शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
2
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
3
“प्रशांत जगतापांनी अनेक पक्षांची ऑफर धुडकावून विचारासाठी काँग्रेस मार्ग पत्करला”: वडेट्टीवार
4
"अल्पसंख्याकांवरील अत्याचार खपवून घेणार नाही" २,९०० हून अधिक हल्ल्यांचा पुरावा; भारताचा बांगलादेशला गंभीर इशारा
5
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
6
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
7
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
8
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
9
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
10
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
11
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
12
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
13
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
14
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
15
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
16
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
17
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
18
MNS: गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
19
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
20
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्याच्या मैत्रिणीचे घरातून पलायन; रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे पोलिसांना घेता आला बेपत्ता मुलींचा शोध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 20:51 IST

त्या रिक्षाचालकाने प्रिन्सीच्या आईला कॉल करून मुली मुंबईत असल्याची खबर दिली. त्यानंतर प्रिन्सीच्या आईने तात्काळ पोलिसांना संपर्क साधून त्या रिक्षाचालकांचा संपर्क क्रमांक दिला आणि त्यामुळेच पोलिसांना या दोन्ही हरवलेल्या मुलींचा शोध घेणं सोपं झालं. 

मुंबई - वर्धा जिल्ह्यात राहणाऱ्या १६ वर्षीय प्रिन्सी तेजपाल आणि जीविता बगाडे या अकरावी इयत्तेत शिकणाऱ्या मुली घरात पालकांशी सतत होणाऱ्या वादाला कंटाळून काल सकाळी ट्रेनने मुंबईत आल्या. एका रिक्षेतून त्या जुहू चौपाटी फिरल्या. मात्र, दरम्यान रिक्षाचालकास शंका आल्याने त्याने या दोन्ही मुलींची कसून चौकशी करत प्रिन्सीच्या आईचा संपर्क क्रमांक मिळविला. त्यानंतर त्या रिक्षाचालकाने प्रिन्सीच्या आईला कॉल करून मुली मुंबईत असल्याची खबर दिली. त्यानंतर प्रिन्सीच्या आईने तात्काळ पोलिसांना संपर्क साधून त्या रिक्षाचालकांचा संपर्क क्रमांक दिला आणि त्यामुळेच पोलिसांना या दोन्ही हरवलेल्या मुलींचा शोध घेणं सोपं झालं. 

प्रिन्सीला दहावीनंतर आर्ट शाखेतून पुढचे शिक्षण घ्यायचे होते. मात्र पालकांनी दबावाखाली तिला जबरदस्तीने सायन्स शाखेत कॉलेजचे प्रवेश घेऊन दिले. त्यामुळे मनाविरुद्ध पालकांनी कॉलेजचे ऍडमिशन केल्याने प्रिन्सी आणि तिच्या आई - वडिलांमध्ये सतत भांडण होतं असे. त्यानंतर कंटाळून प्रिन्सीने मैत्रीण जीविताच्या मदतीने घर सोडून मुंबईत जाऊन स्वतः पैसे कमवून शिक्षण घेण्याचे ठरविले. कारण जीविता घरी देखील सारखीच परिस्थिती होती. सततच्या भांडणाला कंटाळून या दोघींनी वर्ध्याहून शनिवारी निघाल्या. प्रिन्सीने आईच्या मोबाइलवरून मुंबईत जाणाऱ्या ट्रेनची माहिती जमा केली होती. त्यानंतर या दोघींनी ट्रेन पकडून काल सकाळी मुंबई गाठली आणि कुर्ला टर्मिनसला उतरल्या. मात्र, या दोघींचे पालक मुंबईत आपले कोणीच नातलग नसल्याने अस्वस्थ झाले होती. नंतर त्यांनी सावंगी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल दाखल केली. याप्रकरणी माहिती वर्ध्यातील पोलिसाने त्यांच्या वर्गमित्र असलेल्या मुंबईतील गुन्हे शाखा कक्ष - ३ च्या अंमलदाराला माहिती दिली. त्यानंतर कक्ष - ३ ने  देखील या मुलींच्या शोध मोहिमेस सुरुवात केली होती. दरम्यान, चतुर रिक्षाचालकाने या मुली गावाकडच्या असून त्या मुंबईत नवीन असल्याचा संशय आल्याने त्यांची चौकशी करायला सुरुवात केली. नंतर प्रिन्सीला आईचा संपर्क क्रमांक विचारला. रिक्षाचालकाने आईला संपर्क साधून मुली सुरक्षित असल्याचे सांगितले. त्याचबरोबर पालकांनी पोलिसांना त्या रिक्षाचालकाचा संपर्क क्रमांक देऊन त्यांचे शोधकार्य सोपे केले. नंतर पोलिसांच्या सांगण्यावरून रिक्षाचालक त्या मुलींना रिक्षातून फिरवत माहुल गावात घेऊन आला आणि तिथेच पोलिसांनी त्या दोघींना काल दुपारी ताब्यात घेतले आणि आज दुपारी त्यांच्या पालकांकडे पोलिसांनी सुपूर्द केले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस