शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या : ब्ल्यू व्हेल की पबजीचा बळी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 00:24 IST

सुखवस्तू कुटुंबातील बारावीच्या एका हुशार विद्यार्थ्याने पाचव्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केली. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वानाडोंगरीतील निलगिरी अपार्टमेंटमध्ये सोमवारी भल्या सकाळी ही थरारक घटना घडली.

ठळक मुद्देपाचव्या माळ्यावरून उडी मारली , एमआयडीसीत उलटसुलट चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सुखवस्तू कुटुंबातील बारावीच्या एका हुशार विद्यार्थ्याने पाचव्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केली. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वानाडोंगरीतील निलगिरी अपार्टमेंटमध्ये सोमवारी भल्या सकाळी ही थरारक घटना घडली. आयुष क्षीरसागर भोयर (वय १७) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याने कसल्याही प्रकारची सुसाईड नोट अथवा कोणताही निरोप मागे ठेवला नाही. त्यामुळे आयुषने पबजी किंवा ब्ल्यू व्हेलसारख्या जीवघेण्या गेमच्या नादी लागून आत्मघात केला की काय, अशी शंका घेतली जात आहे.
आयुषचे वडील क्षीरसागर भाऊरावजी भोयर (वय ४८) शासकीय विभागात अभियंता म्हणून सेवारत आहेत. कांचनगंगा-२ मधील निलगिरी अपार्टमेंटच्या पहिल्या माळ्यावर आयुष आई, वडील आणि छोटा भाऊ भूषण (वय १३) यांच्यासोबत राहायचा. तो बारावीत शिकत होता. एक हुशार विद्यार्थी म्हणून तो सर्वत्र ओळखला जायचा.
भोयर कुटुंबातील सदस्य भल्या सकाळीच जागतात. आयुषही रोज सकाळी उठून फिरायला जायचा. तिकडून आल्यानंतर शिकवणी आणि कॉलेज असा त्याचा दिनक्रम होता. नेहमीप्रमाणे सोमवारी भल्या सकाळी उठल्यानंतर ५.४५ मिनिटांनी त्याने आईला फिरून येतो, असे सांगितले. आईने नित्यबाब म्हणून त्याला होकार दिला अन् घरकामात व्यस्त झाल्या. काही वेळेनंतर इमारतीवरून काही तरी पडल्याचा त्यांना आवाज आला. त्यामुळे आईने गॅलरीतून खाली बघितले. आयुषचे कपडे दिसल्याने आई घाबरली अन् तिने आयुषच्या वडिलांना सोबत घेऊन खाली धाव घेतली. खाली आयुष पडून होता. त्याच्या डोक्यातून आणि दोन्ही पायातून रक्त निघत होते. त्यांनी लगेच शेजाऱ्यांच्या मदतीने आयुषला उपचाराकरिता वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे उपचार सुरू असताना डॉक्टरांनी सोमवारी सायंकाळी ४.३१ ला आयुषला मृत घोषित केले.

आत्महत्येचे कारण अंधारात
रुग्णालयातून मिळालेल्या माहितीवरून एमआयडीसी पोलिसांनी आयुषच्या कुटुंबीयांसोबत संपर्क साधला. तो बाहेर फिरायला जातो, असे सांगून गेला एवढीच माहिती आईकडून मिळाली. पोलिसांनी अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात आयुष रविवारी सायंकाळी इमारतीत शिरताना दिसला, नंतर तो बाहेर पडताना पोलिसांना आढळलाच नाही. त्यामुळे त्याने आईला फिरायला जातो, असे सांगून सरळ इमारतीचे टेरेस गाठले आणि तेथून उडी घेतल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला आहे. त्याने आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली, ते मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. आयुष सुखवस्तू कुटुंबातील मुलगा होता. तो हुशारही होता. त्यामुळे त्याने आत्महत्या करावी,असे कोणतेही कारण दिसत नाही. ब्ल्यू व्हेल आणि पबजीच्या नादी लागलेली मुले अशा प्रकारचे आत्मघातकी कृत्य करून घेतात. गेल्या वर्षी अजनीतील एका मुलानेही बहुमजली इमारतीवर चढून आत्महत्या केली होती.

 

टॅग्स :Suicideआत्महत्याStudentविद्यार्थी