शहरं
Join us  
Trending Stories
1
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
2
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
3
मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
4
कॅनडात दोन आठवड्यात दोन भारतीयांची हत्या; कोण होते शिवांक अवस्थी आणि हिमांशी खुराणा?
5
Vijay Hazare Trophy: किंग कोहलीचं शतक हुकलं! पण 'फिफ्टी प्लस'च्या 'सिक्सर'सह पुन्हा दाखवला क्लास
6
BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार...
7
AI मुळे नोकरी गेली, खर्च भागवण्यासाठी कपल बनलं 'बंटी-बबली'; १५ लाखांच्या चोरीची पोलखोल
8
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
9
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
10
"माणूसकीचा विसर पडण्याच्या आत...", बांगलादेशमध्ये हिंदू युवकाची हत्या, जान्हवी कपूर संतापली
11
गणपती बाप्पा मोरया… २०२६ मध्ये किती वेळा अंगारक योग जुळून येणार? ‘या’ अंगारकी चतुर्थी खास!
12
करोडपती होण्याचे स्वप्न आता आवाक्यात! दरमहा इतक्या रुपयांची SIP; पाहा चक्रवाढ व्याजाची कमाल
13
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
14
कॅनडात आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या, शिवांकला विद्यापीठ परिसरातच घातल्या गोळ्या
15
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
16
किडनी विक्रीतून रामकृष्णने घेतली २० एकर जमीन; फेसबुक ग्रुपद्वारे विणले अवयव तस्करीसाठी एजंटांचे जाळे
17
नव्या वर्षापासून UPI साठी लागू होणार नवा नियम; ई-कॉमर्स कंपन्यांच्या चलाखीवर बसणार चाबूक, प्रकरण काय?
18
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाणार की उद्धवसेनेत?; उद्धव ठाकरेंचा फोन, पुण्यात राजकीय ट्विस्ट
19
भारतातील युपीआय व्यवहारांत मोठी प्रादेशिक दरी; महाराष्ट्र अग्रस्थानी तर बिहार पिछाडीवर, कारण काय?
20
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
Daily Top 2Weekly Top 5

विधानपरिषद निवडणुकीत आघाडीचा आत्मघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 19:31 IST

विजयासाठी पुरेसे संख्याबळ असतानाही आघाडीच्या येथे झालेल्या पराभवाची तुलना आत्मघाताशी केली जात आहे़.

ठळक मुद्देकाँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीकडे विजयासाठी आवश्यक असणारे हक्काचे बळ असतानाही येथे पराभवाचे तोंड पहावे लागले़ 

- चेतन धनुरे

उस्मानाबाद : भाजपाला रोखण्यासाठी एकीकडे विरोधी पक्षांची मोट बांधली जात असतानाच मंगळवारी आलेल्या उस्मानाबाद-बीड- लातूर विधानपरिषद निकालाने या प्रयत्नांना काहीसा धक्का बसला आहे़. विजयासाठी पुरेसे संख्याबळ असतानाही आघाडीच्या येथे झालेल्या पराभवाची तुलना आत्मघाताशी केली जात आहे़.

उस्मानाबाद-बीड-लातूर हा विधानपरिषद मतदारसंघ दिलीपराव देशमुख यांच्या रुपाने सलग तीन वेळा काँग्रेसच्या ताब्यात होता़ यावेळी देशमुख यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिल्याने राष्ट्रवादीने हा मतदारसंघ पुन्हा एकदा आपल्याकडे घेतला. दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीत आघाडीचा निर्णय झाल्यानंतर राष्ट्रवादीने परभणीची खात्रीशीर जागा काँग्रेसला सोडून उस्मानाबादची जागा शेवटच्या क्षणी पदरात पाडून घेतली़ हा निर्णय जणू स्थानिक नेत्यांच्या पचनीच पडला नाही़ त्यामुळेच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीकडे विजयासाठी आवश्यक असणारे हक्काचे बळ असतानाही येथे पराभवाचे तोंड पहावे लागले़ 

उस्मानाबाद-बीड-लातूर मदारसंघातील लढत ही उमेदवारांपेक्षाही ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासाठीच प्रतिष्ठेची बनली होती़ अगदी अखेरच्या क्षणापर्यंत त्यांच्यात राजकीय कुरघोड्या रंगल्या़ अगदी प्रारंभालाच राष्ट्रवादीने पंकजा मुंडे यांचे मानलेले भाऊ रमेश कराड यांना पक्षात आणून त्यांना उमेदवारी देत भाजपवर कुरघोडी साधली़ मात्र, हा आनंद राष्ट्रवादीला फार काळ टिकविता आला नाही़ रमेश कराड यांनी ऐनवेळी माघार घेत राष्ट्रवादीला तोंडघशी पाडले़ त्यामुळे राष्ट्रवादीचेच मात्र, उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष म्हणून अर्ज भरलेल्या अशोक जगदाळे यांना पुरस्कृत करण्याची नामुष्की ओढावली़ यादरम्यान, प्रचार कालावधीत तिन्ही जिल्ह्यांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीने संयुक्त पत्रकार परिषदा घेऊन आपण एक असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला़ मात्र, प्रत्यक्षात तसे घडलेच नाही.

या मतदारसंघात एकूण १००५ इतके मतदान होते़ त्यापैकी ५२७ मतदार काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बाजूचे होते़ तर भाजपचे संख्याबळ ३०२ होते़ सेनेचे ६५ तर एमआयएम व इतर मिळून १०२ असे संख्याबळ होते़ भाजप-सेना व उर्वरित मतदारांची संख्या एकत्र केली तरी आघाडी त्यांच्या तुलनेत जवळपास ६० मतांनी पुढे होती़  मात्र, आघाडीतील बेदिली भाजपच्या पथ्यावर पडली अन् अशक्य वाटणारा विजय आघाडीनेच भाजपच्या ताटात वाढला़ 

लक्ष्मीदर्शनाचाही चमत्काऱ़़या मतदारसंघात भाजपचा विजय हा एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही़ यात ‘लक्ष्मीदर्शना’चा मोठा वाटा आहे़ अर्थात हा योग मतदारांना दोन्ही बाजूने घडवून आणण्यात आला़ भाजपसोबतच आघाडीचे पुरस्कृत उमेदवारही यात मागे हटले नाहीत़ या स्पर्धेने तीन टप्प्यात लक्ष्मीदर्शनाचा योग घडवून आणला़  

अपात्रतेचा मुद्दा गाजलानिवडणूक जिंकायचीच या ईर्ष्येने उतरलेल्या भाजपने विरोधकांची मते घटविण्याचाही प्रयत्न केला़ बीड येथील १० नगरसेवकांच्या अपात्रतेच्या प्रस्तावावर मतदानाच्या एक दिवस आधी तडकाफडकी निर्णय घेत त्यांना अपात्र ठरविण्यात आले़ तर दुसरीकडे धस यांच्या गटाच्या सहा जिल्हा परिषद सदस्यांच्या अपात्रतेची सुनावणी पुढे ढकलण्यात आली़ यावरुन सत्तेचा गैरवापर झाल्याची टीका भाजपवर झाली़

टॅग्स :congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूकVidhan Parishadविधान परिषद