शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

‘आधार’मुळे भीमरावला आई-वडील भेटले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 05:42 IST

आधार कार्ड काढण्यासाठी नेल्यानंतर त्याच्या कुटुंबासंदर्भातील माहिती समोर आली. त्यानंतर भीमरावला त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

पांडुरंग पोळे नळदुर्ग (जि. उस्मानाबाद) : तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील आपलं घर येथे अनाथ म्हणून दाखल झालेल्या भीमराव अन् त्याच्या आई-वडिलांची तब्बल चार वर्षानंतर भेट झाली. भीमरावचे मूळ गाव बीड जिल्ह्यातील छत्र बोरगाव हे आहे. आधार कार्ड काढण्यासाठी नेल्यानंतर त्याच्या कुटुंबासंदर्भातील माहिती समोर आली. त्यानंतर भीमरावला त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.साधारणपणे आठ-नऊ वर्षाचा एक अशक्त मुलगा पोलिसांना आॅक्टोबर २०१६ मध्ये परभणी जिल्ह्यातील मानवत रेल्वे स्टेशनवर आढळून आला होता. पोलिसांनी चौकशी केली असता, त्यास काहीही आठवत नव्हते. मुलाने दिलेल्या जुजबी माहितीवरून तो उस्मानाबाद जिल्ह्यातील असावा, असे समजून त्यास उस्मानाबादच्या बालकल्याण समितीकडे सोपविण्यात आले. परंतु, त्याच्या कुटुंबाची खात्री होईल, त्यामुळे बालकल्याण समितीने त्याला आपलं घरमध्ये दाखल केले. त्यास तिसरीत प्रवेश देण्यात आला. हनुमान घाडगे असे त्याचे नाव नोंदविण्यात आले. काही दिवसांपूर्वीच शालेय विभागाने सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्याचे आदेश दिले. तिसरीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड निघाले. परंतु, हनुमानचे आधार कार्ड निघत नव्हते. प्रत्येकवेळी काही ना काही त्रुटी निघत. ही बाब आपलं घरचे प्रभारी व्यवस्थापक नरेश ठाकूरयांनी विश्वस्त पन्नालाल सुराणायांच्या निदर्शनास आणून दिली.त्यावर हनुमान घाडगे यास सोबतघेऊन हे तिघेही गुरूवारी ‘आधार’च्या मुंबई येथील क्षेत्रिय कार्यालयातगेले.आधार कार्यालयाच्या निदर्शनास हे आणून दिल्यानंतर त्यांनी कारणे शोधण्याचा प्रयत्न केला असता, त्याचे यापूर्वीच आधार कार्ड काढले असल्याने पुन्हा निघत नसल्याचेस्पष्ट झाले. त्यानुसार हनुमान घाडगेहा अनाथ नसून त्याचे नावभीमराव मच्छिंद्र शिंदे (रा. छत्रबोरगाव, ता. माजलगाव) असल्याचे समोर आले होते.>पेढे वाटून आनंदोत्सव साजराभीमराव शिंदे याचे आधी आधार कार्ड काढण्यात आले होते, असे लक्षात आले. त्यावरून त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात आला. खात्री पटल्यानंतर भीमरावला बीडच्या बालकल्याण समितीकडे सोपविण्यात आले. समितीने त्यास आई-वडिलांच्या स्वाधीन केले. चार वर्षानंतर आपला मुलगा भेटल्याने आई-वडील व नातेवाईकांसह मित्रमंडळींनी पेढे व साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला.