शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
3
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
4
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
5
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
6
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
7
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
8
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
9
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
10
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
11
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
12
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
13
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
14
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
15
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
16
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
17
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
18
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
19
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
20
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश

विहीरीच्या पाण्यावरून वाद पेटला, कोयत्याने वार करून चुलत भावाचा खून केला

By बाबुराव चव्हाण | Updated: November 13, 2023 19:15 IST

विहिरीतील पाणी रबी पिकाला देण्याच्या कारणावरून घडली घटना

नळदुर्ग (जि. धाराशिव) : विहिरीचे पाणी रबी पिकांना देण्यासाठी कृषी पंपाला विद्युत जोडणी करीत असताना सख्ख्या चुलत भावानेच पाठीमागून कोयत्याने वार केले. या हल्ल्यात पंचेचाळीस वर्षीय शेतकऱ्याचा गंभीर जखमी हाेऊन मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना तुळजापूर तालुक्यातील सराटी येथे साेमवारी सकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास घडली.

सराटी येथील शेतकरी नरसप्पा बाबूराव पाटील (४५) हे शेतातील रबी पिकाला पाणी देण्यासाठी रविवारी सायंकाळी विहिरीत विद्युतपंप सोडून त्यास साेमवारी सकाळी वीजपुरवठा जोडत असताना चुलत भाऊ नवनाथ अप्पाराव पाटील यांनी पाठीमागून कोयत्याने डोक्यात वार केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असता मारेकरी भाऊ घटना स्थळावरून फरार झाला. यानंतर नातेवाइकांनी गंभीर जखमी अवस्थेत नरसप्पा पाटील यांना उपचारासाठी दुचाकीवरून अणदूर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, दवाखाना बंद असल्याने त्यांच्यावर येथे उपचार होऊ शकले नाहीत. त्यामुळे नातेवाइकांनी त्यांना साेलापूर येथील दवाखान्यात दाखल केले. मात्र, तपासणीअंती डाॅक्टरांनी त्यांना मयत घाेषित केले. घटनेची माहिती मिळताच सपोनि स्वप्निल लोखंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन गावात पाेलिस बंदोबस्त तैनात केला. घटनेतील मारेकरी फरार असून पाेलिसांनी त्याचा शाेध सुरू केला आहे. मयताच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

...अन् जीव गमवावा लागला...मयत व आराेपी यांच्या नावे सराटी शिवारात तीन एकर वडिलाेपार्जित शेतजमीन आहे. याच शेतातील विहिरीचे पाणी पिकांना देण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात एकाला जीव गमवावा लागला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीOsmanabadउस्मानाबाद