शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
ना पाकिस्तान, ना अफगानिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकानंच केला खुलासा
3
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
4
इराण-इस्रायल युद्धादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
6
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
7
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
8
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
9
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
10
लेकाला मांडीवरुन घेऊन कार्तिकीचा केला गाण्याचा सराव, शेअर केला क्युट व्हिडिओ
11
"माझी मुलगी आधी एअर इंडियात पायलट होती...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अलका कुबल म्हणाल्या...
12
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
13
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
14
BEL Stock Price: 'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
15
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
16
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
17
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
18
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
19
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
20
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?

बघा ! हे असंही घडतंय, शेतकऱ्यानं 2 एकर 'कांदा' पिकात फिरवला रोटाव्हेटर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 18:28 IST

कांदा पिकांच्या संदर्भात केवळ काळ्या आईची ओटी भरणं अन् वाढीसाठी

बालाजी अडसूळ 

एकीकडे कांद्याला मिळणाऱ्या उचांकी दराच्या कथा मांडल्या जात असतांनाच दुसरीकडे मात्र परतीच्या पावसाने वाया गेलेल्या कांदा फडावर 'नांगर' फिरवण्याची दुर्देवी वेळ काही कांदा उत्पादक शेतकर्यावर आली आहे.अशीच डोळ्यात पाणी आणणारी वेळ इटकूर येथील बापूराव आडसूळ यांच्यावर ओढवली असून दरवृद्धी चर्चेचा 'हिशोब' तेजीत असतांनाच आपल्या दोन एकर कांदा क्षेत्रावर रोटाव्हेटर फिरवले आहे.कांदा पिकांच्या संदर्भात केवळ काळ्या आईची ओटी भरणं अन् वाढीसाठी राब राब राबणं शेतकर्यांच्या हातात आहे. बाकी, त्यांला मिळणारी हवामान अन् पाऊसपाण्याची साथ, बाजारातील दर हे सारं काही परस्वाधीन आहे.यामुळेच हा कांदा, कधी उत्पादकांना रडवतो तर कधी त्यांच्या चेहर्यावर हास्य निर्माण करतो असा आजवरचा अनुभव आहे.इटकूर (ता कळंब )येथील बापूराव तुकाराम आडसूळ यांनी खरीप हंगामात दोन एकर क्षेत्रावर कांदा लागवड केली होती.चागंली मेहनत व मशागत करूण पिक जोपासले होते.परंतु, पावसाळ्याच्या पुर्वार्धात टंचाईच्या झळा मागे लागल्या होत्या.यावर चाळीस पाईप अंथरून शेजारच्या शेतकर्याचे पाणी आणले अन् कांदा पिक वाचवले.मात्र ऐन मोक्याच्यावेळी कांदा क्षेत्राला परतीच्या अवकाळी पावसाने गाठले. यामुळे कांदा अन् त्याची मूळ मातीमध्येच नासले.वाढ खुंटली, पाती जळाल्या.बघता बघता संपुर्ण प्लॉट हातचा गेला. उभ्या पिकांवर फिरवला नांगर.... 

अवेळी आलेल्या पावसाने व यात जवळपास एक महिना सातत्य राहिल्याने बापूरावांच्या कांदा पिकाचे आतोनात नुकसान झाले होते.यामुळे काढणीस लावलेल्या मजूराचा खर्च ही निघाला नसता.बाजार दाखवण्या इतपतही माल निघण्याची शक्यता धुसर झाली होती.यामुळे अखेर त्यांनी आपल्या दोन एकर कांदा क्षेत्रावर रोटाव्हेटर फिरवून पिक मोडले आहे. लाखाचे बारा हजार ही नाहीत... सद्या कांदा दरवृद्धीच्या कथा शेतकर्यासांठी किती सुखद आहेत असे चीत्र दर्शवले जात असतांना बापूरावांचे मात्र लाखांचे बारा हजार ही झाले नसल्याचे दिसून येत आहे.त्यांनी २५ टन उत्पन्न व २० हजार रूपये टन असा दर गृहीत धरला होता.यानुसार चार ते पाच लाख उत्पन्न अपेक्षीत होते. मात्र, सद्या कांद्याला टनाला तर सोडा क्विंटलला वीस हजाराचा दर मिळाला आहे. मात्र, बापूरावांनी विकायचं काय ?. एकूणच, हे उदाहरण प्रातिनिधिक असले तरी शशिकांत गंभिरे, शिवाजी आडसूळ अशा अनेक कांदा शेतकर्यांचे 'लखपती' व्हायचं स्वप्न परतीच्या पावसाने धुळीस मिळवले आहे. विम्याचे कवच नाही, खरीप मदत तरी.... कांदा हातचा गेला असतांना दुसरीकडे सदर पिकांचा खरीप हंगाम कृषि विमा योजनेच्या अधिसूचित पिकांत समावेश नसल्याने कांद्याचा विमा भरता आलेला नाही.यामुळे बाधीत क्षेत्रासाठी शेतकर्यांना विमा नुकसान भरपाईचे कवच मिळणार नाही. यामुळे किमान शासनाच्या खरीप मदत वाटपात कांदा पिकांची फळपीकात नोंद घेवून वाढीव मदत द्यावी अशी मागणी बापूराव आडसूळ यांनी केली आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीonionकांदाOsmanabadउस्मानाबाद