शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
2
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
3
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
4
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
5
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
6
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
7
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
8
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
9
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
10
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
11
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
12
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
13
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
14
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
15
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
16
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
17
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
18
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
19
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
20
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू

ऊसबिलासाठी ‘छावा’ आक्रमक; जयलक्ष्मी साखर कारखान्याने चार वर्षापासून छदामही दिला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 17:55 IST

अत्यल्प पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची आहे. अ

उस्मानाबाद : तालुक्यातील नितळी येथील जयलक्ष्मी साखर कारखान्याला चिकुंद्रा येथील शेतकऱ्यांनी २०१४-१५ मध्ये ऊस घातला होता. परंतु, चार वर्षाचा कालावधी लोटूनही संबंधित शेतकऱ्यांना ऊसबिलापोटी छदामही मिळालेला नाही. याच्या निषेधार्थ छावा संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांना सोबत घेऊन गुरूवारपासून आंदोलन सुरू केले आहे.

अत्यल्प पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची आहे. असे असतानाही आता दुष्काळात पिचलेल्या शेतकऱ्यांना नाडण्याचे काम कारखान्याकडून सुरू आहे. नितळी येथील जयलक्ष्मी साखर कारखान्याला चिकुंद्रा येथील शेतकऱ्यांनी २०१४-१५ मध्ये ऊस घातला होता. ऊस गेल्यानंतर साधारणपणे २० ते २५ दिवसात शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळणे अपेक्षित असते. परंतु, तसे झाले नाही. चार वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटूनही शेतकऱ्यांना ऊसबिलापोटी छदामही मिळालेला नाही. मध्यंतरी काही शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर कारखान्याकडून धनादेश देण्यात आले. मात्र, सदरील धनादेश बाऊंस झाले. याप्रकारामुळे शेतकऱ्यांचा रोष वाढला आहे.

या शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडून त्यांना न्याय देण्यासाठी छावा संघटना सरसावली आहे. या संघटनेने शेतकऱ्यांना सोबत घेत गुरूवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष विष्णू कोळी, कार्याध्यक्ष जीवन र् ंइंगळे, जिल्हाध्यक्ष महेश गवळी, काकासाहेब राऊत, अमरभाई शेख यांच्यासह शेतकरी सहभागी झाले आहेत. जोवर ऊसबिल मिळणार नाही तोवर आंदोलन थांबविले जाणार नाही असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आता कारखाना काय भूमिका घेतो? याकडे अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीagitationआंदोलन