शहरं
Join us  
Trending Stories
1
"२ लाख घरे, ३५० स्क्वेअर फूटचं घर, १ कोटींची किंमत..."; धारावी प्रकल्पानं मुंबईचा चेहरा बदलणार
2
...हे ५६ हजार लोक जगातील संपत्तीवर ठेवतात नियंत्रण; श्रीमंतीच्या नव्या आकडेवारीनं सर्वच हैराण
3
Dhurandhar FA9LA song Flipperachi Net Worth: धुरंदरचं व्हायरल गाणं FA9LA गाणाऱ्या फ्लिपरॅचीची संपत्ती किती? दरवर्षी किती करतो कमाई, जाणून घ्या
4
Ghodbunder Road Update: घोडबंदर मार्गावर पुन्हा ३ दिवस अवजड वाहनांना बंदी,  पर्यायी मार्ग कोणते?
5
उत्तर प्रदेशातील दुसरी सीमा हैदर! लग्नानंतर बांगलादेशी महिला रीना बेगम नेपाळमार्गे थेट भारतात
6
"मनोरंजनाच्या नावाखाली फक्त हिंसाच...", सध्याच्या कंटेंटवर राधिका आपटेने व्यक्त केली चिंता
7
मेक्सिकोच्या ५०% टॅक्समागे अमेरिकेचा हात? भारतातील 'या' क्षेत्राला बसणार सर्वाधिक झळ
8
IND vs SA: द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम, भारताविरुद्ध सर्वाधिक टी-२० सामने जिंकणारा पहिलाच संघ
9
विश्वास बसणार नाही...! मोदी चालले अशा देशा, जिथे १३ महिन्यांचे असते वर्ष; आज तिथे २०१८ सुरु आहे...
10
Nashik Crime: नणंदेला संशय आला, दरवाजा उघडताच वहिनीला बघून चिरकली! नाशिकमध्ये शीतलला पतीनेच संपवले
11
लखनौ हत्याकांडात नवा ट्विस्ट: जादूटोणा आणि चौथा आरोपी! इंजिनियरच्या वडिलांचा धक्कादायक दावा
12
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
13
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
14
ITR Refund Delay : ITR रिफंड मिळाला नाही? लाखो करदाते चिंतेत, विलंबाचं खरं कारण काय? अजून किती वाट पाहावी लागणार?
15
कॉम्पॅक्ट एसयूव्ही बाजारात ब्रेझाची विक्री घटली; या चार कारना ग्राहक देतायत पसंती...
16
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Sensex ३०० अंकांनी वधारला; निफ्टीतही तेजी, मेटल शेअर्स सुस्साट
17
नवीन कायद्यामुळे कर्मचाऱ्यांना लागेल कमी कर; कर्मचाऱ्यांच्या वेतनाची रचना बदलणार असल्याचा फायदा
18
Dog Attack Mumbai: बिबट्यासारखी उडी आणि खांदा पकडला जबड्यात; मुंबईत भटक्या कुत्र्याचा सुरक्षारक्षकावर हल्ला, Video पहा
19
जपान पुन्हा हादरला: ६.७ तीव्रतेचा जोरदार भूकंप, पॅसिफिक किनारपट्टीसाठी त्सुनामीचा इशारा जारी
20
रिस्क घेतली अन् गुंतवणूक वाढली! इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीत २१ टक्क्यांनी वाढ; सलग तीन महिन्यांच्या घसरणीला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

उस्मानाबाद जिल्ह्यातील २२३ प्रकल्पांमध्ये १.११ टक्केच उपयुक्त साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 19:17 IST

गतवर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे सध्या जिल्हाभरातील प्रकल्पांतील पाणीसाठा चिंताजनक अवस्थेत आहे.

ठळक मुद्देगतवर्षी होता ७.६३ टक्के साठा  सव्वाशेवर तलाव पडले कोरडेठाक

उस्मानाबाद : गतवर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे सध्या जिल्हाभरातील प्रकल्पांतील पाणीसाठा चिंताजनक अवस्थेत आहे. पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक प्रकल्पांमध्ये सध्या ठणठणाट निर्माण झाला आहे. तर उर्वरित प्रकल्पांमध्ये आजघडीला केवळ १.११ टक्के एवढचा उपयुक्त साठा उरला आहे. गतवर्षी ७.६३ टक्के एवढा उपयुक्त साठा होता, हे विशेष.

गतर्षी अख्ख्या पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ५७ टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे बहुतांश प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले नव्हते. त्यामुळे ऐन हिवाळ्यातच काही प्रकल्पांनी तळ गाठला होता. उन्हाळा सुरू झाल्यानंतर विशेषत: लघु प्रकल्प आटण्यास सुरूवात झाली. आजघडील प्रकल्पांतील साठा चिंताजनक अवस्थेत आहे. जिल्ह्यात केवळ एक मोठा प्रकल्प आहे. सदरील प्रकल्पात सध्या उपयुक्त साठा उरलेला नाही. गतवर्षीही केवळ ०.७१ टक्के उपयुक्त साठा होता. दरम्यान, मध्यम प्रकल्पांची अवस्थाही फार बिकट बनली आहे. या प्रकल्पांची संख्या १७ एवढी आहे. यापैैकी जवळपास पन्नास टक्क्यांवर प्रकल्प आटले आहेत. तर दोन पकल्पांमध्ये २५ टक्क्यांपेक्षा कमी साठा उरला असून सहा प्रकल्प जोत्याखाली आहेत. या सर्व प्रकल्पांमध्ये मिळून आजघडीला ०.५७ टक्केच उपयुक्त साठा उरला आहे. सदरील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होवू लागली आहे. मागील आठवड्यात ०.९६ टक्के उपयुक्त साठा होता, हे विशेष.दरम्यान, जिल्हाभरात लघु प्रकल्पाचे जाळे आहे. या प्रकल्पांची संख्या २०५ एवढी आहे. आजघडीला यापैैकी ११२ प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. दोन प्रकल्पांमध्येच केवळ २६ ते ५० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा आहे. १८ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी साठा उरला आहे.  तर दुसरीकडे ७३ प्रकल्प जोत्याखाली गेले आहेत.

जिल्हाभराती सर्व लघु प्रकल्पांत मिळून १.५८ टक्के एवढाच उपयुक्त साठा उरला आहे. गतवर्षी ६.२२ टक्के इतका उपयुक्त साठा होता. मागील आठवड्याच्या तुलनेत लघु प्रकल्पांच्या साठ्यात ०.२१ टक्क्यांनी घट झाली आहे. दरम्यान, प्रकल्पांतील पाणी पातळी झपाट्याने कमी होत असल्याने पाण्यासाठी या प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या गावांमध्ये सध्या भीषण टंचाई आहे. प्रशासनाकडून टँकरसह जलस्त्रोंतांचे अधिग्रहण करण्यात येत असले तरी या उपाययोजना अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत असल्याचे सर्वत्र चित्र पहावयास मिळत आहे.

टँकरची संख्या सव्वादोनशेवर प्रकल्पांतील पाणीसाठा चिंताजनक अवस्थेत असल्याने सध्या टँकरसह अधिग्रहणाची मागणी वाढली आहे. त्यामुळे दिवसागणिक टँकरच्या संख्येत भर पडत आहे. आजघडीला २३३ टँकर आणि नऊशेवर अधिग्रहणाच्या माध्यमातून टंचाईग्रस्तांची तहान भागविली जात आहे.

टॅग्स :droughtदुष्काळOsmanabadउस्मानाबादWaterपाणीDamधरण