शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

बघा ! हे असंही घडतंय, शेतकऱ्यानं 2 एकर 'कांदा' पिकात फिरवला रोटाव्हेटर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 18:28 IST

कांदा पिकांच्या संदर्भात केवळ काळ्या आईची ओटी भरणं अन् वाढीसाठी

बालाजी अडसूळ 

एकीकडे कांद्याला मिळणाऱ्या उचांकी दराच्या कथा मांडल्या जात असतांनाच दुसरीकडे मात्र परतीच्या पावसाने वाया गेलेल्या कांदा फडावर 'नांगर' फिरवण्याची दुर्देवी वेळ काही कांदा उत्पादक शेतकर्यावर आली आहे.अशीच डोळ्यात पाणी आणणारी वेळ इटकूर येथील बापूराव आडसूळ यांच्यावर ओढवली असून दरवृद्धी चर्चेचा 'हिशोब' तेजीत असतांनाच आपल्या दोन एकर कांदा क्षेत्रावर रोटाव्हेटर फिरवले आहे.कांदा पिकांच्या संदर्भात केवळ काळ्या आईची ओटी भरणं अन् वाढीसाठी राब राब राबणं शेतकर्यांच्या हातात आहे. बाकी, त्यांला मिळणारी हवामान अन् पाऊसपाण्याची साथ, बाजारातील दर हे सारं काही परस्वाधीन आहे.यामुळेच हा कांदा, कधी उत्पादकांना रडवतो तर कधी त्यांच्या चेहर्यावर हास्य निर्माण करतो असा आजवरचा अनुभव आहे.इटकूर (ता कळंब )येथील बापूराव तुकाराम आडसूळ यांनी खरीप हंगामात दोन एकर क्षेत्रावर कांदा लागवड केली होती.चागंली मेहनत व मशागत करूण पिक जोपासले होते.परंतु, पावसाळ्याच्या पुर्वार्धात टंचाईच्या झळा मागे लागल्या होत्या.यावर चाळीस पाईप अंथरून शेजारच्या शेतकर्याचे पाणी आणले अन् कांदा पिक वाचवले.मात्र ऐन मोक्याच्यावेळी कांदा क्षेत्राला परतीच्या अवकाळी पावसाने गाठले. यामुळे कांदा अन् त्याची मूळ मातीमध्येच नासले.वाढ खुंटली, पाती जळाल्या.बघता बघता संपुर्ण प्लॉट हातचा गेला. उभ्या पिकांवर फिरवला नांगर.... 

अवेळी आलेल्या पावसाने व यात जवळपास एक महिना सातत्य राहिल्याने बापूरावांच्या कांदा पिकाचे आतोनात नुकसान झाले होते.यामुळे काढणीस लावलेल्या मजूराचा खर्च ही निघाला नसता.बाजार दाखवण्या इतपतही माल निघण्याची शक्यता धुसर झाली होती.यामुळे अखेर त्यांनी आपल्या दोन एकर कांदा क्षेत्रावर रोटाव्हेटर फिरवून पिक मोडले आहे. लाखाचे बारा हजार ही नाहीत... सद्या कांदा दरवृद्धीच्या कथा शेतकर्यासांठी किती सुखद आहेत असे चीत्र दर्शवले जात असतांना बापूरावांचे मात्र लाखांचे बारा हजार ही झाले नसल्याचे दिसून येत आहे.त्यांनी २५ टन उत्पन्न व २० हजार रूपये टन असा दर गृहीत धरला होता.यानुसार चार ते पाच लाख उत्पन्न अपेक्षीत होते. मात्र, सद्या कांद्याला टनाला तर सोडा क्विंटलला वीस हजाराचा दर मिळाला आहे. मात्र, बापूरावांनी विकायचं काय ?. एकूणच, हे उदाहरण प्रातिनिधिक असले तरी शशिकांत गंभिरे, शिवाजी आडसूळ अशा अनेक कांदा शेतकर्यांचे 'लखपती' व्हायचं स्वप्न परतीच्या पावसाने धुळीस मिळवले आहे. विम्याचे कवच नाही, खरीप मदत तरी.... कांदा हातचा गेला असतांना दुसरीकडे सदर पिकांचा खरीप हंगाम कृषि विमा योजनेच्या अधिसूचित पिकांत समावेश नसल्याने कांद्याचा विमा भरता आलेला नाही.यामुळे बाधीत क्षेत्रासाठी शेतकर्यांना विमा नुकसान भरपाईचे कवच मिळणार नाही. यामुळे किमान शासनाच्या खरीप मदत वाटपात कांदा पिकांची फळपीकात नोंद घेवून वाढीव मदत द्यावी अशी मागणी बापूराव आडसूळ यांनी केली आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीonionकांदाOsmanabadउस्मानाबाद