शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

अंगावर केसेस घेतलेले उमेदवार उभे करणार; मराठा समाजाचे ठरले, अनामत भरण्यासाठी वर्गणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 09:32 IST

निकष निश्चित करणारा धाराशिव राज्यातील पहिला जिल्हा असल्याचा दावा समन्वयकांनी केला. 

लोकमत न्यूज नेटवर्क, धाराशिव : मराठा बांधवांनी लाेकसभेच्या मैदानात ‘अबकी बार एक गाव, एक उमेदवार’ अशी घाेषणा देत तयारी सुरू केली आहे. धाराशिव येथे शनिवारी झालेल्या बैठकीत उमेदवारीचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. आंदाेलनादरम्यान अंगावर केसेस घेतलेल्या आणि उपाेषण केलेल्या तरुणांना उमेदवारीसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. निकष निश्चित करणारा धाराशिव राज्यातील पहिला जिल्हा असल्याचा दावा समन्वयकांनी केला. 

जे आरक्षण आम्ही मागितलेच नव्हते, ते १० टक्के आरक्षण सरकार मराठ्यांवर थाेपवीत आहे. यापूर्वीही अशा पद्धतीने आरक्षण दिले हाेते. मात्र, न्यायालयात ते टिकू शकले नाही. याही आरक्षणाला न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे हे आरक्षण आम्हाला मान्य नसल्याचे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा संघर्ष सुरू केला आहे. गावाेगावी जाऊन बैठका, संवाद सभा घेऊन समाजाशी चर्चा करीत आहेत, तर दुसरीकडे सकल मराठा समाजाने निवडणूक रिंगणात उमेदवार उतरविण्याची जाेरदार तयारी सुरू केली आहे. 

हे आहेत उमेदवारीचे निकष 

मराठा आंदाेलनादरम्यान अंगावर केसेस घेतलेल्या, जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ उपाेषण केलेल्या तरुणांना प्राधान्य माेठ्या गावातून किमान दाेन तर लहान गावातून किमान एक उमेदवार देण्याची रणनीती आजघडीला साडेचारशेपेक्षा अधिक उमेदवारांची निवडणूक लढविण्याची तयारी  

साेलापूर, माढा अन् धाराशिवमध्ये हजार उमेदवार देणार  

मराठा आरक्षणाच्या निर्णयात राज्य सरकारने समाजाची फसवणूक केली. याचा निषेध म्हणून आगामी लाेकसभा निवडणुकीत साेलापूर, माढा, धाराशिव या लाेकसभा मतदारसंघांत एक हजारपेक्षा जास्त उमेदवारी अर्ज दाखल करू. तसेच वाराणसी मतदारसंघात ऑनलाइन अर्ज दाखल करू, असा इशारा सकल मराठा क्रांती माेर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. समन्वयक माउली पवार म्हणाले, ज्या गावचा उमेदवार, त्याच गावचं मतदान असा पॅटर्न राहील. हा पॅटर्न देशभर जाईल. वाराणसी मतदारसंघात महादेव तळेकर, संदीप मांडवे हे उमेदवार असतील.

सकाळी, सायंकाळी हाेताहेत बैठका  

गावागावांत सकाळी व सायंकाळी बैठका हाेत आहेत. बैठकांमध्ये लाेकसभा निवडणुकीसाठी देण्यात येणाऱ्या उमेदवारांची अनामत रक्कम भरण्यासाठी वर्गणी गाेळा करणे, उमेदवारी अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे आदी मुद्द्यांवर चर्चा हाेत आहे. एखाद्या गावात निकष पूर्ण करणारा एकही उमेदवार नसेल तर मराठा समाजातील अन्य इच्छुक उमेदवारांचा विचार केला जाणार आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Maratha Reservationमराठा आरक्षण