शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बाबो! गर्लफ्रेन्डच्या वडिलांना फसवण्यासाठी तरूणाने रचलं स्वत:चं अपहरण नाट्य आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 12:49 IST

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, सुल्तानपूरचे एसपी अरविंद चतुर्वेदी यांनी सांगितले की जितेंद्र २३ जानेवारीच्या दुपारी वाराणसीला जाण्यासाठी निघाला होता.

उत्तर प्रदेशच्या सुल्तानपूरमधून अपहरणाच्या नाट्याची एक अजब घटना समोर आली आहे. पोलिसांनी एका २० वर्षीय युवकाला आणि त्याच्या मित्राला स्वत:च्या अपहरण नाट्यासाठी अटक केली आहे. रिपोर्टनुसार, अमेठी मूळ निवासी जितेंद्र संगीत शिकण्याचं कारण सांगत २३ जानेवारीला वाराणसीकडे निघाला होता. पण दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे वडील सुरेंद्र कुमार यांना पैशांसाठी किडनॅपर्सचा फोन आला तर हे प्रकरण पोलिसात गेलं. त्यानंतर या सर्व नाट्याचा पर्दाफाश झाला.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, सुल्तानपूरचे एसपी अरविंद चतुर्वेदी यांनी सांगितले की जितेंद्र २३ जानेवारीच्या दुपारी वाराणसीला जाण्यासाठी निघाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या वडिलांना किडनॅपर्सचा फोन आला. ते म्हणाला की, जितेंद्र त्यांच्या ताब्यात आहे. त्याला सोडवण्यासाठी १० लाख रूपये द्या. (हे पण वाचा : अनर्थ टळला ! आजीच्या सतर्कतेमुळे चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला)

चतुर्वेदी यांनी सांगितले की, 'तपासातून समोर आले की, पैसे मागण्यासाठी जितेंद्रच्या फोनचा वापर केला गेला होता. आम्हाला असंही आढळून आलं की, २४ जानेवारीच्या रात्री २ वाजता त्याच्या मोबाइलमध्ये नवं सिम टाकण्यात आलं होतं. पण पैशांसाठी फोन सकाळी ८ वाजता करण्यात आला. ज्यामुळे आम्हाला संशय आला'. ( हे पण वाचा : मुंब्रा येथील अपहृत मुलाची मध्य प्रदेशातून सुखरुप सुटका; ठाणे गुन्हे शाखेची कामगिरी)

तपासातून समोर आलं की, ज्या सिमवरून पैशांसाठी फोन करण्यात आला. ते सिम जितेंद्रचा मित्र रविच्या नावावर होतं. त्यानंतर पोलिसांची एक टीम शिवगढला गेली आणि त्यांना अटक केली. चौकशी दरम्यान जितेंद्रने मान्य केलं की, त्याने त्याच्या प्रेयसीच्या वडिलांना फसवण्यासाठी हे स्वत:चं अपहरण नाट्य रचलं होतं. कारण ते त्यांच्या प्रेमाच्या विरोधात होते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशKidnappingअपहरण