शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

होय! रिपब्लिकने टीआरपी घोटाळ्यासाठी पैसे दिले; आरोपीने गुन्हा कबूल केला

By हेमंत बावकर | Updated: October 27, 2020 21:44 IST

TRP Scam Republic TV: अभिषेकच्या दोन साथीदारांना पोलिसांना आधीच अटक केलेली आहे. इतरांचा शोध घेतला जात आहे. हंसा रिसर्च कंपनीने पहिल्यांदा या टीआरपी घोटाळ्याला वाचा फोडली होती. त्यांनी कांदिवली पोलिसांत तक्रार केली होती.

मुंबई : टीआरपी घोटाळ्याची पाळेमुळे शोधून काढण्यात मुंबई पोलिसांना मोठे यश आले आहे. आतापर्यंत दोन टीव्ही चॅनेलच्या मालकांसह दहा जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपी  अभिषेक कोलवडे हा दहावा होता. त्याने रिपब्लिक टीव्हीने टीआरपी वाढविण्यासाठी पैसे दिल्याची कबुली दिली आहे. 

क्राइम इंटेलिजेंस यूनिट (CIU) चे एसीपी शशांक सांडभोर आणि वरिष्ठ निरिक्षक सचिन वझे यांच्यासमोर अभिषेकने ही कबुली दिली. न्यूज नेशन चॅनलनेही टीआरपी वाढविण्यासाठी पैसे दिल्याचे त्याने म्हटले आहे. दोन्ही चॅनलकडून मिळणारी ही मोठी रक्कम काही सहकारी आणि काही लोकांना देण्यात येत होती. या लोकांच्या घरी बॅरोमीटर लावण्यात आले होते. 

अभिषेकच्या दोन साथीदारांना पोलिसांना आधीच अटक केलेली आहे. इतरांचा शोध घेतला जात आहे. हंसा रिसर्च कंपनीने पहिल्यांदा या टीआरपी घोटाळ्याला वाचा फोडली होती. त्यांनी कांदिवली पोलिसांत तक्रार केली होती. मात्र, नंतर पोलिसांच्या चौकशीत हंसा आणि रिपब्लिक टीव्हीशी संबंधित कंपनी ARG OUTLIER MEDIA PVT LTD मध्ये मोठ्या प्रमाणावर पैशांचे व्यवहार झाले. मात्र, हंसाच्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली नव्हती. 

क्राइम इंटेलिजेंस यूनिटने ज्या आरोपींना अटक केली आहे किंवा जे फरार आहेत, त्यापैकी बरेचसे हे हंसाशी संबंधित आहेत. त्यांनी हंसाच्या गोपनीय माहितीचा आपल्या फायद्यासाठी दुरुपयोग केला. सीआययुच्या टीमने साक्षीदारांचे जबाबही घेतले आहेत. यांच्या घरी बॅरोमीटर लावण्यात आले होते. काही खास चॅनल पाहण्यासाठी त्यांना पैसे दिले जात होते. ते चॅनल पाहण्यात काही रस नसला तरीही ते चालू ठेवावे लागत होते. सीआययूने या प्रकरणी डझनभर साक्षी नोंदविल्या आहेत. 

उमेश मिश्रा नावाचा आरोपी या माफीचा साक्षीदार बनला आहे. आतापर्यंत सीआययूने रिपब्लिकच्या पाच गुंतवणूकदारांना समन्स पाठविले आहेत. 30 ऑक्टोबरला त्यांना हजर राहण्यास सांगितले आहे. रिपब्लिक, न्यूज नेशनसह महामुव्ही, फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या चॅनेलचीही चौकशी सुरु झाली आहे.  

टॅग्स :Republic TVरिपब्लिक टीव्हीMumbai policeमुंबई पोलीस