शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

वाळलेल्या पिकात सोडली जनावरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 5:46 PM

पाऊस नसल्याने खरीप हंगामातील पिके वाळून जात आहेत. त्यामुळे या हंगामात काहीच उत्पन्न मिळणार नसल्याने शेतकरी हताश झाला आहे. यातूनच उस्मानाबाद तालुक्यातील भिकार सारोळा येथील शेतक-याने पाण्या अभावी वाळलेल्या पिकात चक्क जनावरे सोडून दिली.

ऑनलाईन लोकमत 

उस्मानाबाद, दि. १४ : पाऊस नसल्याने खरीप हंगामातील पिके वाळून जात आहेत. त्यामुळे या हंगामात काहीच उत्पन्न मिळणार नसल्याने शेतकरी हताश झाला आहे. यातूनच उस्मानाबाद तालुक्यातील भिकार सारोळा येथील शेतक-याने पाण्या अभावी वाळलेल्या पिकात चक्क जनावरे सोडून दिली.

यंदा मृग नक्षत्रात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतक-यांनी मोठ्या अपेक्षेने खरिपाच्या पेरण्या केल्या. उस्मानाबाद तालुक्यातील भिकार सारोळा येथील रमेश पंडित तनमोर यांनी देखील साडेतीन एकर क्षेत्रात सोयाबीन आणि तूर या पिकाची पेरणी केली होती. सुरूवातीच्या काळातील पावसामुळे पिकांची वाढही समाधानकारक होती. परंतु, जुलै महिन्यापासून पावसाने दडी मारली. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक पाण्याअभावी करपून गेले. आता यापुढील काळात पाऊस झाला तरी या पिकांना त्याचा काहीच उपयोग होणार नसल्यामुळे हताश झालेल्या रमेश तनमोर यांनी सुकलेल्या या पिकात जनावरे सोडून दिली.

तनमोर यांनी साडेतीन एकर क्षेत्रात सोयाबीन व पट्टा पध्दतीने तुरीची लागवड केली होती. त्यांना खत, बी-बियाणे, पेरणी व कोळपणी, फवारणी यासाठी सुमारे पंचेवीस हजारापर्यंत खर्च झाला. तनमोर यांच्या कुटुंबात सहा सदस्य असून, या सर्वांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहे. मात्र, पावसाअभावी हा हंगाम हातचा गेल्यामुळे या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.