शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

यूपीत गदारोळानंतर योगी सरकार ॲक्शन मोडमध्ये, 'हायलेव्हल' बैठक अन् 116 जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 21:42 IST

Yogi Government in Action Mode : अशा परिस्थितीत योगी सरकार ॲक्शन मोडमध्ये आले आहे. राज्यात आतापर्यंत 116 जणांना अटक करण्यात आली आहे.

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर वादग्रस्त टिपण्णी करणाऱ्या नुपूर शर्मा यांचे भाजपमधून निलंबित करण्यात आले. मात्र, त्यांच्या  वादग्रस्त वक्तव्यावरून शुक्रवारी नमाजानंतर देशातील अनेक शहरांमध्ये प्रचंड गदारोळ झाला. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौपासून अनेक शहरांमध्येही हिंसाचार पाहायला मिळाला. अशा परिस्थितीत योगी सरकार क्शन मोडमध्ये आले आहे. राज्यात आतापर्यंत 116 जणांना अटक करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वत: वरिष्ठ अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक घेतली. बैठकीत सद्य परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत अशा समाजकंटकांवर कडक कारवाई करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य सरकारने अधिकाऱ्यांना दिल्याचे बोलले जात आहे. कायदा हातात घेणाऱ्यांना कठोर धडा शिकवला जाईल, असे सरकारचे म्हणणे आहे. दरम्यान, कारवाई करत प्रशासनाने सहारनपूरमध्ये 38, हाथरसमध्ये 24, आंबेडकर नगरमध्ये 23, प्रयागराजमध्ये 22, मुरादाबादमध्ये 7 आणि फिरोजाबादमध्ये 2 जणांना अटक केली आहे. 

प्रयागराजमध्ये हिंसाचार करणाऱ्यांविरोधात पोलिसांची कडक कारवाईसहारनपूरचे एसएसपी म्हणाले की, गोंधळ प्रकरणी पोलिसांनी 38 जणांना अटक केली आहे. याशिवाय हाथरसमध्ये 24 जणांना अटक करण्यात आली आहे. हाथरसमध्ये झालेल्या गदारोळानंतर रस्त्यांवर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. डीआयजी दीपक कुमार म्हणाले की, हे एक छोटे शहर आहे, दगडफेक झाली आहे, कडक कारवाई केली जात आहे, शांतता राखली जात आहे.मात्र, आठवडाभर याच विधानावरून प्रचंड दंगल झालेल्या कानपूरमध्ये सर्वसाधारणपणे शांतता होती. कडक पोलीस बंदोबस्तामुळे कानपूरमध्ये कोणताही गोंधळ झाला नाही. पण इतर शहरांमध्ये पोलिसांना अशी भीती नव्हती, तरीही नमाज्यांनी घोषणाबाजी केली आणि गोंधळ झाला. यानंतर उत्तर प्रदेश सरकार कारवाईच्या मोडमध्ये आले आहे.

 

राज्यातील विविध शहरांमध्ये दगडफेकीच्या घटनांनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आंदोलकांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. ACS गृह अवनीश अवस्थी, कार्यवाहक DGP, ADG कायदा आणि सुव्यवस्था सारखे अधिकारी पोलिस मुख्यालयातून परिस्थितीवर करडी लक्ष ठेवून आहेत. सर्व जिल्ह्यांतून अहवाल मागवले जात आहेत.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसArrestअटकstone peltingदगडफेक