहे. असे केले तर कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून कार्य पार पाडली जातील.

- ओंकार जाधव, लॉन्स मालक, उमरगा

गेल्या दीड वर्षांपासून लग्न व विविध कार्यावर बंदी आहे. यामुळे फोटोग्राफी व्यवसाय अडचणीत सापडला आहे. इतर कोणताही व्यवसाय नसल्याने आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे. लग्नाच्या तारखा नोव्हेंबर, डिसेंबर, एप्रिल, मे महिन्यात असतात. या कमाईवर वर्षभर घरखर्च भागवला जातो.

- मनिष सोनी, फोटोग्राफर, उमरगा

गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे लग्न समारंभ बंद आहेत. आमच्या बँड पथकात १८ कलाकार आहेत. या सर्वांच्या कुटुंबाचे पालन पोषण बँड व्यवसायावर चालते. कलाकारांना सांभाळताना आता आम्ही कर्जबाजारी झालो आहोत. त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने याही बाबीचा विचार करुन योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे.

- किशोर माने, बँडचालक, उमरगा

लॉकडाऊन काळामध्ये कमी लोकांच्या उपस्थितीत विवाह पार पाडण्याच्या अटीमुळे विवाह कार्यामध्ये सर्व काम करणारे पुरोहित, फूलवाले, घोडेवाले, स्वयंपाकी, मंडप, बँडवाले यांचे फार मोठे नुकसान झाले. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

- अशोक जोशी, पुरोहित, मुळज