शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

विहीरीच्या पाण्यावरून वाद पेटला, कोयत्याने वार करून चुलत भावाचा खून केला

By बाबुराव चव्हाण | Updated: November 13, 2023 19:15 IST

विहिरीतील पाणी रबी पिकाला देण्याच्या कारणावरून घडली घटना

नळदुर्ग (जि. धाराशिव) : विहिरीचे पाणी रबी पिकांना देण्यासाठी कृषी पंपाला विद्युत जोडणी करीत असताना सख्ख्या चुलत भावानेच पाठीमागून कोयत्याने वार केले. या हल्ल्यात पंचेचाळीस वर्षीय शेतकऱ्याचा गंभीर जखमी हाेऊन मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना तुळजापूर तालुक्यातील सराटी येथे साेमवारी सकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास घडली.

सराटी येथील शेतकरी नरसप्पा बाबूराव पाटील (४५) हे शेतातील रबी पिकाला पाणी देण्यासाठी रविवारी सायंकाळी विहिरीत विद्युतपंप सोडून त्यास साेमवारी सकाळी वीजपुरवठा जोडत असताना चुलत भाऊ नवनाथ अप्पाराव पाटील यांनी पाठीमागून कोयत्याने डोक्यात वार केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असता मारेकरी भाऊ घटना स्थळावरून फरार झाला. यानंतर नातेवाइकांनी गंभीर जखमी अवस्थेत नरसप्पा पाटील यांना उपचारासाठी दुचाकीवरून अणदूर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, दवाखाना बंद असल्याने त्यांच्यावर येथे उपचार होऊ शकले नाहीत. त्यामुळे नातेवाइकांनी त्यांना साेलापूर येथील दवाखान्यात दाखल केले. मात्र, तपासणीअंती डाॅक्टरांनी त्यांना मयत घाेषित केले. घटनेची माहिती मिळताच सपोनि स्वप्निल लोखंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन गावात पाेलिस बंदोबस्त तैनात केला. घटनेतील मारेकरी फरार असून पाेलिसांनी त्याचा शाेध सुरू केला आहे. मयताच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

...अन् जीव गमवावा लागला...मयत व आराेपी यांच्या नावे सराटी शिवारात तीन एकर वडिलाेपार्जित शेतजमीन आहे. याच शेतातील विहिरीचे पाणी पिकांना देण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात एकाला जीव गमवावा लागला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीOsmanabadउस्मानाबाद