शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

वर्ध्याच्या मैत्रिणीचे घरातून पलायन; रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे पोलिसांना घेता आला बेपत्ता मुलींचा शोध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 20:51 IST

त्या रिक्षाचालकाने प्रिन्सीच्या आईला कॉल करून मुली मुंबईत असल्याची खबर दिली. त्यानंतर प्रिन्सीच्या आईने तात्काळ पोलिसांना संपर्क साधून त्या रिक्षाचालकांचा संपर्क क्रमांक दिला आणि त्यामुळेच पोलिसांना या दोन्ही हरवलेल्या मुलींचा शोध घेणं सोपं झालं. 

मुंबई - वर्धा जिल्ह्यात राहणाऱ्या १६ वर्षीय प्रिन्सी तेजपाल आणि जीविता बगाडे या अकरावी इयत्तेत शिकणाऱ्या मुली घरात पालकांशी सतत होणाऱ्या वादाला कंटाळून काल सकाळी ट्रेनने मुंबईत आल्या. एका रिक्षेतून त्या जुहू चौपाटी फिरल्या. मात्र, दरम्यान रिक्षाचालकास शंका आल्याने त्याने या दोन्ही मुलींची कसून चौकशी करत प्रिन्सीच्या आईचा संपर्क क्रमांक मिळविला. त्यानंतर त्या रिक्षाचालकाने प्रिन्सीच्या आईला कॉल करून मुली मुंबईत असल्याची खबर दिली. त्यानंतर प्रिन्सीच्या आईने तात्काळ पोलिसांना संपर्क साधून त्या रिक्षाचालकांचा संपर्क क्रमांक दिला आणि त्यामुळेच पोलिसांना या दोन्ही हरवलेल्या मुलींचा शोध घेणं सोपं झालं. 

प्रिन्सीला दहावीनंतर आर्ट शाखेतून पुढचे शिक्षण घ्यायचे होते. मात्र पालकांनी दबावाखाली तिला जबरदस्तीने सायन्स शाखेत कॉलेजचे प्रवेश घेऊन दिले. त्यामुळे मनाविरुद्ध पालकांनी कॉलेजचे ऍडमिशन केल्याने प्रिन्सी आणि तिच्या आई - वडिलांमध्ये सतत भांडण होतं असे. त्यानंतर कंटाळून प्रिन्सीने मैत्रीण जीविताच्या मदतीने घर सोडून मुंबईत जाऊन स्वतः पैसे कमवून शिक्षण घेण्याचे ठरविले. कारण जीविता घरी देखील सारखीच परिस्थिती होती. सततच्या भांडणाला कंटाळून या दोघींनी वर्ध्याहून शनिवारी निघाल्या. प्रिन्सीने आईच्या मोबाइलवरून मुंबईत जाणाऱ्या ट्रेनची माहिती जमा केली होती. त्यानंतर या दोघींनी ट्रेन पकडून काल सकाळी मुंबई गाठली आणि कुर्ला टर्मिनसला उतरल्या. मात्र, या दोघींचे पालक मुंबईत आपले कोणीच नातलग नसल्याने अस्वस्थ झाले होती. नंतर त्यांनी सावंगी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल दाखल केली. याप्रकरणी माहिती वर्ध्यातील पोलिसाने त्यांच्या वर्गमित्र असलेल्या मुंबईतील गुन्हे शाखा कक्ष - ३ च्या अंमलदाराला माहिती दिली. त्यानंतर कक्ष - ३ ने  देखील या मुलींच्या शोध मोहिमेस सुरुवात केली होती. दरम्यान, चतुर रिक्षाचालकाने या मुली गावाकडच्या असून त्या मुंबईत नवीन असल्याचा संशय आल्याने त्यांची चौकशी करायला सुरुवात केली. नंतर प्रिन्सीला आईचा संपर्क क्रमांक विचारला. रिक्षाचालकाने आईला संपर्क साधून मुली सुरक्षित असल्याचे सांगितले. त्याचबरोबर पालकांनी पोलिसांना त्या रिक्षाचालकाचा संपर्क क्रमांक देऊन त्यांचे शोधकार्य सोपे केले. नंतर पोलिसांच्या सांगण्यावरून रिक्षाचालक त्या मुलींना रिक्षातून फिरवत माहुल गावात घेऊन आला आणि तिथेच पोलिसांनी त्या दोघींना काल दुपारी ताब्यात घेतले आणि आज दुपारी त्यांच्या पालकांकडे पोलिसांनी सुपूर्द केले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस