शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

ऊसबिलासाठी ‘छावा’ आक्रमक; जयलक्ष्मी साखर कारखान्याने चार वर्षापासून छदामही दिला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 17:55 IST

अत्यल्प पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची आहे. अ

उस्मानाबाद : तालुक्यातील नितळी येथील जयलक्ष्मी साखर कारखान्याला चिकुंद्रा येथील शेतकऱ्यांनी २०१४-१५ मध्ये ऊस घातला होता. परंतु, चार वर्षाचा कालावधी लोटूनही संबंधित शेतकऱ्यांना ऊसबिलापोटी छदामही मिळालेला नाही. याच्या निषेधार्थ छावा संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांना सोबत घेऊन गुरूवारपासून आंदोलन सुरू केले आहे.

अत्यल्प पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची आहे. असे असतानाही आता दुष्काळात पिचलेल्या शेतकऱ्यांना नाडण्याचे काम कारखान्याकडून सुरू आहे. नितळी येथील जयलक्ष्मी साखर कारखान्याला चिकुंद्रा येथील शेतकऱ्यांनी २०१४-१५ मध्ये ऊस घातला होता. ऊस गेल्यानंतर साधारणपणे २० ते २५ दिवसात शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळणे अपेक्षित असते. परंतु, तसे झाले नाही. चार वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटूनही शेतकऱ्यांना ऊसबिलापोटी छदामही मिळालेला नाही. मध्यंतरी काही शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर कारखान्याकडून धनादेश देण्यात आले. मात्र, सदरील धनादेश बाऊंस झाले. याप्रकारामुळे शेतकऱ्यांचा रोष वाढला आहे.

या शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडून त्यांना न्याय देण्यासाठी छावा संघटना सरसावली आहे. या संघटनेने शेतकऱ्यांना सोबत घेत गुरूवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष विष्णू कोळी, कार्याध्यक्ष जीवन र् ंइंगळे, जिल्हाध्यक्ष महेश गवळी, काकासाहेब राऊत, अमरभाई शेख यांच्यासह शेतकरी सहभागी झाले आहेत. जोवर ऊसबिल मिळणार नाही तोवर आंदोलन थांबविले जाणार नाही असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आता कारखाना काय भूमिका घेतो? याकडे अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीagitationआंदोलन