शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
3
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
4
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
5
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
6
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
7
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
8
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
9
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
10
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
11
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
12
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
13
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
14
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
15
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
16
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
17
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
18
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
19
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
20
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार

"मी जीवन संपवतोय पण माझ्या बाळाला नक्की जन्म दे, ते आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 22:21 IST

Crime News : आत्महत्या करणाऱ्या तरुणाने आपल्या नोटमध्ये पत्नीसाठी एक भावूक करणारा संदेश दिला आहे.

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना आता उत्तर प्रदेशमध्ये समोर आली आहे. रेल्वे रुळावर रक्ताच्या थारोळ्यात एका तरुण पडलेला काही लोकांना दिसला. त्याने आत्महत्या केली असून त्याच्याजवळ एक सुसाईड नोट देखील सापडली आहे. ही नोट वाचून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाने आपल्या नोटमध्ये पत्नीसाठी एक भावूक करणारा संदेश दिला आहे. "मी जीवन संपवतोय पण माझ्या बाळाला नक्की जन्म दे, आपल्या प्रेमाचं ते प्रतीक आहे" असं म्हटलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील एका रेल्वे स्टेशनजवळील भागात ही घटना घडली. एका तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. त्यावेळी पोलिसांना एक सुसाईड नोटही सापडली होती. ज्य़ामध्ये त्या तरुणाने आपला मृत्यू होण्यापूर्वी काही संदेश लिहिला होता. हा तरुण हिंदू असून एका मुस्लिम मुलीच्या प्रेमात पडल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. दोघांनी गुपचूप लग्नही केलं होतं. या नात्याला समाज आणि कुटुंबामध्ये मान्यता नव्हती, यामुळे त्या तरूणानं हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे. 

भूपेंद्र यादव असं या तरुणाचं नाव आहे. "मी आत्महत्या करायला जात आहे. माझं मृत शरीर माझ्या घरी माझ्या पत्नीकडे पोहचवा. माझ्या पत्नीचं नाव मरियम बानो आहे. मरियम आय लव्ह यू.  तू माझी चिंता करू नकोस, मी नेहमी तुझ्याबरोबर आहे. माझ्या बाळाला नक्की जन्म दे, आपल्या प्रेमाचं ते प्रतीक आहे. मी आता मरत आहे. पण तुझ्या मनात मात्र कायम राहणार आहे. माझ्यासोबत नेमकं काय झालं?, मी का मेलो? हे सर्व माझी पत्नी मरियम तुम्हाला सांगेल. माझी शेवटीची इच्छा आहे की माझ्यावर अंत्यसंस्कार माझी पत्नी मरियम करेल. दुसरं कोणीही करू नये. तसेच माझी विनंती आहे, माझ्या मरणानंतर मरियम पुन्हा दुसरं लग्न करू नकोस" असं या तरुणाने सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

भयंकर! लग्नपत्रिकेत नाव न छापण्यावरून जोरदार राडा; मंडपातच पडला रक्ताचा सडा अन्...

 हैदराबादमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. लग्नपत्रिकेत नाव न छापण्यावरून जोरदार राडा झालेला पाहायला मिळाला. तसेच मंडपातच रक्ताचा सडा पडला. नाव न छापण्यावरून सुरू झालेला वाद शेवटी टोकाला गेला आणि एकमेकांवर चाकूने वार करण्यात आले. यामध्ये चार जण गंभीर जखमी झाले आहेत. तुकारामगेट परिसरातल्या आझाद चंद्रशेखर नगरमध्ये इलेक्ट्रिशियन म्हणून काम करणारे शेखर (24) आणि सर्वेश (20) या दोघा आरोपींनी हे कृत्य केलं. 16 जून रोजी त्यांच्या एका नातेवाईकाचं लग्न होतं. लग्नाच्या आमंत्रणपत्रिकेत सर्व मंडळींची नावं होती. मात्र शेखर आणि सर्वेश यांच्या आई-वडिलांची नावं त्यात नव्हती. त्याचा राग शेखर आणि सर्वेश यांच्या मनात होता. त्यावरून त्यांचं आणि यादगिरी नावाच्या त्यांच्या एका नातेवाईकाचं भांडण झालं. या दोघा आरोपींनी यादगिरीच्या पत्नीमुळे आपल्या आई-वडिलांची नावं छापली गेली नसल्याचा आरोप केला आणि वाद झाला. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश