शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
2
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
3
"घरी ये, लग्नाची बोलणी करू..."; तरुणाला घरी बोलावलं अन् गर्लफ्रेंडच्या कुटुंबाने मिळून संपवलं!
4
Samruddhi Mahamarg Accident: साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला निघाले, मृत्युने समृद्धी महामार्गावरच गाठले; दोघे ठार, तर...
5
अपमान सहन होईना! बांगलादेशचे राष्ट्रपती शहाबुद्दीन निवडणुकीनंतर पद सोडणार, युनूस सरकारवर गंभीर आरोप
6
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
7
लुथरा बंधूंना पोलिसांनी पकडलं, पण थायलंडमधून भारतात आणण्यास आणखी उशीर होणार! कारण काय?
8
NPS, UPS आणि अटल पेन्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल; कोणाला होणार किती फायदा?
9
केंद्रीय प्राधिकरणावरील अधिकारी लोकायुक्त कक्षेत; महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक मंजूर
10
Leopard Spotted in Pune Airport: अखेर सापडला! पुणे विमानतळ परिसरात लपलेला बिबट्या ७ महिन्यांनी अडकला पिंजऱ्यात
11
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
12
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
13
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
14
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
15
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
16
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
17
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
18
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
19
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
20
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

ऊसबिलासाठी ‘छावा’ आक्रमक; जयलक्ष्मी साखर कारखान्याने चार वर्षापासून छदामही दिला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 17:55 IST

अत्यल्प पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची आहे. अ

उस्मानाबाद : तालुक्यातील नितळी येथील जयलक्ष्मी साखर कारखान्याला चिकुंद्रा येथील शेतकऱ्यांनी २०१४-१५ मध्ये ऊस घातला होता. परंतु, चार वर्षाचा कालावधी लोटूनही संबंधित शेतकऱ्यांना ऊसबिलापोटी छदामही मिळालेला नाही. याच्या निषेधार्थ छावा संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांना सोबत घेऊन गुरूवारपासून आंदोलन सुरू केले आहे.

अत्यल्प पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची आहे. असे असतानाही आता दुष्काळात पिचलेल्या शेतकऱ्यांना नाडण्याचे काम कारखान्याकडून सुरू आहे. नितळी येथील जयलक्ष्मी साखर कारखान्याला चिकुंद्रा येथील शेतकऱ्यांनी २०१४-१५ मध्ये ऊस घातला होता. ऊस गेल्यानंतर साधारणपणे २० ते २५ दिवसात शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळणे अपेक्षित असते. परंतु, तसे झाले नाही. चार वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटूनही शेतकऱ्यांना ऊसबिलापोटी छदामही मिळालेला नाही. मध्यंतरी काही शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर कारखान्याकडून धनादेश देण्यात आले. मात्र, सदरील धनादेश बाऊंस झाले. याप्रकारामुळे शेतकऱ्यांचा रोष वाढला आहे.

या शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडून त्यांना न्याय देण्यासाठी छावा संघटना सरसावली आहे. या संघटनेने शेतकऱ्यांना सोबत घेत गुरूवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष विष्णू कोळी, कार्याध्यक्ष जीवन र् ंइंगळे, जिल्हाध्यक्ष महेश गवळी, काकासाहेब राऊत, अमरभाई शेख यांच्यासह शेतकरी सहभागी झाले आहेत. जोवर ऊसबिल मिळणार नाही तोवर आंदोलन थांबविले जाणार नाही असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आता कारखाना काय भूमिका घेतो? याकडे अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीagitationआंदोलन