शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

ग्रामपंचायतीचा कौतुकास्पद ठराव; गावातील टीव्ही, मोबाइल रोज दोन तास बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2022 12:15 IST

मुलांच्या अभ्यासासाठी जकेकूर ग्रामपंचायतीचा ठराव

समीर सुतके उमरगा (जि. उस्मानाबाद) : टीव्हीवरच्या मालिका, हातातील मोबाइल यातच अनेकांचे आयुष्य गुरफुटून गेले. याचा परिणाम कुटुंबाबरोबर विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही होत आहे. हीच बाब लक्षात घेऊन मुलांच्या अभ्यासात व्यत्यय नको, यासाठी अख्ख्या गावातील मोबाइल आणि टीव्ही सायंकाळी सहा ते रात्री आठ यावेळेत बंद ठेवण्याचा ठराव जकेकूरवाडी ग्रामपंचायतीने घेतला आहे. यासाठी दररोज भोंग्याच्या माध्यमातून आठवण करून दिली जात आहे.

नव्या साधनांचा दुष्परिणाम विविध माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. या परिणामांच्या पार्श्वभूमीवर जकेकूरवाडीचे सरपंच अमर सूर्यवंशी यांनी विशिष्ट टीव्ही मालिका आणि मोबाइलमुळे मुलांच्या अभ्यासावर अधिक परिणाम होत असल्याचे सांगत ही साधनेच दररोज दोन तास बंद ठेवण्याचा निर्धार केला. ग्रामसभेत हा विषय घेण्यात आला तेव्हा सर्वसंमतीने तो मंजूरही करण्यात आला. यामुळे गावात सायंकाळी सहा ते रात्री आठ यादरम्यान प्रत्येक घरातले टीव्ही आणि मोबाइल बंद करून मुलांच्या अभ्यासासाठी वेळ राखीव करण्यात आला आहे. दररोज ठरलेल्या वेळेत टीव्ही आणि मोबाइल बंद करण्यासाठी आठवण करून देण्यास ग्रामपंचायतीवर भोंगाही लावला आहे. तसेच या वेळेत मुलं घराबाहेर पडणार नाहीत, याची जबाबदारी पालकांसोबत गावातील शिक्षक, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या निर्णयामुळे मुलांचे लक्ष अभ्यासावर केंद्रित होऊन गुणवत्ता वाढीस हातभार लागेल, अशी आशा ग्रामस्थांना आहे. 

मुलांना अभ्यासाची सवय लागावी. टीव्ही व मोबाइलसारख्या गोष्टींपासून त्यांना ठरावीक वेळ तरी दूर ठेवण्यासाठी गावामध्ये दररोज सायंकाळी सहा वाजता ग्रामपंचायत कार्यालयातून सायरन वाजवले जाते. यावेळी सर्व नागरिकांनी आपले टीव्ही, मोबाइल, रेडिओ, लाऊडस्पीकर बंद करायचे व विद्यार्थ्यांनी अभ्यासाला बसायचे, असे सर्व ग्रामस्थांच्या सहमतीने ठरले आहे. या उपक्रमाला विद्यार्थी व पालकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.- अमर सूर्यवंशी, सरपंच, जकेकूरवाडी

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळाOsmanabadउस्मानाबाद