शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

उस्मानाबादेत सरासरीच्या ५२ टक्केच पाऊस;शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 16:41 IST

पावसाळ्याचे साडेतीन महिने उलटून गेले असतानाही जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ५२.८८ टक्के एवढा पाऊस झाला आहे.

उस्मानाबाद : सलग दोन वर्ष जिल्हाभरात दमदार पाऊस झाला. सुरूवातीच्या काळात हवामान खात्याने केलेल्या भाकितानुसार यंदाही दमदार पर्जन्यमान होईल, अशी आशा होती. परंतु, पावसाळ्याचे साडेतीन महिने उलटून गेले असतानाही जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ५२.८८ टक्के एवढा पाऊस झाला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

तीन-चार वर्ष भीषण दुष्काळाचा सामना केल्यानंतर मागील दोन वर्ष जिल्हाभरात दमदार पाऊस झाला. त्यामुळे लहान-मोठे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले होते. यंदाही दमदार पाऊस पडेल, अशी शेतकऱ्यांना अशा होती. हवामान खात्यानेही पावसाळच्या प्रारंभीच दमदार पावसाचे भाकित केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांची आशा आणखीच पल्लवित झाल्या होत्या. परंतु, जिल्ह्यात आजवर झालेला पाऊस पाहता, हवामान खात्याचे भाकित भरकटल्याचे दिसून येते. मागील साडेतीन महिन्यात जिल्ह्यात जेमतेम ५२.८८ टक्के एवढा अल्प पाऊस झाला आहे. 

खरीप पिके फुले व शेंगा लागण्याच्या अवस्थेत असताना जिल्ह्याच्या काही भागात २७, काही भागात २५ दिवस आणि काही भागात २० पेक्षा अधिक दिवस पावसाने उघडीप (खंड)  दिली. त्यामुळे खरिपातील उडीद, मूग यासारखी नगदी पिके वाया गेली. एकरी एक ते दीड क्विंटलही उत्पादन मिळाले नाही. सायोबीनची अवस्थाही फारशी समाधानकारक नाही. सोयाबीनला शेंगा कमी लागल्या असून दाणेही पूर्ण क्षमतेने भरलेले नाहीत. त्यामुळे एकरी उत्पादन घटल्याचे शेतकरी सांगतात. 

दरम्यान, पावसाच्या खंडरूपी अडथळ्यांची शर्यत पार करीत खरीप हंगाम पार पडला असला तरी शेतकऱ्यांना आता रबी पेरणी होणार की नाही, याची चिंता लागली आहे. कारण अद्याप दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.

तीन तालुके पन्नाशीच्या आतच...जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील पर्जन्यमानावर नजर टाकली असता, चिंताजनक चित्र समोर येथे. तीन तालुक्यामध्ये पन्नास टक्क्यांपेक्षाकही कमी पाऊस आहे. यामध्ये उस्मानाबाद ४२.८५ टक्के, भूम ४२.३७ आणि परंड्यात सर्वात कमी ३८.४७ टक्के पाऊस झाला आहे. त्याचप्रमाणे तुळजापूर ५५.३१, उमरगा ७७.४७, लोहारा ५१.०६, कळंब ५६.६८ आणि वाशी तालुक्यात ५८.६९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. 

प्रकल्पांच्या घशाला कोरड कायम !जिल्हाभरात लघु, मध्यम आणि मोठे प्रकल्पांची संख्या साधारणे पावणेतीनशेच्या घरात आहे. मागील दोन वर्षांत बहुतांश प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले होते. परंतु, यंदाच्या पावसाळ्यातील तीन ते साडेतीन महिन्यांचा कालावधी उलटूनही पन्नास टक्क्यांच्या आसपास पाऊस झाल्याने जवळपास सर्वंच प्रकल्पांच्या घशाची कोरड कायम आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीOsmanabadउस्मानाबाद